Monday 22 April 2013


आधुनिक काळातील श्यामची आई ......


"श्यामची आई" हे पुस्तक वाचतांना  कित्येक वेळा डोळ्यातल्या अश्रूंना अखंड वाहू देण्यानेच मनाला समाधान व्हायचे. वाटायचे असेच कायमचे ह्या महान आईच्या जीवनातील प्रवासात गुंतून राहावे आणि तिच्या प्रेमाने भरलेल्या वात्स्ल्याच्या नेत्रांच्या दृष्टीमधून आपल्या स्वतःच्या जीवनात डोकावून पाहावे. परंतु, तसे करण्याचे धैर्य अजून पर्यंत झाले नाही.

परवा सहज इंटरनेट वर browse करत असतांना (browse चा मराठी अर्थ "झाडपाला खाणे, चरणे, करमणु की करिता वाचणे " असा दिला आहे. खरच किती तथ्य आहे या अर्थात !!) , हल्लीच्या आधुनिक परंतु मनाने आणि बुद्धीने भयंकर मागासलेल्या या जगात "आधुनिक श्यामची आई कशी असावी ?" ह्या माझ्या प्रश्नाला उत्तर मिळाले. नीरा चोप्रा ची अंतःकरणाला भिनवून पोटातल्या कातड्याना पिळवटून टाकणारी गाथा वाचली आणि पुन्हा एकदा मनाने डोळ्यांना कायमचे भिजवून टाकले. काय काय सहन केले असेल ह्या आईने. कुठून आणि कसे एकवटले असेल धैर्य ह्या मातेने, देवावर किती अपरंपार विश्वास आणि भरवसा असेल तिचा, काय काय करू शकते एक जननी आपल्या लेकरांसाठी…. ह्या अशा महान मातेला माझे कोटी कोटी प्रणाम !!!

True Story of Miss India 2009 - an inspiring story for everyone..!! ---(Miss India 2009 - Pooja Chopra) --- --- Neera Chopra is her mother. This is her story.---...Neera Chopra lived through abuse, poverty and some tough choices to make her once-unwanted girl child, Pooja Chopra. --- Neera Chopras story:---

"I don’t know where to begin... they were terrible times. My husband was well-placed, but the marriage had begun to sink almost as soon as it began. Like most women do, I tried to work against all the odds . My in-laws insisted everything would be alright if I had a son. My first child was a daughter, and that didn’t do me any good... but I couldn’t walk out. I had lost my father, my brother was in a not-so-senior position in Bata. I didn’t want to be a burden on my family and continued to live in my marital home in Kolkata.

I looked after my mother-inlaw, who was suffering from cancer, and while bathing her, I would tell myself she would bless me and put things right. I don’t know how I tolerated it all. The least a man can do, if he must philander, is to not flaunt his women in his wife’s face. Then began the manhandling. I still wanted my marriage to survive. I was a pure vegetarian and learnt to cook non-vegetarian delicacies thinking it would please him.

Then, I was pregnant again. When Pooja was eight months in my womb, my husband brought a girl to the house and announced he would marry her. I thought of killing myself. I hung on the slight hope that if the baby was a boy, my marriage could be saved.

When Pooja was born a girl, for three days, nobody came to the hospital. There was a squadron leader’s wife on the opposite bed, who was kind enough to give me baby clothes for Pooja to wear. When she was 20 days old, I had to make a choice. I left the house with my girls ‘ Pooja and Shubra, who was seven then. I haven’t seen my husband since. I promised myself, even if we had just one roti, we would share it, but together.

I began life in Mumbai with the support of my mother, brother, who was by then married. It wasn’t the ideal situation, especially when he had children - space, money, everything was short. I began work at the Taj Colaba and got my own place. How did I manage? Truth be told, I would put a chatai on the floor, leave two glasses of milk and some food, and bolt the door from outside before going to work. I would leave the key with the neighbours and tell the kids to shout out to them when it was time to leave for school.

Their tiny hands would do homework on their own, feed themselves on days that I worked late. My elder daughter Shubhra would make Pooja do her corrections... This is how they grew up. At a birthday party, Pooja would not eat her piece of cake, but pack it and bring it home to share with her sister. When Shubhra started working, she would skip lunch and pack a chicken sandwich that she would slip in her sister’s lunchbox the next day.

I used to pray, ‘God, punish me for my karma, but not my innocent little kids. Please let me provide them the basics.’ I used to struggle for shoes, socks, uniforms. I was living in Bangur Nagar, Goregaon. Pooja would walk four bus stops down to the St Thomas
Academy . Then, too little to cross the road, she would ask a passerby to help her. I had to save the bus money to be able to put some milk in their bodies.

Life began to change when I got a job for Rs 6,000 at the then Goa Penta. Mr Chhabra, the owner, and his wife, were kind enough to provide a loan for me. I sent my daughters to my sister’s house in Pune, with my mother as support. I spent four years working in Goa while I saved to buy a small one-bedroom house in Pune (where the family still lives). I would work 16-18 hours a day, not even taking weekly offs to accumulate leave and visit my daughters three or four times a year.

Once I bought my house and found a job in Pune, life began to settle. I worked in Hotel Blue Diamond for a year and then finally joined Mainland China ‘ which changed my life. The consideration of the team and management brought me the stability to bring them up, despite late hours and the travelling a hotelier must do.

Shubhra got a job in Hotel Blue Diamond, being the youngest employee there while still in college, and managed to finish her Masters in commerce and her BBM. Today, she is married to a sweet Catholic boy who is in the Merchant Navy and has a sweet daughter.

I continue to finish my day job and come home and take tuitions, as I have done for all these years. I also do all my household chores myself.

Through the years, Shubhra has been my anchor and Pooja, the rock. Pooja’s tiny hands have wiped away my tears when I broke down. She has stood up for me, when I couldn’t speak for myself. Academically brilliant, she participated in all extra-curricular activities. When she needed high heels to model in, she did odd shows and bought them for herself.

When I saw Pooja give her speech on TV, I knew it came from her heart. I could see the twinkle in her eye. And I thought to myself as she won ‘My God, this is my little girl.’ God was trying to tell me something.

Today, I’ve no regrets. I believe every cloud has a silver lining. As a mother, I’ve done nothing great."

Pantaloons Femina Miss India Pooja Chopra’s mother promised, ‘One day, this girl will make me proud’.

Pooja speaks on fulfilling that promise... "When I was 20 days old, my mother was asked to make a choice. It was either me, a girl child, or her husband. She chose me. As she walked out she turned around and told her husband, ‘One day, this girl will make me proud’. That day has come. Her husband went on to marry a woman who gave him two sons. Today, as I stand here a Miss India, I don’t even know if my father knows that it is me, his daughter, who has set out to conquer the world, a crown on my head.

"Our lives have not been easy, least so for my mother. Financially, emotionally, she struggled to stay afloat, to keep her job and yet allow us to be the best that we could be. I was given only one condition when I started modelling ‘ my grades wouldn’t drop.

"All the girls in the pageant worked hard, but my edge was my mother’s sacrifice, her karma. Today, when people call to congratulate me, it’s not me they pay tribute to, but to her life and her struggle. She’s the true Woman of Substance. She is my light, my mentor, my driving force." Save The Girl Child.......

देवाच्या कृपेने आपल्या कित्येकांच्या जीवनात कितीतरी प्रकारच्या सुविधा जन्मतःच उपलब्ध असतात. तरी पण आपण कायमचे "तक्रारी " चित्त वृत्तीत असतो. समोर असलेल्या वस्तुत आपले मन कधीच संतोषी नसते आणि नाही त्या वस्तुत कल्पनेने आपले मन गुंतते आणि उगीचच  व्याकूळ होत राहते. खरच कधी सुधारणार ह्या जगाची रीत ? 

Tuesday 16 April 2013


श्यामची आई … 



"आई माझा गुरु, आई कल्पतरू, सुखाचा सागरू, आई माझी प्रीतीचे माहेर, शांतीचे आगर ,मांगल्याचे सार, आई माझी" - साने गुरुजी.

लहानपणी शाळेत असतांना साने गुरुजींचे "श्यामची आई" पुस्तक अगदी मनापासून वाचल्याचे अजूनही लक्षात आहे. कोवळ्या वयात त्या वेळी ह्या पुस्तकातील मातेच्या ममतेच्या महाकाव्याचे मनावर जसे ठसे उठावेत तसे उठले नसावेत ह्याची जाणीव मागच्या महिन्यात स्वतः आईच्या भूमिकेतून हे पुस्तक परत एकदा वाचल्यावर समजले आणि मन खिन्न झाले. यशोदाबाई ने श्यामला दिलेल्या अनमोल संस्कारांचा ठेवा मधून तयार झालेली साने गुरुजींची कोमल वृत्ती, ह्याबद्दल या पवित्र पुस्तकात वाचतांना डोळ्याच्या कडा कितीवेळा पाणावल्या आणि उचंबळून आलेल्या मनातल्या भावनांनी अश्रू मार्फत कधी आणि कसा उच्चार केला हे कळालेच नाही. धन्य ती माता  कि जिने जगाला दाखवून दिले कि  आईचे प्रेम आंधळे नसते. तिचे प्रेम स्वावलंबनाचे धडे देते. अभिमानाने जगायला शिकवते, द्वेष-मत्सरापासून दूर राहायला सांगते. गरिबीत राहून ध्येयवाद दाखवणारी आई, प्रसंगी कठोर होऊन शिक्षाही करते. आणि धन्य ते साने गुरुजी कि ज्यांना अशा मातृ प्रेमाचे अमृत भरभरून पिण्याचे भाग्य मिळाले.  

अंघोळ झाल्यावर श्याम आईला पाय पुसायला सांगतो. त्यावेळी आई म्हणते ''श्याम जसे पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसेच मनाला घाण लागू नये म्हणूनही जपत जा. मनाची शुध्दी करण्याकरिता देवाने अश्रूंचे दोन हौद भरून दिले आहे''. भजनाची आवड असलेला श्याम जेव्हा बुवांना चिडविण्यासाठी मोठयाने भजन म्हणतो तेव्हा आई त्याला म्हणते, ''देवाची भक्ती ही मोठयाने नाही तर ह्दयातून केली तर देवा पर्यंत पोहोचते.'' बंधू प्रेमाचे धडे 'चिंधीच्या' गाण्यातून समजावून सांगणारी आई, पोहायला जात नाही म्हणून श्यामच्या पाठीवर चाबकाचे फटके ओढणारी आई, श्यामला कळया न तोडू देणारी आई, महार असलेल्या म्हातारीला मोळी उचलून मानवतेचे धडे देणारी आई, गरीबीतही ताठ मानेने जगणारी आई, आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे म्हणून कष्ट करणारी श्यामची आई.....अशी अनंत रूपे साने गुरूजींनी ४५ भागात लिहून काढली आहेत. 

आतड्यांना पीळ पाडून करुण रसाच्या उदात्त व प्रशांत वातावरणात नेणाऱ्या "श्यामच्या  आई" ने आपल्या समोर एक आदर्श जीवनपद्धती ठेवली त्यात मी स्वताः कुठे कमी पडले हे समजावून घ्यायला फारशी अडचण झाली नाही. विश्वातल्या कोणत्याही संकटाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची व या विश्वनिर्मात्यावर दृढ विश्वास ठेवण्याची शिकवण देते, वैचारिक चळवळ घडवणारी, प्रेरणादायी आणि नैतिक मूल्य जपणारी अशी शिकवण देणाऱ्या श्यामच्या आई पुढे आपण किती लहान आहोत याची उशिरा का होईना पण जाणीव झाली. एक क्षणी असे वाटले की , हेच पुस्तक जर मी कित्येक वर्षापूवी जेव्हा माझ्या लेकी लहान होत्या तेव्हाच वाचले असते तर त्यांची मानसिक घडण वेगळी झाली असती काय किंव्हा यशोदाबाई  प्रमाणे मी सुद्धा निस्वार्थ प्रेम करून त्यांच्यावर  संस्कार करू शकले असते काय…? ती वेळ आता माझ्या हातातून निसटून गेली काय? आईसाठी तिची अपत्य कधीच मोठी होत नाहीत, मग मी  कसे मान्य करू की ती वेळ माझ्या हातून निसटून गेली म्हणून? आईच्या प्रेमासाठी आणि संस्कारासाठी मुलांच्या वयाची आडकाठी का बरे यावी? पोटचा गोळा हृदयाला कवटाळण्या करिता मातेला का कुणाची परवानगी घ्यावी लागते? श्यामच्या आईचे अनाकालीन झालेल्या मृत्यूमुळे, माझे असे अनेक प्रश्न अनुत्तरीच राहीले आहेत. प्रत्येक क्षणाला बदलत असलेल्या नीतीमुल्याच्या ह्या आधुनिक जगात, मी आधुनिक श्यामच्या आईची अगदी उत्कंठतेने वाट पाहत आहे. 

Monday 8 April 2013


Keep Smiling...


सिंगापूरहून आम्ही जेंव्हा चेन्नईला आलो तेंव्हा दोन्ही लेकींना चांगल्या शाळेतच प्रवेश घेवून द्यायचा असा आम्ही ठाम निर्णय घेतला. बऱ्याच मित्र मंडळीशी सल्ला मसलत केल्यावर एकमताने आम्ही चिन्मय विद्यालयातच प्रवेशासाठी कसून प्रयन्त करावयाचे ठरविले. देवाच्या कृपेने, लेकींकडे असलेल्या थोड्या बहुत हुशारीने आणि शाळेच्या बिल्डिंग फंड साठी मागितलेल्या पैशाची तरतूद करण्याची आमच्या कडे असलेल्या ऐपतीमुळे, दोन्ही लेकींना सहजासहजी शाळेत प्रवेश मिळाला. त्यानंतर सुमारे नऊ/दहा वर्षे दोघींनी चिन्मय विद्यालयात शिक्षण घेतले. चिन्मय मिशनच्या  "Total Personality Development of the student " ह्या वर सर्व शिक्षकांनी दिलेला भर आणि त्या साठी शाळेच्या अभ्यासक्रमात केलेले सखोल, हेतुपूर्वक केलेले बदल आम्हाला प्रथम पासूनच आवडले होते. त्याचा उपयोग लेकींना त्यांच्या आयुष्यात होईल ह्याची आम्हाला खात्री होती. 

तर अशा ह्या नऊ वर्षाच्या काळात किती वेळा आम्ही नवीन वह्या आणि किती प्रकारची पुस्तके आणली ह्याचा हिशोब ठेवण्याची कधी  गरजच भासली नाही. अर्थात तशी आवश्यकताही नव्हती.  अशा ह्या नवीन वह्यांवर , पुस्तकांवर, शाळेत सर्व ठिकाणी "Keep Smiling " असे छापलेले असायचे. "Keep Smiling " हे चिन्मय विद्यालयाचे ब्रीद वाक्य आहे. आम्ही हे ब्रीद वाक्य अगणित वेळा वाचले असेल. ह्याचा सहज आणि सुलभ अर्थ "हसत राहा " असाच असेल अशा कल्पनेत आम्ही होतो. मुलांची शाळा आणि मुलांनी हसत खेळत अभ्यास करावा असे ह्या  विद्यालयाचे उद्दिष्ट असावे आणि म्हणूनच "हसत राहा " असा संदेश दिला असावा असेच आम्हाला नेहमी वाटत आले. ह्या ब्रीद वाक्यामागील गर्भित संदेश काय आहे हे समजावून घेण्याचा  किती पालकांनी मनापासून प्रयन्त केला असेल कोण जाणे. आमहाला तो  अर्थ कळवून घेण्याची कधी इच्छाच झाली नाही. शाळेत प्रवेश पाहिजे पण शाळेच्या बोधचिन्ह आणि ब्रीद वाक्याबद्दल मात्र काहीच उस्तुकता नाहीं …. हा कसला आपलेपणा !!!

लेकीनी दहावी पर्यंतचे शिक्षण चिन्मय विद्यालयात घेतले. ह्या गोष्टीला आता जवळ जवळ दहा बारा वर्षे होवून गेली. काळाच्या ओघात आणि संसाराच्या भोवऱ्यात सापडलेल्या आमच्यासारख्या पालकांना "Keep Smiling " ह्याचा पूर्णपणे विसर पडला होता. आणि अचानक कुठून तरी वीज चमकली, आमच्या डोक्यात लक्ख प्रकाश पडला आणि आम्हाला ह्या "Keep Smiling" मागचा संदेश कळला. हेच ज्ञान आम्हाला जर १९९४-९५ लेकींच्या प्रवेशाच्या वेळीच जर झाले असते  तर ह्या शाळेकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोणच बदलला असता. शाळेतल्या स्पर्धा, त्यात हमकावून लेकीनी मिळवलेली कित्येक बक्षिसे, कृत्रिमरीत्या हजेरी लावलेली पालक-शिक्षक ह्यांची meetings आणि वार्षिक समारंभ …. ह्या  अशा अनंत रटाळ कार्यक्रमात आम्ही काय कमावले ह्या पेक्षा आम्ही काय गमावले ह्याची जाणीव मला फक्त दोन तीन दिवसापूर्वीच  झाली. ती अशी …

हल्ली आम्ही जोडीने पारमार्थिक वाटेवर वाटचाल करण्याचा प्रयन्त करत आहोत. नियमितपणे दोन-तीन पुस्तकांचे वाचन करतो. अशापैकी एक पुस्तक  स्वामी चिन्मयानंदांचे श्रीमद्भवदगीतेवरील (The  Holy Geeta - Commentary by Swami Chinmayananda) भाष्य आहे. त्यातील अध्याय २ मधील २७ वा श्लोक समजावून घेतांना अचानक आम्हाला "Keep Smiling " ह्यामध्ये असलेला संदेश कळाला. तो असा :

जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।  तस्मादपरीहार्येsथ्रे न त्वं शोचितुमर्हसि ।। २ ७ ।। 

jātasya hi dhruvo mṛtyur dhruvaṃ janma mṛtasya ca / tasmād aparihāryerthe na tvaṃ śocitum arhasi 2.27

अर्थ : जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे व जो मृत्यू पावला आहे त्याला जन्म निश्चित आहे.  जन्ममृत्युचे हे चक्र असेच फिरत राहणार आहे. तेंव्हा ज्यावर काही उपाय नाही, जी गोष्ट अटळ आहे त्याचा शोक करणे अयोग्य आहे. 

ह्यावर स्वामीनी जे काही भाष्य केले आहे ते अप्रतिम आहे आणि तेथेच आम्हाला "Keep Smiling " चा अर्थ कळाला. ते सांगतात , "Thus, if life, be, in its very nature, a stream of births and deaths, against this inevitable arrangement, no intelligent man should moan. Standing out in the blazing summer sun, one must, indeed be stupid to complain against its heat and glare. Similarly, having come to life, to complain against the very nature of life is, indeed, an inexcusable stupidity. On this score also, to weep is to admit one's own ignorance. Krishna's life, is, on the whole, a message of cheer and joy. His doctrine of life is an insistence upon, "to weep is folly and to smile is wisdom." So, "Keep Smiling" seems to be Krishna's philosophy put in two words, and that is why , seeing his dear friend weeping in life, the Lord gets whipped up, as it were, to an enthusiasm to save Arjuna from his delusions and bring him back to the true purpose of life."  

म्हणजे Keep Smiling चा अर्थ नुसता हसत रहा एवढाच नसून आपल्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची तक्रार न करता हसत हसत अगदी आनंदाने उल्हसीत होवून जगावे. हाच खरा मानव जन्माला येण्याचा हेतू आहे. अर्थात हे सांगणे जितके सोपे तितकेच अनुकरण करायला कठीण आहे. परंतु प्रयन्त करायला काय हरकत आहे ?     


गुढी पाडवा !



चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९३५

महत्वः
वर्षारंभ करण्याच्या अनेक पद्धती आहेत. ख्रिश्चन कॅलेन्डर नुसार १ जानेवारी हा वर्षाचा पहिला दिवस मानला जातो, आर्थिक वर्षारंभ १ एप्रिला होत असतो, हिन्दु वर्षारंभ चैत्र शुद्ध प्रतिपदेला होत असतो, तर व्यावहारिक वर्षाचा आरंभ हिन्दु मान्यतेनुसार कार्तिक महिन्याच्या पहिल्या दिवसापासुन होतो. ह्या सर्व पद्धतींमध्ये वर्षभरात एकूण बारा महिने असतात. पण ह्या सर्वांत प्रश्न असा पडतो की, वर्षात बाराच महिने असतात हा सिद्धांत प्रथम कुणी मांडला? व सर्व जगाने ते मान्य कसे केले? निःसंशय ही संकल्पना सर्वप्रथम आपल्या अतिप्राचिन वेदांतूनच आली आहे. वेदांनुसार वर्षांत बारा महिने असतात हे सर्वांनी मान्य केले. आणि या सर्वांत वर्षारंभासाठी हिंन्दु मान्यतेनुसार सर्वात योग्य दिवस हा चैत्र शुद्ध प्रतिपदा मानला गेला आहे. हिन्दु मान्यतेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा हाच हिन्दु नववर्षाचा पहिला दिवस का असावा याला अनेक नैसर्गिक, ऐतिहासिक, आणि अध्यात्मिक कारणे आहेत. 

नैसर्गिकः
चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी (पाडवा) सूर्य वसंत ॠतूत प्रवेश करतो (विषुववृत्त व रेखावृत्त यांचा छेदनबिंदू) व वसंत ॠतूला सुरुवात होते. श्रीमद् भगवतगीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, "सर्व ॠतूत ऊल्हासदायक वसंत ॠतू हे माझे प्रकटीकरण आहे". ह्या ॠतूत सर्व वातावरण ऊल्हासित व आल्हाददायक असते. शिषिर ॠतूत झाडांची पाने गळतात व पाडव्याला, वसंताचे आगमन होउन त्यांना नविन पालवी फुटायला सुरुवात होते. 

ऐतिहासिकः
ह्याच दिवशी रामाने वालीचा वध केला होता. ह्याच दिवशी भगवान श्रीराम सर्व राक्षसांचा व रावणाचा वध करुन अयोध्येला परतले होते. शालिवाहन राजाने त्याच्या शत्रूंना परभूत केल्यानंतर शालिवाहन शकाचा (दिनदर्शिकेचा) आरंभ म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. 

अध्यात्मिकः
विश्वाची निर्मीतीः पाडव्याच्या दिवशीच ब्रम्हदेवाने विश्वाची निर्मीती केली असे मानले जाते म्हणूनही हा दिवस नववर्षारंभ म्हणून साजरा केला जातो. 

साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्तः हिन्दु मान्यतेनुसार गुढिपाडवा, दसरा (विजया दशमी) आणि कार्तिक महिन्याच्या पहिल्या दिवसाचा (बलिप्रतिपदेचा) असे प्रत्येकि एक आणि अक्षय्य तृतिया अर्धा मुहुर्त असा अंतर्भाव करुन "साडेतिन मुहुर्त" योजिले गेले आहेत. या साडेतिन मुहुर्तांचे वैशिष्ट्य असे की या दिवशी कोणत्याही धार्मिक विधी करायला शुभ मुहुर्त काढावा लागत नाही. या साडेतिन दिवसातला प्रत्येक क्षणच शुभ मानला जातो.

गुढीपाडवा साजरा करण्याच्या पद्धतीः 
अभ्यंगस्नानः ह्या दिवशी पहाटे लवकर उठून तेल व उटण्याने अभ्यंगस्नान केले जाते. नित्याच्या स्नानाने रज आणि तम गुण १/१,००,००० % (एक लक्षांश्) ने सौम्य होतात, तर सत्व गुण तितक्याच पटीने वाढतात व त्यांचा प्रभाव फक्त तीन तास टिकतो. हाच प्रभाव तेल व उटण्याने अभ्यंग स्नान केल्यास चार ते पाच तास टिकतो. अभ्यंगस्नानात तेलाने केलेल्या मालिश मुळे त्वचेकडून तेल शोषले जाते व त्यानंतर केलेल्या कोमट पाण्याच्या स्नानाने त्वचा तुकतूकीत व तजेलदार बनते. तेलाच्या मालिश नंतर केलेल्या स्नानाने त्वचा व केसांकडून हवा तेवढाच तेलकटपणा राखला जातो. म्हणुनच अंघोळीपूर्वी तेलाने मालिश करणे कधीही उत्तम. अंघोळीनंतर तेलाने मालिश करणे कधीही अयोग्य. धर्म ग्रंथांनुसार अभ्यंगस्नानसाठी पाच दिवस सांगितले आहेतः १. नववर्षारंभ अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा किंवा गुढीपाडवा (संवत्सर). २. वसंतोत्सवारंभ अर्थात फाल्गुन शुक्ल प्रतिपदा किंवा धुलिवंदन. ३. दिवाळीचे तीन दिवस; अश्विन शुक्ल चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अश्विन अमावस्या (लक्ष्मी पुजन), व कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलिप्रतिपदा).

दारावरील सजावटः अभ्यंगस्नानानंतर दारावर आंब्याच्या डहाळ्या व फुलांचे तोरण बांधले जाते. ह्या दिवशी लाल रंग शुभ असल्याने तोरणात शक्यतो लाल फुलांचा वापर करतात.

धार्मिक पूजाः पाडव्याच्या दिवशी महाशांती पूजा व होम हवन केले जाते. होम हवनात ब्रम्हमंत्र व विष्णू महामंत्राचा जाप केला जातो. त्यानंतर ब्राम्हणांना दक्षिणा अथवा धर्मग्रंथ किंवा पुराणांच्या स्वरुपात दान ऐपतीप्रमाणे दान केले जाते. असे म्हटले जाते की शांती केल्याने सर्व पाप धुतले जातात, पापवृत्ती नाहीशी होते, आरोग्य सुधारते व संपन्नता वाढते. तसेच संवत्सर पूजा केल्याने पाप धुतली जातात, आयुष्यमान वाढते, स्त्रीचे सौभाग्य वाढते व मनःशांति लाभते. 

गुढी उभारणेः प्रत्येक घरावर उभारलेली गुढी (किंवा ब्रम्हध्वज) ही भगवान श्रीरामचंद्रांच्या रावणावरील विजयाचे व त्यांच्या अयोध्यागमनाचे प्रतिक मानले जाते. विजयाचे प्रतिक असल्या करणाने गुढी उंचावर उभारण्याचा प्रघात आहे. गुढी उभारतांना साधारणपणे पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे भरजरी वस्त्र एका काठीवर बांधुन कडुनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या व फुलांच्या हाराने गुढी सुशोभित केली जाते व त्यानंतर चांदीचे अथवा तांब्याचे भांडे त्यावर उपडे ठेवुन गुढी उभारली जाते. त्यानंतर गुढीची मनोभावे पूजा केली जाते. ह्या दिवशी गुढीच्या माध्यमातून प्रजापति लहरी घराच्या वातावरणात प्रवेश करतात व घरात संपन्नता व सुबलता आणतात. पुढे हेच भांडे पिण्याच्या पाण्यासाठी वापरले गेल्यास त्यातल्या पाण्यावरील प्रजापति लहरींचा प्रभाव आपण वर्षभर अनुभवू शकतो.

।। गणपती बाप्पा मोरया , मंगलमूर्ती मोरया ।। 
                                                    (courtesy: Shree Siddhivinayak Ganapati - Mumbai )

Friday 5 April 2013


शेवटचे दोन चमचे …


शुक्रवार …. मिडल इस्ट मधला आठवड्यातील सुट्टीचा पहिला दिवस !! आपल्याकडे weekends  हे नेहमी साफसफाई साठी ठरलेले असतात . लहानपणी रविवारी सकाळी दहा / अकरा वाजेपर्यंत आम्हाला अगदी दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत सुद्धा कधी झोपायला परवानगी मिळत नसे. वडील सकाळी सकाळी आमच्या हातात धूळ पुसायचा कपडा हातात द्यायचे आणि दुपारच्या वेळी आमची आई आमच्या हातात embroidery ची सुई हातात द्यायची !!! अशा दिनचर्येत बाकीच्या दिवसात सकाळी सहा वाजेपर्यंत झोपायला मिळाले तरी आम्ही एकदम खुश !! हल्लीच्या दिवसात हे सर्व बदलले आहे. नोकरी करणारे आई-बाप स्वतःला विश्रांती मिळावी म्हणून मुलांना उशिरापर्यंत झोपायची अगदी बेशक परवानगी देतात. आणि अशाप्रकारे  उशिरा सुरु झालेला दिवस , 'मला आज स्वयंपाक करण्याचा अगदी कंटाळा आला आहे . आपण बाहेर जेवायला जावू या का ?' असे म्हणत म्हणत अगदी पार चित्रपटाच्या रात्री च्या शो पर्यंत येवून ठेपतो . ह्या सर्व मजा मस्ती मध्ये वेळ कसा निघून जातो कळतच नाही आणि घरातल्या बारीक सारीक गोष्टी  कडे नकळत दुर्लक्ष्य होते . मुलांच्या मनावर या अशा दिनक्रमाचा ठसा  कायमचा बसतो आणि मोठेपणी अगदी विनासायास ह्या सर्व कृतींचे अनुकरण होत जाते. आम्ही पण ह्या 'मस्त मजेच्या' जीवनाचा  थोडे दिवस का होईना अनुभव घेतला आणि लवकरच त्यातून बाहेरही पडलो. कारण आमच्या मनावर झालेले संस्कार  वेगळे होते. घरात तेलाची बाटली संपली कि ती उलटी करून त्यातला एक एक थेंब वाटीत गोळा होईपर्यंत बाटली मी अजूनही बाहेर फेकत नाही. गाळणीतल्या  चहा पत्तीचा चमच्याने दाबून दाबून पूर्णपणे अर्क काढून  कोरडी झाल्यावर मगच ती कचऱ्याच्या बकेट मध्ये फेकली जाते. डब्यातले दही संपल्यावर त्यात पाणी घालून पूर्णपणे घुसळून झाल्यावरच तो डब्बा फेकला जातो. बऱ्याचदा  माझ्या अशा ह्या सवयींची लोकांनी चेष्टा  केली आहे. परंतु काय करणार 'सुंभ जळतो पण पीळ जळत नाही अशातली गात झाली आहे. असू देत !!!    

तर अशा एका शुक्रवारी सकाळचा चहा झाल्यावर घरातला शेवटचा दुधाचा डब्बा पूर्णपणे रिकामा करून कट्ट्यावर ठेवला. परंतु नेहमी प्रमाणे उलटा करून त्यातला एक एक थेंब मात्र गोळा केला नव्हता. कसे कुणास ठावूक माझ्या आवडत्या सवयीने मलाच हळुवारपणे हुलकावणी दिली होति. सकाळची गाणी ऐकत , वर्तमान पत्र चाळत आणि पतीदेवाबरोबर गप्पा मारता मारता काही तरी मस्त पैकी चवदार करून खायची इच्छा झाली. Sweet Corn & Green Capsicum Rice ची recipe करून बघायचे ठरवले. लागणारी सर्व सामग्री जुळवून घेतांना अचानक लक्षात आले कि केशर उगाळण्या साठी लागणारे दोन चमचे दुध नाही आहे. गडबडीने माझा हात कट्ट्यावर ठेवलेल्या रिकाम्या दुधाच्या डब्ब्या कडे अगदी अधिरतेने नकळत गेला. देवाचे नाव घेत डब्बा उस्सुकतेने उलटा केला आणि जोराजोराने वरून थोपटला. माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात मी इतकी आशावादी कधीच झाली नव्हते. त्या दोन चमचे दुधाच्या गरजेने माझ्या आशावादी स्वभावाची अगदी जणू काही परीक्षाच घ्यायची ठरवली होती. हुलकावणी दिलेल्या सवयीने मिश्किलपणे हसत हसत माझी मदत केली आणि बरोब्बर दोन चमचे दुध त्या रिकाम्या डब्ब्यातून काढून दिले. ख़ुशी खुशीने तो तीन रंगी भात केला आणि नवरा-बायकोने मिळून मजेत खाल्ला. स्वयंपाक घरात झालेल्या माझ्या ह्या फजितीची पतीदेवाला जरा सुद्धा कल्पना नव्हती. 

तात्पर्य, ह्या घटनेनी मला काय शिकवले ?…. आशावादी असणे चांगले आणि कधी कधी सुंभाबरोबर पीळ जळला तरी आपला फायदा होण्याची शक्यता असते !! आता मला समजले कि, का माझ्या दोन्ही लेकी मला सारखं सांगत असतात कि, "अम्मा, it's perfectly ok to be imperfect ." ह्या पुढे जीवापाड जपलेल्या सवयी मी जरा जपून वापरण्याचा निर्णय केला !!!  पटलं ना तुम्हांला पण ?