Monday 27 August 2012


विनोदी माणस


दुबईमध्ये, आमच्या बिल्डींगमध्ये आमच्याच वयाचे एक जोडप आमच्याच मजल्यावर राहत. एकदम खुशाल नवरा-बायको आहेत. बुवांनी तर आमचे मन पहिल्याच भेटीत जिंकून घेतलं. ते इतके विनोदी बोलतात कि , त्याचं बोलणं ऐकल्यानंतर आम्ही इतके हसतो कि आमचे गाल, तोंड सर्व काही दुखायला लागत. पहिल्याच भेटीत त्यांनी आम्हाला सांगितले, "दुबई में नये आये हो? अभी आप को हर वक्त गेस्ट को वेलकम करने के लिये तैयार रहना पडेगा. ऐसा हैं कि, इंडिया में दो चीजे करनी बहुत जरुरी हैं, एक- गंगा स्नान और दुसरी-दुबई कि ट्रीप. ये दो चीजे नही कि तो हम स्वर्ग में नही जा सकते ." दुसऱ्यांदा भेटले तेव्हा म्हणाले , "कैसा हैं आपका बैल और गाव ? आज कल बैल और गाव दोनो भी देखने को भी नही मिलते. " माझ्या नवऱ्याला ते काय विचारात आहेत हे पटकन कळाले नाहीं. पण नंतर लक्षात आले कि, त्यांना  पहिल्या भेटीत सांगितले होते कि आम्ही बेळगावचे म्हणून!! ते त्यांनी विनोदी भाषेत विचारले,  "कैसा हैं आपका बैल और गाव (बेळ - गाव)?"  नंतर आनंद नी त्यांना विचारले,"आपका खाना हुवा?" त्यावर त्यांचे उत्तर इतके हल्लीच्या परिस्थितीला अनुसरून होते कि त्यांच्या बुद्धीचे कौतुक करावे तितके कमी. ते म्हणाले, " पहिले के जमाने में घरमे पकाते थे और शौचालय के लिये बाहर जाते थे. आज कल, खाना बाहर खाते हैं और शौचालय के लिये घर आते हैं. आज कल घरमे कोई किधर पकाता हैं? " त्यांना म्हंटल, "आप आपके पत्नी के साथ कभी हमारे घर आइये." त्यावर त्याचं उत्तर ..."मीडल इस्ट में दो चीजोका कभी कोई भरवसा नही कर सकते. एक, इधरका हवामान और दुसरा, मेरे पत्नी का मूड. तो उसको आपके घर लेके आने का मैं कोई आश्वासन नही दे सकता." एक क्षण असे वाटले कि, ह्यांची भेट आपल्याला दररोज झाली तर काय मस्त मजा येईल. खरच "विनोदी स्वभाव " ही एक देवानी दिलेली देणगीच आहे. ती सर्वांच्या कडे नसते. खूप थोडया भाग्यशाली लोकांनाच हा वर देव देतो. असे लोक आपल्याला भेटतात हे सुद्धा आपले भाग्यच समजायला पाहिजे. नाहीतर, ह्या स्वार्थी दुनियेत जिथे माणूस वेड्यासारखा विषयामागे धावतो आहे तिथे त्याला दुसऱ्यांना हसवण्यास वेळ कुठे आहे?  

९) श्री आशापुरक गणेश, बीड-महाराष्ट्र : - (Shree Aashapurak Ganesh, Beed-Maharashtra.)
नंदक नावाच्या एका नगरात “ दुष्ट ” नावाचा मच्छिमार रहात होता. स्वतःच्या नावाप्रमाणेच त्याचा स्वभाव होता. गावातील सगळ्यांना त्रास देणं आणि त्यांच्याकडुन खंडणी वसुल करणं हे त्याचं दरदिवशीचं काम. शेवटि मग गावातील सगळ्या जणांनी एकत्रीत येऊन एकजुटिने त्याला गावाबाहेर हाकलुन दिलं. मग तो दुष्ट त्यानंतर दुसर्या गावात गेला आणि तिथे सुद्धा त्याने तीच वाईट कामे सुरु केली. एकदा तो जंगलात शिकारीला जात असताना चिखलाने भरलेल्या खड्यात पडला. म्हणुन अंगावरील चिखल साफ करण्यासाठि तो जवळच असेलल्या तलावात आंघोळीसाठि गेला. तेवढ्यातच जवळुनच जात असलेल्या मुद्गल ऋषिंवर त्याची द्रुष्टि पडली. मुद्गल ऋषि चालता चालता ॐ ॐ ॐ ॐ ॐ असा मंत्र जाप करत होते. मुद्गल ऋषिंना लुबाडण्याच्या हेतुने दुष्टाने त्यांच्यावर अस्त्र उचललं. पण त्याच क्षणी त्याच्या हातातील संपुर्ण शक्ती नाहिशी होउन हात सुन्न झाला. मग मुद्गल ऋषिंनी आपल्या मंत्र सहाय्याने त्याच्या अंगावरुन हात फिरवताच तो पुर्ववत झाला. दुष्टाला आपण केलेल्या कृतीबद्दल खुप वाईट वाटलं होतं. म्हणुन तो लगेचच मुद्गल ऋषिंच्या पायवर डोकं ठेऊन त्यांची माफि मागु लागला दयेची भिक मागु लागला.

मुद्गल ऋषिंनी मग त्याला एक सल्ला दिला. ते म्हणाले, तु काहि कमळाची फुले आणि दुर्वा गोळा करुन आण आणि श्री गणेशाची पुजाअर्चना सुरु कर त्यामुळे तु दोषमुक्त होशील. ऋषिंनी सांगितल्या प्रमाणे मग दुष्टाने फुले आणि दुर्वा गोळा करुन आणुन श्री गणेशाची पूजा करणं सुरु केलं. तो दिवस होता श्री गणेश चतुर्थी.

मग मुद्गल ऋषिंनी एक झाडाची सुकलेली फांदि त्याच्यासमोर ठेवली आणि दुष्टाला सांगितले कि, जो पर्यंत ह्या फांदिला पाने फुटत नाहित तो पर्यंत तु “ श्री गणेशाय नमः ” असा अखंड मंत्रजाप कर. असे सांगुन ऋषि तेथुन निघुन गेले.

मुद्गल ऋषिंच्या आज्ञेनुसार आणि आपल्या वरील सारे दोष नष्ट करण्याच्या हेतुने, तसेच श्री गणेशाची कृपाद्रुष्टि लाभावी ह्या आशेने मग दुष्टाने “ श्री गणेशाय नमः ”असा अखंड मंत्रजाप चालुच ठेवला. खुप दिवसांनंतर मुद्गल ऋषि परत त्या मार्गाने जात असताना त्यांना एक मातीचं वारुळ द्रुष्टिस पडलं आणि सोबतच त्यातुन मंत्रजापाचा आवाज देखिल ऐकु येत होता. आणि त्यांनी ठेवलेल्या सुक्या फांदिला पाने देखिल फुटलेली होती. ऋषिंनी मग हळुवारपणे त्या वारुळावरील वाळु बाजुला सारली आणि त्यांना द्रुष्टिस पडले कि दुष्ट श्री गणेशाच्या मंत्रजापात अगदि मंत्रमुग्ध होऊन गेला होता. मुद्गल ऋषिंनी मग आपल्या कमंडलुतील पवित्र पाणी त्यावर शिंपडुन त्याला जागं केलं. अखंड मंत्रजापानंतर दुष्टाच्या दोनहि भुवयांच्या मधुन एक सोंडेसारखा भाग आला होता. ते पाहुन मुद्गल ऋषिंनी दुष्टाचे नामकरण “ भृशुंडि ” असे केले.

भृशुंडिने मग तिथे श्री गणेशाच्या एका सुंदर मूर्तीची स्थापना केली. आणि आपण केलेल्या अखंड मंत्रजापानंतर श्री गणेशाची कृपाद्रुष्टि लाभुन आपली आशा पूर्ण झाली, म्हणुन त्या श्री गणेशाला त्याने नाव दिले, श्री आशापुरक गणेश.

महाराष्ट्रातील बीड पासुन साधारण १० किलोमीटर अंतरावर श्री आशापुरक गणेशाचे हे मंदिर आहे. मूर्तीचे रुप अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे. चतुर्भुज आणि डाव्या सोंडेची मूर्ती पाहुन गणेशभक्तांना आपली आशा पुर्ण झाल्याचा आनंद मिळतो.
।। ॐ गं गणपतये नमः ।। 

Sunday 26 August 2012


नड

श्री गोंदवलेकर महाराजांच्या "प्रवचने" या पुस्तकाच्या १९ ऑगस्टच्या पानावर त्यांनी, माणूस स्वताच्या सवयींचा / जरुरतींचा / सख्त नडीचा कसा गुलाम बनतो आणि हळू हळू त्याच्या नकळत त्या गोष्टीवर / विषयावर त्याचे कसे प्रेम बसते, हे फार छान समजावून दिले आहे. ते असे, .....


खरच  महाराजांनी सांगितल्या प्रमाणे, आपल्याला देवाची कधी नडच भासत नाहीं म्हणून आपल्याला देवाचे प्रेम लागत नाहीं. किती तथ्य आहे ह्या उपदेशात !! 

८) कळंबचा ‘चिंतामणी’ , यवतमाळ (Chintamani of Kalamb, Yavatmaal, Maharashtra): - 
यवतमाळहून २३ कि.मी. अंतरावरील असलेला हा कळंबचा ‘चिंतामणी’ . ह्या गणपतीच्या दर्शनासाठी गणेशोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. गणेशोत्सवात तर कळंबला महायात्रेचेच स्वरूप प्राप्त होतं. ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत येणाऱ्या भक्तांचा लोंढा आवरणे म्हणजे फारच कठीण काम आहे.

कदंब या वृक्षापासून कळंब, असे नाव पडल्याची या शहराची आख्यायिका आहे. कापूस व गणिताचा शोध ग्रत्समद ॠषींनी याच कळंबमध्ये लावल्याचे पौराणिक दाखले आहेत. कळंब म्हणजे १४ चावडय़ा आणि ३२ महालांचे गाव, असे आजही म्हटले जाते. यवतमाळचे कवी डॉ. गोपाल पाटील यांनी कळंबच्या चिंतामणीचे महात्म्य लिहिले आहे. त्यात अनेक पौरणिक दाखले दिले आहेत. कळंबचा ‘चिंतामणी’ जमिनीपासून ७० फूट खोल असलेल्या गाभाऱ्यात आहे. ३२ पायऱ्या उतरून ‘गणेशकुंड’चे दर्शन घेऊनच मग चिंतामणीचे दर्शन घडते. हेमाडपंथी मंदिराची आठवण करून देणाऱ्या चिंतामणी मंदिराची रचना फार प्राचीन काळाची आहे. दर १२ वर्षांनी ‘गणेशकुंड’मध्ये गंगावतरण होते व गंगेचे पाणी ‘चिंतामणी’चा पादस्पर्श करते, अशीही एक आख्यायिका आहे. ।। ॐ गं गणपतये नमः ।।


सवय

एकदा एक माणूस कोकिळेला म्हणाला - तू इतकी काळी नसतीस तर किती बर झाल असतं. समुद्राला म्हणाला तुझ पाणी खारट नसते तर किती बर झाल असतं. गुलाबाला म्हणाला तुला काटे नसते तर किती बर झाल असतं. तेव्हा ते तिघे एकदम म्हणाले , "अरे माणसा, तुझ्याकडे दुसऱ्याच खुसपट काढण्याची सवय नसती तर किती बर झाल असतं."

खरच, दुसऱ्याचे दोष काढण्याचे जर माणसाने बंद केले तर, आपल्या जीवनातील सर्वच कठीण प्रसंग आपल्याला टाळता येतील आणि प्रत्येकाचे जीवन कसे एकदम सुखमय आणि आनंदी होईल. अर्थात, अध्यात्मात हेच तर सांगितले आहे कि, "साधनेत तुम्हाला खरीच जर प्रगती करावयाची आहे तर, परनिंदा, परधन आणि परस्त्री यांचा सर्व प्रथम त्याग करा." 

७) श्री नवश्या गणपती, आनंदवल्ली, नाशिक. (Shree Navashya Ganapati, Aanandvalli, Nashik):-
श्री नवश्या गणपती मंदिर हे नाशिकमधिल आनंदवल्ली येथे गाणगापुर-सोमेश्वर मार्गावर आहे. ह्या मंदिराचा इतिहास सुमारे ३०० ते ४०० वर्षांचा आहे. पेशवे काळामध्ये हे मंदिर बांधले गेले असुन अत्यंत जागृत असे हे देवस्थान आहे. श्री नवश्या गणपती हा नवसाला  पावतो असा अनुभव येथील हजारो भाविकांना आलेला आहे.

इ.स. १७७४ मध्ये फाल्गुन महिन्यात श्री राघोबा दादा आणि त्यांची पत्नी आनंदिबाई ह्यांनी ह्या मंदिराची स्थापना केली होती. आनंदवल्ली हे गाव श्रीमंत माधवराव पेशवे यांचे आजोळ. त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई श्री नवश्या गणपतीच्या निस्सिम भक्त होत्या. राघोबा दादा आणि आनंदिबाई ह्यांना १५ ऑगस्ट १७६४ रोजी मुलगा झाला त्याचे नाव विनायक असे ठेवण्यात आले. मुलाच्या जन्मप्रित्यर्थ ह्या गावाचे पुर्वीचे नाव बदलुन आनंदवल्ली असे ठेवण्यात आले. त्याच दरम्यान श्री नवश्या गणपती मंदिराची पण उभारणी करण्यात आली.

गोदावरी नदिच्या तिरावर असलेले हे मंदिर पुर्वाभिमुख असुन मंदिरात प्रसन्न अशी श्री गणरायाची मूर्ती आहे. मूर्तीचे डोळे अतिशय सजिव भासत असुन मूर्तीदेखिल अतिशय आकर्षक आहे. डाव्या सोंडेच्या गणरायाच्या एका हातात पाश, दुसऱ्या हातात फुल, तिसऱ्या हातात मोदक आणि एक हात सतत भक्तांना आशिर्वादाचा प्रसाद देत असतो. प्रत्येक हातात एक कडं असुन डोक्यावर मुकुट आहे. अशी हि आकर्षक मूर्ती, जिच्यावरुन भक्तांची नजरच हटत नाहि.

राघोबा दादांनी आनंदवल्लीत एक मोठा राजवाडा देखिल बांधला होता. ह्या राजवाड्याच्या पश्चिमेस (पाठिमागे) उभे राहिल्यास श्री नवश्या गणपतीचे दर्शन होत असे. सन १८१८ साली इंग्रजांनी पेशवाई बुडवली आणि राजवाडादेखिल जाळला. मात्र परिसरातील मंदिरे शाबुत राहिली. श्री नवश्या गणपती मंदिर हे पेशव्यांच्या कारकिर्दिची साक्ष देत आजहि दिमाखाने उभे आहे. ।। ॐ गं गणपतये नमः ।।

प्राजक्ताची फुलें

प्राजक्ताची नाजुक फूलं 
काही क्षणासाठीच फुलतात
हक्काची डहाळी सोडून
इतरांच्या अंगणी पडतात... 

वाचल्यावर वाटल, आम्हा स्त्रियांचं जीवनही असंच असते का ? वयाच्या २५ वर्षापर्यंत आई-वडिलांच्या मायेच्या उबेखाली वाढायचं आणि एक दिवशी अचानक आपल म्हणून जे जे काही आहे ते सर्व सोडून ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा लपवून दुसऱ्याच्या घरात पदार्पण करायचं आणि अगदी त्याच दिवसापासून , जे जे काही नवीन असतं त्याला आपलंस करून बायको, मैत्रीण, सून, भावजय, नणंद, आई...अशा अनेक प्रकारच्या भूमिका सफाईत पणे हसत खेळत निभावून न्यायच्या. मनात फक्त एकाच गोष्टीचा ध्यास...तो म्हणजे, मी सर्वाना सदैव सुखी ठेवले पाहिजे. 

६) लक्षविनायक, औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत (Lakshya Vinayak, Aurangabad, India) :-
तारकासुर नावाचा राक्षस देवतांना आणि ऋषिमुनींना सतत त्रास देत होता. त्यांच्या प्रत्येक शुभ कार्यामध्ये विघ्न आणत होता. त्यामुळे ऋषिमुनींचे तप आणि यज्ञासारखी शुभ कामे कधीहि पूर्ण होत नसत. त्यावेळेस नारदमुनी कार्तिकेय कडे आले. नारदमुनींनी तारकासुराचा चाललेला सर्व अघोरी प्रकार कार्तिकेयना कथन केला. नारदमुनींनी सांगितलेला सर्व प्रकार ऐकुन रागाने लालबुंद झालेले कार्तिकेय आपले आई-वडिल शिव-पार्वती यांच्याकडे येऊन त्यांचा आशिर्वाद घेतला आणि लगेचच तारकासुराचा वध करण्यासाठि प्रस्थान केले. परंतु कार्तिकेयनी सोडलेल्या कुठल्याहि अस्त्राचा तारकासुर राक्षसावर काहिहि परिणाम होत नव्हता. प्रत्येक अस्त्र निष्फळ ठरत होतं. त्यामुळे नाराज होउन कार्तिकेय परत आले. राक्षसाला वध करुन संपवण्यात अपयश आल्यामुळे कार्तिकेय आपले पिता भगवान शंकरांकडे त्यांचे मार्गदर्शन घेण्यास आले. भगवान शंकरांनी तेव्हा त्याला त्याची एक छोटिशी चुक सांगितली कि, बाळा कार्तिकेय युद्धभुमीवर जाण्याअगोदर तु ॐ कार गणेशाची प्रार्थना केली नाहिस. तेव्हा तु आता पवित्र अश्या घृष्णेश्वर येथे जाऊन ॐ कार गणेशाचा मंत्रजाप कर, त्याची पूजा कर. आणि मग बघ.

कार्तिकेय म्हणजेच बाळ स्कंद खुप खुष झाला आणि पित्याच्या आज्ञेनुसार त्वरीतच घृष्णेश्वरला जाऊन त्याने तब्बल एक लक्ष (एक लाख) वेळा ॐ कार गणेशाचा मंत्र जपला. श्री गणेश प्रसन्न होऊन लगेचच कार्तिकेयच्या समोर अवतरीत झाले. श्री गणेशाने मग कार्तिकेय जवळ असलेल्या बाणाला पवित्र स्पर्श केला. तसेच कार्तिकेयसाठि वाहन स्वरुपात मोर सुद्धा भेट म्हणुन दिला. कार्तिकेय लगेच मोरावर बसुन तारकासुराचा वध करण्यास निघाला. श्री गणेशाने स्पर्श केलेला बाण कार्तिकेयने तारकासुरावर सोडला आणि त्यातच तारकासुर मारला गेला. तारकासुराच्या वधामुळे सर्व देवतांमध्ये आणि ऋषिमुनींमध्ये प्रसन्नता पसरली. सारेजण तारकासुराच्या त्रासातुन मुक्त झाले होते. ॐ काररुपी श्री गणेश हे एक लक्ष जपनाम केल्यामुळे प्रसन्न झाले होते. म्हणुन श्री गणेशाला लक्षविनायक असेहि नाव पडले. औरंगाबाद, महाराष्ट्र येथे स्थित असलेल्या स्वयंभु श्री लक्षविनायकाची शेंदुर लेपित मूर्ती डाव्या सोंडेची असुन चार हात आणि अर्धमांडि घालुन बसलेली अशी आहे. अतिशय प्रसन्न वाटणारी श्री लक्षविनायकाची मूर्ती अखंड जप करणार्या सर्व भक्तांचे कल्याण करते. ।। ॐ गं गणपतये नमः ।।

Saturday 25 August 2012


अवसरवादी दुनिया 

दोन दिवसापूर्वी, आमच्या घरी कामाला येणारा मुलगा ठरल्या वेळेपेक्षा उशिरा आला. जेव्हा आला , माझ्या लक्षात आले कि त्याचा चेहरा एकदम कोमेजून गेला आहे. चिंतीत चेहऱ्याने मी त्याला ह्याचे कारण विचारले. त्याने सांगितले कि, एका साहेबाने त्याला त्याच दिवशी सकाळी २५० Dhs  दिले होते आणि ते तो कुठेतरी हरवून आला होता. सगळीकडे शोधल्यावर सुद्धा त्याला ते मिळाले नाहीत. नेहमी, कचऱ्याची पिशवी अगदी दोनच बोटात पकडून नेण्याऱ्या त्या मुलाने त्या दिवशी संपूर्ण कचऱ्याचा डब्बा पूर्णपणे पालथा पडून हाथ घालून २-३ वेळेला उचकून बघितला होता. हताश झालेला माणूस काहीही करण्यास करायला तयार होतो, ह्याचे हे ज्वलंत उदाहरण. देव करो आणि अशी परिस्थिती आपल्या शत्रूवर सुद्धा येवू नये. त्यात त्याला ते पैसे त्याच्या आईला पाठवून द्यायचे होते. ऐकून वाईट वाटले. हल्ली हल्लीच आध्यत्मिक वाचन सुरु केल्यामुळे, त्या त्रोटक्या अभ्यासाच्या आधारावर त्याला एक छानसा उपदेश केला. खर म्हणजे त्याला त्या उपदेशाची जरा सुद्धा आवश्यकता नव्हती. त्याला म्हटलं, "अरे, ते पैसे तुझे नव्हते म्हणून समज. आणि, असं समज कि, देवाच्या कृपेने पुढे होणारी मोठी बला छोट्यावर वर निभावून गेली." किती सहजपणे सगळ सांगितलं मी त्याला. हे ऐकल्यावर त्याच्या चेहऱ्यावर एक गुढतेच हास्य होतं. खरच ते पैसे हरवल्यानंतर झालेल्या दुख्खाची मला कशी कल्पना असणार. त्याच्या दुख्खाची आपण चेष्टा तर केली नाहीं ना? असे वाटून मन हुरहुरले. 

दुसऱ्या क्षणी असे वाटले कि, त्याला आपण २५० Dhs देवून टाकावेत. पण दुसऱ्या क्षणी वाटले, तो खर तेच सांगत असेल ह्याची काय खात्री? मी जेव्हा business करत होते, तेव्हा एक-दोघांनी मला असेच काही तरी सांगून फसवले होते. त्या चांगल्या कर्माच्या मोबदल्यात मिळालेल्या वेदनेची आठवण अजूनही ताजी आहे. काय मज्जा आहे बघा, जुन्या आठवणींची आपल्या मनावर किती  जबरदस्त पक्कड असते !! पण मग, ह्या वेळेस जर माझ्या मनाने चांगले काम करण्यापासून माझे जर हाथ आखडले, तर ह्यात चूक कोणाची...माझी का मल्या आलेल्या वाईट अनुभवांची का बदलत चाललेल्या अवसरवादी दुनियेची ? 

५) ढुंढिराज गणेश - उत्तरप्रदेश, भारत : - (DHUNDHIRAJ GANESH – Uttar Pradesh, India)
भस्मासुर नावाच्या राक्षसाला भगवान शंकरांनी वर स्वरुपात एक अशी शक्ति प्रदान केली कि, त्याने कोणाच्याहि डोक्यावर स्पर्श केला तर ती व्यक्ती भस्मसात होईल. अशी शक्ति प्रदान झाल्यानंतर भस्मासुर स्वतःला खुप शक्तिशाली आणि अजिंक्य समजु लागला होता. मिळालेल्या शक्तिचा तो दुरुपयोग करु लागला. येणार्या जाणार्या सर्व निरपराध आणि साध्या माणसांच्या विनाकारण डोक्यावर हात ठेवुन त्यांना भस्मसात करु लागला. शेवटि भगवान विष्णुंनी त्याचा वध केला.

परंतु नंतर भस्मासुराचा मुलगा दुरासद, ह्यने सुद्धा आपल्या पित्याप्रमाणे खुप मोठि अखंड तपश्चर्या करुन भगवान शंकरांना प्रसन्न करुन घेतले. आणि त्याच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला दर्शन दिले. दुरासदाने मग भगवान शंकारांकडे वरदान स्वरुपात त्रिलोकात अधिकार प्राप्त होण्याचा वर मागुन घेतला. सोबतच त्याने अमरत्व देखिल मागुन घेतले.

ऋषिवर्य नारदमुनींनी त्याला संपवण्यासाठि म्हणुन त्याला खोडसाळ पणे असं सांगितलं कि, दुरासदा तु जरी स्वतःला त्रिलोकाचा राजा समजत असलास तरीहि तुला काशी वर अधिकार कधिहि गाजवता येणार नाहि. कारण काशी मध्ये साक्षात भगवान शंकरांचा वास आहे. तिथे तुला अधिकार गाजवता येणार नाहि. याचाच अर्थ कि तु त्रिलोकाचा राजा कधिहि होऊच शकत नाहिस. बघ आता तुच काय ते ỊỊỊỊ असं सांगुन नारदमुनी अदृश्य झाले. नारदमुनींनी सांगितलेले ऐकुन दुरासदाला रहावलं नाहि आणि सरळ त्याने काशीकडे प्रस्थान करुन काशी वर अधिकार मिळवण्यासाठि चढाई केली. हे पाहुन भयभीत नारदमुनी लगेचच देवी पार्वतीकडे जाउन सर्व घटना कथन केली. आणि असाहि सल्ला दिला कि देवी पार्वतीने लगेचच एका अश्या शक्तिशाली बालकाला निर्माण करावे कि जो दुरासदाचा वध करेल. आणि त्यासाठि देवी पार्वतीने लगेचच ।। ॐ ।। मंत्राचा जप करुन एका बालकाला निर्माण केले. ह्या बालकाला चार हात आणि सोंड होती. तोच श्री गणेश. देवी पार्वतीने मग श्री गणेशाला लगेच आज्ञा केली कि त्याने त्वरीत काशीला जाऊन दुरासद राक्षसाचा वध करावा.

श्री गणेश मग ताबडतोब आपल्या आईने दिलेल्या आज्ञेचे पालन करण्यासाठि सिंहावर बसुन काशीस रवाना झाले. भगवान श्री गणेशाने दुरासद राक्षसाला शोधुन काढले आणि त्यावर चढाई केली. दुरासदाला अमरत्वाचे वरदान होतं म्हणुन त्याला जमिनीत गाडुन टाकले आणि त्याच्याकडुन होत असणारा संहार थांबवला. आणि अश्याप्रकारे श्री गणेशाने दुरासद राक्षसापासुन काशीचे रक्षण केले आणि अंतर्धान झाले. भगवान शंकरांनी मग तिथेच श्री गणेशाची एक स्वयंभु मूर्ती निर्माण करुन त्याला "ढुंढिराज गणेश" असे नामकरण केले.
।। ॐ गं गणपतये नमः ।।

घंटा...


आपण कधीही मंदिरात प्रवेश केल्यावर प्रथम घंटा वाजवतो. यामागे शास्त्र आहे. घंटा वाजवून आपण देवाचं आपल्याकडे लक्ष तर वेधून घेतोच, पण घंटा वाजवल्यामुळे वातावरणात सकारात्मक कंपनं निर्माण होतात. या कंपनांचा आपल्या शरीरावरही सकारात्मक परिणाम होतो. घंटेच्या आवाजामुळे आपल्या आसपासच्या नकारात्मक शक्ती दुर्बल होऊन नष्ट होतात. आपली एकाग्रता वाढवतात.

मंदिरात घंटा वाजवून आपण आपल्यालाच भानावर आणत असतो. घंटानाद केल्यामुळे आपल्या मनात चालू असलेल्या इतर विचारांना विराम मिळतो आणि इतर विचार थांबतात. समोरील देवाच्या मूर्तीवर आपण चित्त एकाग्र करू शकतो. ज्या मंदिरात घंटानाद सतत चालू राहातो, ते देवस्थान जागृत देवस्थान बनते. कारण येथील देव घंटानादामुळे सतत जागा राहातो.

प्राचीन काळापासून घंटा वाजवण्याची पद्धत रुढ आहे. घरातही देवांची पूजा करताना आपण घंटानाद करतो. पूजेमध्येही घंटेला विशेष स्थान असतं. घंटा वाजवल्याने पापक्षालन होत अशल्याचं पुराणांमध्ये सांगितलं आहे. घंटा वाजवल्या जो ध्वनी येतो, तो ऊँकाराच्या नादाशी साधर्म्य साधणारा आहे. सृष्टी निर्माण होताना हाच नाद घुमला होता. त्याच ध्वनीचं घंटानाद हा रुपक मानलं जातं. (सौजन्य - आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात)  

श्री शमी विघ्नेश, नागपुर : - (Shree Shami Vighnesh, Nagpur) : -
एके दिवशी इंद्र देवाने ब्रह्मादेवांना विनंती केली ती एका सुंदर स्त्रीची निर्मिती करण्यासाठि. इंद्रदेवाच्या विनंतीवरुन ब्रह्मदेवांनी आपल्या मंत्रसहाय्याने एका सुंदर स्त्रीची निर्मिती केली आणि तीचे नाव तिलोत्तमा असे ठेवले. तिलोत्तमा हि दिसायला अतिशय सुंदर, गोरी पान आणि निळ्या डोळ्यांची होती. तिला पाहताच इंद्रदेवाला तिच्याविषयी अतिशय आकर्षण वाटु लागले. तिला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला. आणि त्यातुनच इंद्रदेवाची संपुर्ण शक्ती हि तीन भागांमध्ये विभागली जाऊन त्यापासुन तीन राक्षस निर्माण झाले- महापाप, संकट आणि शत्रु. ह्या तीनहि राक्षसांनी मग भगवान शंकराची उपासना करुन, त्यांना प्रसन्न करुन आशिर्वाद स्वरुपात अनुक्रमे स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोकात अधिकार मिळवला. भगवान शंकरांकडुन शक्ती प्राप्त होताच तीनहि राक्षसांनी सर्वत्र धुमाकुळ माजवला, तीनहि लोकांमध्ये त्यांनी लोकांना त्रास देणं सुरु केलं. त्यांच्या त्रासापासुन वाचण्यासाठि लोकांनी मग मुद्गल ऋषिंच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेशाची उपासना सुरु केली. त्याअगोदर मुद्गल ऋषिंच्या विनंतीवरुन भगवान शंकर आणि माता पार्वती ह्यांनी एकत्रीत पणे शमी वृक्षाचे रुप धारण केले. मग मुद्गल ऋषिंनी सर्व लोकांना पाचारण करुन शमी वृक्षाखाली बसुन श्री गणेशाची उपासना सुरु करण्यास सांगितले. श्री गणेशाचा अखंड मंत्रजप आणि प्रार्थना ऐकुन भगवान श्री गणेश प्रसन्न होऊन तिथे अवतरीत झाले. श्री गणेशाने मग त्या तीन राक्षसांचा वध केला आणि शमी वृक्षात सामावुन गेले. संकट आणि विघ्न यातुन सुटका झालेले सर्व भक्तगण मग “जय श्री शमी विघ्नेश” असा जयघोष करु लागले. त्यानंतर तेथे प्रकट झालेल्या श्री मूर्तीचे नामकरण सुद्धा श्री शमी विघ्नेश असेच करण्यात आले. श्री शमी विघ्नेशाची मूर्ती पाषाणी असुन भव्य - दिव्य आणि उजव्या सोंडेची आहे. मूर्ती अतिशय सुंदर असुन भक्तांचे संकट हरणारी अशी आहे. ।। ॐ गं गणपतये नमः ।।

Tuesday 21 August 2012

मुक्तविहार



गेल्या दोन-तीन वर्षात आमच्या जवळच्या आणि दूरच्या कुटुंबात बऱ्याच जणांना पुत्र लाभाचा आशीर्वाद मिळाला. इतकी पुत्र रत्न झाली कि माझी मोठी लेक मजेत सर्वाना म्हणायची, "चला तर, आपण आपली एक IPL टीम तयार करूया आता." सर्व जण एकदम खुशीत आहेत. आपापली मुलं जस जशी मोठी होत आहेत तसं तसे आईबाप त्यांचे फोटो एकतर फेसबुकवर अपलोड करतात नाहीतर वेळ मिळाल्यास आपल्या जवळच्या लोकांना email  ने पाठवतात. त्यांच्या मुलांची होणारी बौद्धिक आणि शारीरिक वाढ पाहून खूप आनंद होतो. ह्या सर्व मुलांचे ते निरागस हास्याचे फोटो पाहून नेहमीच समाधान वाटते. बरेच वेळा आम्ही ह्यावर चर्चा सुद्धा करतो. मनाला, त्या मुलांच्या निरागस हसण्याचा, कित्येकदा हेवा सुद्धा वाटतो. वाटते, का आपल्याला सुद्धा मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे सदैव आनंदतात राहता येत नाहीं. ह्या विचाराबरोबरच असेही लक्षात आले, 'सत्चिदानंद' अवस्तेत असलेली ही लहानपणातली (३-४ वर्षापर्यंत ) मुले मोठी झाल्यावर स्वतःचा हा भोळे-भाबडेपणा , निरागस मन, सदैव आनंदी राहण्याची वृत्ती ....कुठे हरवून बसतात? कुठली जादूची काठी त्यांच्यात हा बदल घडवून आणते? कोणाला म्हणून ह्या त्यांचातल्या बदलावाला जवाबदार ठरवायचे? ह्यावर विचार करत असतांना, परवा एक सुरेख लेख माझ्या वाचनात आला. लगेच वाटले, अरेच्च्या, आपल्या सारखे बरेच जण विचार करतात. पर्यंतू, हा 'बदलाव घडवून न आणण्यासाठी' आपण काहीच करू शकत नाहीं , ह्याची मनाला हुरहूर लागून राहिली आहे. इतकेच नव्हे तर, आपण सुद्धा अशा प्रकारच्या 'सत्चिदानंद' अवस्थेत,  प्रयन्त करूनसुद्धा फार वेळ  राहू शकत नाहीं ह्या गोष्टीची मनाला खंत वाटते आहे. वाचलेला लेख खालील प्रमाणे :-

कुठून येतं ते हास्य ... काय असेल त्या पाठीमागच रहस्य ??

डोक्यावर ओझं .... अंगावर फाटके कपडे .... पण चेहऱ्यावर अगदी मनसोक्त अन दिलखुलास हास्य ...
कुठून येतं ते हास्य ... काय असेल त्या पाठीमागच रहस्य ??

साधं-सरळ उत्तर .... हे हास्य त्यांच्या लहानपणाच ... त्यांच्या निरागसतेच ...
अन त्यांच्या अज्ञानाच .... हो हो अज्ञानाच !!!...

नंतर त्यांच्या वाट्याला शिक्षण येत ... आणि जसं जसं ते शिकायला लागतात ते निरागसत्व हरवत जातात ...
त्यांना शिकवणारे कोण ?? तर आपणंच ...

दुसऱ्याच ओझं वाहण म्हणजे 'चूक' ... आपला पहिला धडा ...
चारित्र्य अन विचारांची दिशा जरी फाटकी असली तरी चालेल पण 'सभ्य' समाजात जगायचं असेल तर कपडे फाटके नकोत ...
आपल्याला काय वाटतं हे महत्वाच नाही ... 'समाज' काय मान्य करतो हे जास्त महत्वाच ...
अन ह्या आपल्या शिकवण्याला आपण 'व्यवहारज्ञान' म्हणायचं ???

मार्क्स, टक्केवारी, नंबर यांच्या शर्यतीत त्यांना उगीच धावायला लावून, आकलन शक्ती, नवीन गोष्टी जाणून घेण्यातल कुतूहल, प्रयोगशीलता असल्या गुणांकडे थेट दुर्लक्ष्य करायचं ...

शिक्षणात नवीन पंख फुटलेल्या पक्ष्यांना विश्वासाची अन स्वप्नांची पंख देण्याची ताकद असावी ...
त्या मुक्त प्राण्यांना मुक्तच राहू द्यावं ... मुक्तविहार करणारे पक्षीच गगनभरारी घेऊ शकतात !!!

आपल्या पोकळ विचारांच्या जाळ्यात त्या निरागस जीवांना कोंडून ठेवण्यात काहीच अर्थ नाही ....
कारण पिंजऱ्यात कोंडून ठेवलेले प्राणीच पुढे जास्त आक्रमक होतात !!!!


किती छान लिहिले आहे यात !! ह्याचा सरळ अर्थ मग असा होतो काय....कि ह्या इवल्या इवल्या गोंडस बाळांच बालपण हरवण्यास आपणंच कारणीभूत आहोत काय?!!!

३) जागृत गणपती - गणेशगुळेचा गणपती : -
 (Ganeshgule Ganapati, Ratnagiri, Maharashtra)
रत्नागिरी जिल्ह्यात गणेशगुळे गावापासून केवळ एकच किलोमीटर अंतरावर एका उंच डोंगरावर गणपतीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर पांडवांनी बांधले असल्याचे सांगितले जाते. पावसपासून हे गाव जेमतेम चार किमी अंतरावर आहे. पूर्वी या मंदिराच्या गाभा-यात गणपती होता. मात्र नंतर तो गणपती मंदिर सोडून गणपतीपुळे येथे गेल्याची आख्यायिका आहे. सध्या या गाभाऱ्याच्या दरवाजाला आतून शिळा आहे. त्यामुळे गाभा-यात प्रवेश करता येत नाही. दरवाजा पूर्ण बंद असल्यामुळे आत काय आहे, हे समजू शकत नाही. दरवाजापेक्षा मोठी शिळा गाभाऱ्यात कशी गेली, याचे आश्चर्य भाविकांना सुद्धा वाटते. त्यामुळे गणेशाच्याच मर्जीमुळे ती शिळा आत गेल्याचे मानून भाविक शिळेपुढेच नतमस्तक होतात. गणपती नसला तरीही त्याच्या स्पर्शाने पावन झालेली ही शिळादेखील नवसाला पावते, असे मानले जाते. येथे दरवर्षी माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. गावातून पालखी काढली जाते. वेगवेगळे मंनेरंजनाचे कार्यक्रम देखील गणेशोत्सवा दरम्यान सादर होतात. मंदिरालगत एक विहीर आहे. आणि ती विहीर कधीच आटत नाही किंवा पावसाळ्यात विहिरीतील पाण्याची पातळी वाढत सुद्धा नाही.
।। ॐ गं गणपतये नमः ।।

Monday 20 August 2012


 First impression 

लहानपणी शाळेत असताना, वर्गात शिक्षक नेहमी सांगायचे, "अरे, मुलानो, केव्हाही लक्षात ठेवा, नवीन वर्गात गेला कि पहिला पेपर / परीक्षा उत्तम प्रकारे लिहा आणि चांगले मार्क्स मिळावा कारण 'First impression is the Last impression'." बागडत  बागडत अभ्यास करण्याच्या त्या दिवसात, ह्याचे महत्व फारसे कधी कळलेच नाहीं. एवढेच काय, वयाच्या ४५ वर्षापर्यंत सुद्धा हे असे का म्हणतात, हे आककले नव्हते. ह्यासाठी संदर्भ असा ...लहानपणी आणि अगदी लग्न झाल्यानंतर सुद्धा बरेच वर्षे , मी स्वभावाने रागीट, कडक, लहरी, शिस्त प्रेमी, वचक दाखवणारी, धारदार जिभेची वगैरे वगैरे अशी होते. (खरे म्हणजे बालपणी आई-वडिलांनी आणि लग्नानंतर नवऱ्याने केलेल्या लाडामुळे मी एक बिघडलेली मुलगी / बायको होते.) मनातून जरी प्रेमळ आणि मऊ असले तरी , लोकांना आठवणीत फक्त माझा राठ स्वभावाच जास्त लक्षात राहावयाचा. आयुष्यात नंतर, बऱ्याच घडामोडीनंतर आणि देवाच्या कृपेने आणि नवऱ्याच्या सत्संगतीत राहून , उशिरा  का होईना , माझ्या स्वभावात बदल घडून आला. नवीन पीढीच्या माझ्या लेकीनी आणि जुने संस्कार जोपासलेल्या माझ्या आईने, मला हा बदल घडवून आणण्यात मदत केली हे मी कसे विसरू शकेन. मला भेटलेले सर्व जण माझ्यात झालेल्या ह्या बदलाची मला जाणीव सुद्धा करून देतात. पण गम्मत अशी आहे कि, अजूनही माझ्या दोन मुलींपैकी जर कोणी रागारागाने त्रागा करून घेतला तर झटदिशी म्हणतात , "अगदी आईसारखी रागीट आहे !!"..... 'First impression is Last impression', ह्याचा अर्थ आत्ता कुठे माझ्या लक्षात येतो आहे !!!    

दुसरे जागृत गणपतीचे स्थान : 

2) रणथम्भोर दुर्ग मधील श्री गणेश, राजस्थान : - (Shree Ganesh from Ranthambhore Fort, Rajasthan) 

रणथम्भोर, राजस्थान मधील रणथम्भोर किल्यावरील असलेलं हे श्री गणेशाचं सुंदर रुप. ह्या श्री गणेशाचे विशेष म्हणजे हे त्रिनेत्र गणेश आहेत. रणथम्भोर परिसरातील जन मानसात ह्या श्री गणेशाची प्रचिती अगदि खुप. ती अशी कि, घरात कुणाचं लग्न असो अथवा कुठलाहि महत्वाचा सण जसं होळी, दिवाळी. ह्या महत्वाच्या प्रसंगी सर्व प्रथम रणथम्भोर किल्यामधील श्री गणेशाला आमंत्रण दिलं जातं. आमंत्रण प्रत्यक्ष जाऊन किंवा पत्राने आमंत्रण दिलं जातं. काहि भक्तगण आपली सुखःदुखे सुद्धा ह्या श्री गणेशाला पत्राने कळवतात. आणि भक्ताने पाठवलेली सर्व पत्रे ह्या मंदिरात अगदि आवर्जुन पोहचवली जातात. त्यातुनहि महत्वाची गोष्ट म्हणजे, गणपती मंदिरात आलेली भक्तांची सर्व पत्रे मंदिरातील पुजारी श्री गणरायाला ऐकवुन दाखवतात. भक्तगणांच्या प्रत्येक पत्रामधील शब्दन् शब्द श्री गणरायापर्यंत पोहचतो. श्री गणरायाच्या दरबारात होणारी अशी हि एकमेव सेवा असावी कदाचीत. पत्र पाठवण्यासाठि पत्तासुद्धा अगदि सोपा आहे. “श्री गणेशजी महाराज, पोस्ट – रणथम्भोर” . केवळ एवढ्याश्या पत्त्यावर पत्र पोहचतं सुद्धा आणि आपला संदेश श्री गणरायाच्या कानावर जातो सुद्धा. मग काय तुम्हि कधी पाठवणार पत्र श्री गणराया साठि................. ।। ॐ गं गणपतये नमः ।।

कटू सत्य 

इंसान भी क्या चीज हैं !
दौलत कमाने के लिये सेहत खो देता हैं,
सेहत को वापस पाने के लिये दौलत खो देता हैं, 
जीता ऐसा हैं, जैसे कभी मरेगा ही नहीं और मर ऐसे जाता हैं, जैसे कभी जिया ही नहीं !!

खरोखर किती गूढ अर्थ आहे ह्या कटू सत्यतेत !! आपल्याला सगळ कळत पण वळत काहीच नाहीं. असल्या सगळ्या सुविचारांना, आपण अगदी बेमालून पणे होकारार्थी मान  डोलावतो आणि नंतर "ये रे माझ्या मागल्या" ह्याला शोभेल असे वर्तवणूक करून पुन्हा आपल्याच नशेत मग्न होवून ह्या बेजवाबदार अशा स्पर्धात्मक आणि धावपळीच्या आयुष्यात मन गुंतवून "आम्ही एकदम मजेत आहोत बघा" असे नाटकी हसू चेहऱ्यावर आणून पावूल पुढे टाकण्याचा उगीचच प्रयन्त करतो. 


श्रावण महिना संपताच सर्व श्री गणेश भक्तांना वेध लागतात ते लाडक्या श्री गणेशाचे आगमन होण्याचे. परंतु ह्या वर्षी अधिक भाद्रपद महिना असल्यामुळे अजुन तरी आपल्याला वाट बघावी लागणार आहे. आणि त्यासाठिच प्रत्येकाला निज भाद्रपद सुरु होईपर्यंत दर दिवशी किमान एका जागृत गणपतीचे दर्शन घडवण्याचं वचन देऊन आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात घेऊन जाणार आहे. तेथील श्री भृशुंड गणेश आणि त्याबद्दलची उपलब्ध सविस्तर माहिती आपल्या साठि घेऊन आलो आहे. चला तर मग. (सौजन्य :श्री सिद्धीविनायक गणपती, मुंबई ) 

BHRUSHUND GANESH , Bhandara -Maharashtra. 

भृशुंड गणेश : -  भंडा-याचा भृशुंड गणेश हा तेथील प्रतिमेच्या प्राचिनतेमुळे तसेच भव्यतेमुळे ग्रामवासी जनतेचे श्रध्दा स्थान आहे. भृशुंड गणेश मूर्तीत जणू ऋषींचा भास होतो. अखंड रक्ताश्म शीळेवर कोरलेली ही मूर्ती गाभा-यात तळापासून आठ फूट उंच व चार फूट रूंद आहे. पूर्ण सिंदूर चर्चित मूर्ती चतुर्भूज असून मूशकारूढ आहे. उजवा पाय खाली सोडलेला व डाव्या पायाची मांडी घातलेली मूर्ती आहे. चारही हातांमध्ये पाश, अंकूश, मोदक असून उजवा वरद हस्त आहे. शिरोभागी पंचमुखी शेषफणा आहे. मुखमंडळाचे जागी नाकपुडया, डोळे, मिशा व दाढी दिसत असून चेहरा भव्य व स्पष्ट आहे. सोंड डाव्या हातावरील मोदकाकडे वळलेली आहे. भृशुंड गणेशाचं मंदीर हेमाडपंथी आहे. मूर्तीची स्थापना ११३० मध्ये झाली असावी असा अंदाज आहे. तसे मेंढा परिसरात गिरीवंशीय गोसावी लोकांच्या समाधी समूहाचा एक भाग आहे. आजही या भागात हेमाडपंथी शैलीतील स्मारके बघायला मिळतात. तसेच कित्येक वर्ष हे भृशुंड गणेशाचे मंदीर दुर्लक्षीत होते. परंतू भंडारा येथील ग्रामजोशी श्री विश्वासराव जोशी यांचे पुढाकाराने १९८६ पासून तिथे पूजा सुरू केली गेली. आज मंदीराची भव्यता वाढली असून सभामंडप भव्य व सुंदर परिसर गणेश भक्तांना आध्यात्मिक सुख देण्यात हातभार लावत आहे. भृशुंड गणेशमेंढा - परिसरातील ग्रामवासियांनी पुढाकाराने साकारलेली एक वस्तू असून त्यांच्याच सहकार्याने विविध कार्यक्रमांची रेलचेल वर्षभर असते. आज दर चतुर्थीला अभिषेक व महापूजा असते. गणेशोत्सवाचा दहा दिवस कार्यक्रम चालतो. आणि पौष संकष्ट चतुर्थी ते माघ चतुर्थी पर्यंत एक महिनाभर कार्यक्रम असतो. पूजापाठात ग्रामस्थ हिरिरीने सहभागी होवून कार्यक्रम व उत्सव थाटात पार पाडतात. संस्कारक्षम वातावरण निर्मीतीसाठी ग्रामीण महिलांना गणपती अथर्वशिर्ष शिकविण्यात आले. त्यामुळे आवर्तनाभिषेकात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. या देवस्थानाला आजवर अनेक संतमहंतांनी भेटी दिल्यात श्रृंगेरी पिठाचे जगद्गुरू शंकराचार्य प. पू. श्री भारतीतीर्थ हे एक होत. नुकतीच बडोद्याचे प. पू. श्री. जनार्दनस्वामी खेर यांनी सुध्दा भृशुंड गणेशाचे दर्शन घेतले. याच मंदीर परीसरात श्री. महावीर हनुमानाची मूर्ती सुध्दा आहे. परंतू त्यावर मंदीर अथवा छत नाही हे विशेष.
भाविकांची मनोरथे पूर्ण करणा-या श्री. भृशुंड गणेशाची आरती त्याची महती गाणारीच आहे.

आरती श्री गणेशा, देवा मंगळमूर्ती, नामले रामस्वामी, वेद वर्णिती कीर्ती ॥१॥
भृशुंड ॠषीवर दे तुला प्रसन्न केले, दिधले ते निज स्वरूपा अपूले ॥२॥
नादा: बिंदू सुधा न भी कर्पुरा देते, तिन्हींचा संगम झाला, प्रभू नांदसी तेथे ॥३॥
कामना पूर्ण होती, तुझे दर्शने देवा, गोसाची नंदन तुझे चरणी सेवा ॥४॥ आरती श्री गणेशा ॥

श्री भृशुंड ॠषींनी वैनगंगेच्या तीरावर वटवृक्षाखाली तपश्चर्या करून या क्षेत्राला पावन केले आहे. गणेश व मुदगल पुरांणांतून भृशुंड गणेशाचे आख्यान दिलेले आहे. अशा या पावन भृशुंड गणेश मंदीरातून प्रज्वलीत झालेली संस्काराची ज्योत समाजाच्या तळागळापर्यंत जावून सामाजिक एकात्मतेची बंधूभावाची एक अखंड महाज्योत व्हावी अशी प्रार्थना श्री भृशुंड गणेशाचे चरणी करूया.
।। ॐ गं गणपतये नमः ।।

Friday 17 August 2012


कर्तेपणा

एक गोष्ट अशी पण : 
एक ८ वर्षाची मुलगी आइसक्रीम पार्लरला गेली.
वेटर : काय पाहिजे?
मुलगी : भाऊ, हे  कोनमधील आइसक्रीम कितीला आहे?
वेटर : १५ रुपयाला 
मुलीने स्वतःच्या पर्समध्ये  किती पैसे आहेत हे बघितले आणि छोट्या कोनमधील आइसक्रीम ची किंमत विचारली.
वेटर ने रागात येऊन सांगितले : १२ रुपयाला
मुलीने छोट्या कोनमधील आइसक्रीम देण्यास सांगितले.
वेटरने एका प्लेटमध्ये तो छोटा कोन ठेवून टेबलावर रागाने आपटून दिला.
मुलगी आइसक्रीम खावून झाल्यावर पैसे ठेवून निघून गेली.
जेव्हा वेटर प्लेट घेवून जाण्यासाठी आला तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आले.
कारण.....
त्या मुलीने त्या वेटर साठी ३ रुपये टीप्स म्हणून ठेवून गेली होती. ....
गोष्टीतला गाभार्थ हा कि: आपल्याकडे जे काही आहे त्याच्यातच लोकांना पण खुश ठेवण्याचा प्रयन्त केला पाहिजे.
आपल्या दररोजच्या जीवनात अशा किती गोष्टी आपल्या  नकळत करतो? आणि जेव्हा काही करण्याचा प्रयन्त करतो, तेव्हा त्या कर्तेपणाचा आपल्याला "अभिमान" होतो. मग अशा प्रकारच्या "चांगुलपणाचा" देव कसा बर स्वीकार करेल? बरोबर ना?

पवित्र श्रावण मास का आज आखरी दिन और कल हे श्रावण अमावस्या. आज श्रावण मास का आखरी गुरुवार भी है, और ईस शुभदिन के संध्याकाल समय हम सह परिवार दर्शन करेंगे बारा ज्योतिर्लिंग के बारहवे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर जी का । और इस दर्शन के साथ हि हमारी श्रावण मास के चलते बारा ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा संपुर्ण होगी । सभी भक्तोंसे वानंती है कि, ईस यात्रा के बारे में कुछ टिपणी देनी हो तो अवश्य दें ।  तो फिर चलें,


१२) घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग :- महाराष्ट्र में औरंगाबाद के नजदीक दौलताबाद से ११ किलोमीटर दूर घृष्णेदश्वंर महादेव का मंदिर स्थित है। यह बारह ज्योतिर्लिंगों में से एक है। कुछ लोग इसे घुश्मेश्वर के नाम से भी पुकारते हैं। बौद्ध भिक्षुओं द्वारा निर्मित एलोरा की प्रसिद्ध गुफाएँ इस मंदिर के समीप ही स्थित हैं। इस मंदिर का निर्माण देवी अहिल्याबाई होल्कर ने करवाया था। शहर से दूर स्थित यह मंदिर सादगी से परिपूर्ण है। द्वादश ज्योतिर्लिंगों में यह अंतिम ज्योतिर्लिंग है। इसे घुश्मेश्वर, घुसृणेश्वर या घृष्णेश्वर भी कहा जाता है। यह महाराष्ट्र प्रदेश में दौलताबाद से बारह मीर दूर वेरुलगाँव के पास स्थित है।

पौराणिक कथा :-
इस ज्योतिर्लिंग के विषय में पुराणों में यह कथा वर्णित है- दक्षिण देश में देवगिरिपर्वत के निकट सुधर्मा नामक एक अत्यंत तेजस्वी तपोनिष्ट ब्राह्मण रहता था। उसकी पत्नी का नाम सुदेहा था दोनों में परस्पर बहुत प्रेम था। किसी प्रकार का कोई कष्ट उन्हें नहीं था। लेकिन उन्हें कोई संतान नहीं थी।  ज्योतिष-गणना से पता चला कि सुदेहा के गर्भ से संतानोत्पत्ति हो ही नहीं सकती। सुदेहा संतान की बहुत ही इच्छुक थी। उसने सुधर्मा से अपनी छोटी बहन से दूसरा विवाह करने का आग्रह किया। पहले तो सुधर्मा को यह बात नहीं जँची। लेकिन अंत में उन्हें पत्नी की जिद के आगे झुकना ही पड़ा। वे उसका आग्रह टाल नहीं पाए। वे अपनी पत्नी की छोटी बहन घुश्मा को ब्याह कर घर ले आए। घुश्मा अत्यंत विनीत और सदाचारिणी स्त्री थी। वह भगवान्‌ शिव की अनन्य भक्ता थी। प्रतिदिन एक सौ एक पार्थिव शिवलिंग बनाकर हृदय की सच्ची निष्ठा के साथ उनका पूजन करती थी।  भगवान शिवजी की कृपा से थोड़े ही दिन बाद उसके गर्भ से अत्यंत सुंदर और स्वस्थ बालक ने जन्म लिया। बच्चे के जन्म से सुदेहा और घुश्मा दोनों के ही आनंद का पार न रहा। दोनों के दिन बड़े आराम से बीत रहे थे। लेकिन न जाने कैसे थोड़े ही दिनों बाद सुदेहा के मन में एक कुविचार ने जन्म ले लिया। वह सोचने लगी, मेरा तो इस घर में कुछ है नहीं। सब कुछ घुश्मा का है। अब तक सुधर्मा के मन का कुविचार रूपी अंकुर एक विशाल वृक्ष का रूप ले चुका था। मेरे पति पर भी उसने अधिकार जमा लिया। संतान भी उसी की है। यह कुविचार धीरे-धीरे उसके मन में बढ़ने लगा। इधर घुश्मा का वह बालक भी बड़ा हो रहा था। धीरे-धीरे वह जवान हो गया। उसका विवाह भी हो गया। अब तक सुधर्मा के मन का कुविचार रूपी अंकुर एक विशाल वृक्ष का रूप ले चुका था। अंततः एक दिन उसने घुश्मा के युवा पुत्र को रात में सोते समय मार डाला। उसके शव को ले जाकर उसने उसी तालाब में फेंक दिया जिसमें घुश्मा प्रतिदिन पार्थिव शिवलिंगों को फेंका करती थी।  सुबह होते ही सबको इस बात का पता लगा। पूरे घर में कुहराम मच गया। सुधर्मा और उसकी पुत्रवधू दोनों सिर पीटकर फूट-फूटकर रोने लगे। लेकिन घुश्मा नित्य की भाँति भगवान्‌ शिव की आराधना में तल्लीन रही। जैसे कुछ हुआ ही न हो। पूजा समाप्त करने के बाद वह पार्थिव शिवलिंगों को तालाब में छोड़ने के लिए चल पड़ी। जब वह तालाब से लौटने लगी उसी समय उसका प्यारा लाल तालाब के भीतर से निकलकर आता हुआ दिखलाई पड़ा। वह सदा की भाँति आकर घुश्मा के चरणों पर गिर पड़ा। जैसे कहीं आस-पास से ही घूमकर आ रहा हो। इसी समय भगवान्‌ शिव भी वहाँ प्रकट होकर घुश्मा से वर माँगने को कहने लगे। वह सुदेहा की घनौनी करतूत से अत्यंत क्रुद्ध हो उठे थे। अपने त्रिशूल द्वारा उसका गला काटने को उद्यत दिखलाई दे रहे थे। घुश्मा ने हाथ जोड़कर भगवान्‌ शिव से कहा- 'प्रभो! यदि आप मुझ पर प्रसन्न हैं तो मेरी उस अभागिन बहन को क्षमा कर दें। निश्चित ही उसने अत्यंत जघन्य पाप किया है किंतु आपकी दया से मुझे मेरा पुत्र वापस मिल गया। अब आप उसे क्षमा करें और प्रभो!  मेरी एक प्रार्थना और है, लोक-कल्याण के लिए आप इस स्थान पर सर्वदा के लिए निवास करें।' भगवान्‌ शिव ने उसकी ये दोनों बातें स्वीकार कर लीं। ज्योतिर्लिंग के रूप में प्रकट होकर वह वहीं निवास करने लगे। सती शिवभक्त घुश्मा के आराध्य होने के कारण वे यहाँ घुश्मेश्वर महादेव के नाम से विख्यात हुए।

घुष्णेश्वर-ज्योतिर्लिंग की महिमा पुराणों में बहुत विस्तार से वर्णित की गई है। इनका दर्शन लोक-परलोक दोनों के लिए अमोघ फलदाई है।  ।। ॐ नमः शिवाय ।।

Thursday 16 August 2012


दोष 

लोक बुडाले तर समुद्राला दोष देतात.
ध्येय साध्य नाहीं झाले तर नशिबाला दोष देतात.
स्वतः नीट चालत नाहीत आणि ठेच लागल्यावर दगडाला दोष देतात. 

आज एका फेसबुक च्या पानावर वरील  वाचायला मिळाले आणि वाटले बरे झाले, उशिरा का होईना आयुष्याच्या या टप्या वर , देवाच्या कृपेने, आपण या विचारसरणीतून बाहेर येऊ शकलो. उलट आता असे वाटते कि, अगदी श्री निंबरगिकर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे , आपल्या पायाला दगड किंव्हा काटा बोचला कि मनात असा पटकन विचार येतो कि, "आज आपल्या हातून काही चूक तर नाहीं झाली ना? नाहीतर आपल्या पायाला दुखापत व्हायचे काय कारण होते ?" खरच, अध्यात्मिक  वाटेवरची वाटचाल आपल्या आतील दोष किती सहजतेने दाखवून देते आणि नकळत हे सांगून जाते कि, दुसऱ्यांच्यातले दोष जेंव्हा आपल्याला दिसतात तेव्हा हे पक्के समजावे कि ते दोष आपल्या स्वतःमध्ये आहेत, नाहीतर उगीचच का त्यांची आपल्याला जाणीव होते?  


श्रावण मास और बारा ज्योतिर्लिंगोंकि दर्शन यात्रा. आज हम दर्शन करेंगे रामेश्वरम् ज्योतिर्लिंग के ।

११) रामेश्वरम् ज्योतिर्लिंग : - रामेश्वरम हिंदुओं का एक पवित्र तीर्थ है। यह तमिल नाडु के रामनाथपुरम जिले में स्थित है। यह तीर्थ हिन्दुओं के चार धामों में से एक है। इसके अलावा यहां स्थापित शिवलिंग बारह द्वादश ज्योतिर्लिंगों में से एक माना जाता है। भा
 रत के उत्तर मे काशी की जो मान्यता है, वही दक्षिण में रामेश्वरम् की है। रामेश्वरम चेन्नई से लगभग सवा चार सौ मील दक्षिण-पूर्व में है। यह हिंद महासागर और बंगाल की खाड़ी से चारों ओर से घिरा हुआ एक सुंदर शंख आकार द्वीप है। बहुत पहले यह द्वीप भारत की मुख्य भूमि के साथ जुड़ा हुआ था, परन्तु बाद में सागर की लहरों ने इस मिलाने वाली कड़ी को काट डाला, जिससे वह चारों ओर पानी से घिरकर टापू बन गया। यहां भगवान राम ने लंका पर चढ़ाई करने से पूर्व एक पत्थरों के सेतु का निर्माण करवाया था, जिसपर चढ़कर वानर सेना लंका पहुंची व वहां विजय पाई। बाद में राम ने विभीषण के अनुरोध पर धनुषकोटि नामक स्थान पर यह सेतु तोड़ दिया था। आज भी इस ३० मील (४८ कि.मी) लंबे आदि-सेतु के अवशेष सागर में दिखाई देते हैं। 
रामेश्वरम् से दक्षिण में कन्याकुमारी नामक प्रसिद्ध तीर्थ है। रत्नाकर कहलानेवाली बंगाल की खाडी यहीं पर हिंद महासागर से मिलती है। रामेश्वरम् और सेतु बहुत प्राचीन है। परंतु रामनाथ का मंदिर उतना पुराना नहीं है। दक्षिण के कुछ और मंदिर डेढ़-दो हजार साल पहले के बने है, जबकि रामनाथ के मंदिर को बने अभी कुल आठ सौ वर्ष से भी कम हुए है। इस मंदिर के बहुत से भाग पचास-साठ साल पहले के है।

रामेश्वरम् मंदिर लगभग ६ हेक्टेयर में बना हुआ है। मंदिर में विशालाक्षी जी के गर्भ-गृह के निकट ही नौ ज्योतिर्लिंग हैं, जो लंकापति विभीषण द्वारा स्थापित बताए जाते हैं। रामनाथ के मंदिर में जो ताम्रपट है, उनसे पता चलता है कि ११७३ ईस्वी में श्रीलंका के राजा पराक्रम बाहु ने मूल लिंग वाले गर्भगृह का निर्माण करवाया था। उस मंदिर में अकेले शिवलिंग की स्थापना की गई थी। देवी की मूर्ति नहीं रखी गई थी, इस कारण वह नि:संगेश्वर का मंदिर कहलाया। यही मूल मंदिर आगे चलकर वर्तमान दशा को पहुंचा है। बाद में पंद्रहवीं शताब्दी में राजा उडैयान सेतुपति और निकटस्थ नागूर निवासी वैश्य ने १४५० में इसका ७८ फीट ऊंचा गोपुरम निर्माण करवाया था। बाद में मदुरई के एक देवी-भक्त ने इसका जीर्णोद्धार करवाया था। सोलहवीं शताब्दी में दक्षिणी भाग के द्वितीय परकोटे की दीवार का निर्माण तिरुमलय सेतुपति ने करवाया था। इनकी व इनके पुत्र की मूर्ति द्वार पर भी विराजमान है। इसी शताब्दी में मदुरई के राजा विश्वनाथ नायक के एक अधीनस्थ राजा उडैयन सेतुपति कट्टत्तेश्वर ने नंदी मण्डप आदि निर्माण करवाए। नंदी मण्डप २२ फीट लंबा, १२ फीट चौड़ा व १७ फीट ऊंचा है। रामनाथ के मंदिर के साथ सेतुमाधव का मंदिर आज से पांच सौ वर्ष पहले रामनाथपुरम् के राजा उडैयान सेतुपति और एक धनी वैश्य ने मिलकर बनवाया था।[5] सत्रहवीं शताब्दी में दलवाय सेतुपति ने पूर्वी गोपुरम आरंभ किया। १८वीं शताब्दी में रविविजय सेतुपति ने देवी-देवताओं के शयन-गृह व एक मंडप बनवाया। बाद में मुत्तु रामलिंग सेतुपति ने बाहरी परकोटे का निर्माण करवाया। १८९७ – १९०४ के बीच मध्य देवकोट्टई से एक परिवार ने १२६ फीट ऊंचा नौ द्वार सहित पूर्वीगोपुरम निर्माण करवाया। इसी परिवार ने १९०७-१९२५ में गर्भ-गृह की मरम्मत करवाई। बाद में इन्होंने १९४७ में महाकुम्भाभिषेक भी करवाया। 

कथा :-
रामेश्वरम् के विख्यात मंदिर की स्थापना के बारें में यह रोचक कहानी कही जाती है। सीताजी को छुड़ाने के लिए राम ने लंका पर चढ़ाई की थी। उन्होने लड़ाई के बिना सीताजी को छुड़वाने का बहुत प्रयत्न किया, पर जब राम सफलता न मिली तो विवश होकर उन्होने युद्ध किया। इस युद्ध में रावण और उसके सब साथी राक्षस मारे गये। रावण भी मारा गया; और अन्ततः सीताजी को मुक्त कराकर श्रीराम वापस लौटे। इस युद्ध हेतु राम को वानर सेना सहित सागर पार करना था, जो अत्यधिक कठिन कार्य था। रावण भी साधारण राक्षस नहीं था। वह पुलस्त्य महर्षि का नाती था। चारों वेदों का जाननेवाला था और था शिवजी का बड़ा भक्त। इस कारण राम को उसे मारने के बाद बड़ा खेद हुआ । ब्रह्मा-हत्या का पाप उन्हें लग गया। इस पाप को धोने के लिए उन्होने रामेश्वरम् में शिवलिंग की स्थापना करने का निश्चय किया। यह निश्चय करने के बाद श्रीराम ने हनुमान को आज्ञा दी कि काशी जाकर वहां से एक शिवलिंग ले आओ। हनुमान पवन-सुत थे। बड़े वेग से आकाश मार्ग से चल पड़े। लेकिन शिवलिंग की स्थापना की नियत घड़ी पास आ गई। हनुमान का कहीं पता न था। जब सीताजी ने देखा कि हनुमान के लौटने मे देर हो रही है, तो उन्होने समुद्र के किनारे के रेत को मुट्ठी में बांधकर एक शिवलिंग बना दिया। यह देखकर राम बहुत प्रसन्न हुए और नियम समय पर इसी शिवलिंग की स्थापना कर दी। छोटे आकार का सही शिवलिंग रामनाथ कहलाता है। 
बाद में हनुमान के आने पर पहले छोटे प्रतिष्ठित छोटे शिवलिंग के पास ही राम ने काले पत्थर के उस बड़े शिवलिंग को स्थापित कर दिया। ये दोनों शिवलिंग इस तीर्थ के मुख्य मंदिर में आज भी पूजित हैं। यही मुख्य शिवलिंग ज्योतिर्लिंग है। 
।। ॐ नमः शिवाय ।।
  
 

Monday 13 August 2012


कुस्ती आणि volleyball 

मी जन्मल्यानंतर जवळ जवळ १३ ऑलिम्पिक गेम्स तरी झाले असतील. ह्या पूर्वी, मी हे खेळ कधीही इतक्या तन्मयतेने एकरूप होवून एकचित्ताने पाहिले नसतील. पण ह्या वेळेस मात्र हे गेम्स पाहताना मस्त वाटले. ह्या मागचे कारण हेही असू शकेल कि, माझे मन आणि डोकं, या दोन्हीही गोष्टी ह्या आवश्यक तितक्या  रिकाम्या आणि काळजी विरहित होत्या. गेम्समध्ये पदक जिंकल्यानंतर खेळाडूंच्या चेहऱ्यावरील भाव बघताना मजा आणि गूढ वाटायचे. काही जण रडायचे, काही जण हसायचे, तर काही खाली वाकून भूदेवीला नमस्कार करायचे, काही स्वताच्या देशाचा झेंडा घेवून मैदानावर पळत सुटायचे, काही आपल्या कुटुंबियांचे आभार मानायचे, काही आपल्या गुरूला खांद्यावर घेवून नाचायचे .....हे सर्व बघताना त्या त्या खेळाडूचा स्वभाव कसा पटकन कळून यायचा. काही अगदी नम्र, काही गर्विष्ट, काही घमेंडखोर, तर काही कृतज्ञ, तर काही कृतघ्न, काही मग्रूर तर काही भोळेभाबडे, काही देशप्रेमी तर काही संकुचित वृत्तीचे.....किती तऱ्हा तर्हाचे स्वभाव पाहायला मिळाले. ह्या सर्व खेळात मला आवडलेला खेळ म्हणजे "volleyball " ...ह्या खेळात लागणारी संघ भावना, माणसाने एकमेकांशी कसे सह्संयोगाने राहावे हे दाखवून देते. तुमच्यातली संघ भावना जितकी पक्की आणि जास्त  विश्वासावर अवलंबून आहे, तितके यश तुमच्या पदरात जास्त !!! दुसरा खेळ म्हणजे कुस्ती ....हा असा एकमेव खेळ आहे कि ज्याच्यात तुम्हाला जर जिंकायचे असेल तर अगोदर प्रतिस्पर्धीचा पाय पकडावा लागतो....म्हणजे प्रतिस्पर्धीला वाकून नमस्कार करावा लागतो आणि नंतरच त्याच्यावर मात करता येते. असे विवरण माझ्या जोडीदाराने जेंव्हा मला दिले, तेंव्हा मला खरोखरच माझ्या जोडीदाराचे आणि कुस्तीचे कौतुक करावेसे वाटले. आहे कि नाहीं मज्जा ......जीवनाच्या आखाड्यात आपल्याला जर जिंकायचे असेल तर, नेहमी विनम्रतेने वागून प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यातच खरा विवेक आहे. उगीचच डोक्याला डोके लावून डोकेफोडी करण्यात काय फायदा आहे ?     

श्रावण मास के चलते, हम सभी श्री गणेशभक्तोंनो अभी तक नौ ज्योतिर्लिंगो का दर्शन किया । आज इस सालके श्रावण महिने का चौथा सोमवार है. और ईसी शुभ अवसरपर दर्शन करेंगे दसवां ज्योतिर्लिंग, श्री औंढा नागनाथ जी के. 

१०) औंढा नागनाथ (नागेश्वर) ज्योतिर्लिंग :- औंढा नागनाथ, महाराष्ट्र के मराठवाड़ा क्षेत्र में स्थित हिंगोली जिले के औंढा नामक तालुके (तहसील) में स्थित है, तथा यहाँ पर एक अति प्राचीन तथा सुन्दर मंदिर में भगवान भोलेनाथ के बारह ज्योतिर्लिंगों में से एक (सन्दर्भ - द्वादश्ज्योतिर्लिन्ग्स्तोत्रं , कोटिरुद्रसंहिता, श्री शिव महापुराण अध्याय २९) ज्योतिर्लिंग “नागेशं दारुकावने” स्थित हैं, और इसी वजह से इस स्थान का महात्म्य प्राचीन धर्म ग्रंथों तथा पुराणों में भी मिलता है. प्राचिन काल में ईस जगह का नाम “दारुकावन” था. यंहा के ऋषिमुनीयोंको त्रस्त करनेवाला “दारुका” राक्षस का वध भगवान शिवजीने यहिं पर किया था. ईसके उपरांत भगवान शिवजी पवित्र लिंग स्वरुप में यंहा स्थित हुए. 

श्री नागनाथ मंदिर का शिल्प बड़ा अनोखा तथा विष्मयकारी है, मंदिर का निर्माण कार्य महाभारतकालीन माना जाता है. पत्थरों से बना यह विशाल मंदिर हेमाड़पंथी स्थापत्य कला में निर्मित है तथा करीब ६०००० वर्गफुट के क्षेत्र में फैला है.मंदिर की चारों दीवारें काफी मजबूती से बनाई गई हैं तथा इसके गलियारे भी बहुत विस्तृत हैं. सभा मंडप आठ खम्भों पर आधारित है तथा इसका आकार गोल है. यहाँ महादेव के सामने नंदी नहीं है तथा मुख्य मंदिर के सामने अन्य स्थान पर नंदिकेश्वर जी का मंदिर अलग से बनाया गया है. मुख्य मंदिर के चारों ओर बारह ज्योतिर्लिंगों के छोटे मंदिर भी बने हुए हैं. मंदिर की दीवारों पर पत्थरों को तराश कर की गई सुन्दर नक्काशी देखने लायक है, तथा दीवारों पर कई देवी देवताओं की मूर्तियाँ उकेरी गई हैं. शिलाखंडों से निर्मित इन मूर्तियों को देखने से मन प्रसन्न हो जाता है. मंदिर की दिवार के एक कोने पर बने एक शिल्प में भगवान् शिव रूठी हुई पार्वती जी को मना रहे हैं, यह द्रश्य देखकर लोग दांतों तले उँगलियाँ दबा लेते हैं, पत्थर से बनी मूर्तियों के चेहरों पर कलाकार ने जो भाव उत्पन्न किये हैं, लाजवाब हैं.

अन्य महत्वपूर्ण हिन्दू मंदिरों की तरह इस मंदिर पर भी धर्मांध औरंगजेब की कुद्रष्टि पड़ी तथा उसने मंदिर का उपरी आधा भाग ध्वस्त कर दिया था, लेकिन अचानक हज़ारों की संख्या में कहीं से भ्रमर (भौरें) आ गए तथा औरंगजेब के सैनिकों पर टूट पड़े, अंततः औरंगजेब को अपनी सेना समेत वापस लौटना पड़ा (यह और कुछ नहीं भगवान् शिवजीका चमत्कार ही था). बाद में इंदौर की महारानी पुण्यश्लोका देवी अहिल्याबाई होलकर जो की स्वयं शिव की बहुत बड़ी भक्त थी ने इस मंदिर का उपरी टुटा हुआ हिस्सा पुनर्निर्मित करवा कर मंदिर का जीर्णोद्धार करवाया, अतः उनकी स्मृति में मंदिर परिसर में प्रवेश से पहले ही मातुश्री अहिल्या बाई होलकर की प्रतिमा विराजमान है. मंदिर का उपरी आधा भाग जो की औरंगजेब ने ध्वस्त कर दिया था तथा बाद में देवी अहिल्या बाई ने बनवाया, सफ़ेद रंग से पुताई किया हुआ है, तथा मंदिर का आधा निचला हिस्सा जो की प्राचीन मंदिर का वास्तविक हिस्सा है अभी भी काला ही है, यानी उस हिस्से पर पुताई नहीं की जाती.

श्री नागनाथ मंदिर का अनोखा गर्भगृह:
इस मंदिर की एक विशेषता है की यहाँ गर्भ गृह सभा मंडप के सामानांतर स्थित न होकर, सभा मंडप के निचे स्थित गुफा नुमा तलघर में है, इस तरह का मंदिर इससे पहले कभी नहीं देखा, सभा मंडप के एक कोने में चौकोर आकार का एक द्वार है तथा इस द्वार से सीढियाँ लगी हैं जो की निचे तलघर में स्थित गर्भगृह तक जाती हैं, रास्ता भी इतना छोटा है की एक बार में एक ही व्यक्ति तलघर में जा या आ सकता है. अन्दर गर्भ गृह भी बहुत छोटा है तथा एकसाथ केवल आठ या दस लोग ही पूजा कर सकते हैं, उंचाई भी इतनी कम है की व्यक्ति खड़ा नहीं हो सकता सिर्फ झुक कर या बैठ कर ही रहा जा सकता है, जबकि मंदिर बहुत विशाल है, अन्दर गर्भगृह में मध्यम आकार का ज्योतिर्लिंग स्थापित है, जो की चांदी के आवरण से ढंका रहता है तथा समय समय पर अभिषेक के लिए आवरण को हटाया जाता है. यहाँ पर गर्भगृह में भक्तों को सीधे ज्योतिर्लिंग पर पूजन तथा अभिषेक की अनुमति है. यह ज्योतिर्लिंग रेत से निर्मित है, भक्त गण अभिषेक के दौरान अपने हाथों से रेत को महसूस कर सकते है. गर्भगृह के इस अद्भुत निर्माण, तथा बहुत संकरा होने तथा जगह बहुत कम होने की वजह से कई बार वृद्ध भक्तों तथा बच्चों के लिए गर्भगृह में प्रवेश जोखिम भरा हो सकता है. फर्श हर समय गीली होने तथा प्रकाश की कमी की वजह से फिसलने का भी डर होता है,  लेकिन यह भी सच है की भगवान् के दर्शन मुश्किलों तथा जोखिमों से गुजरने के बाद ही होते हैं. ।। ॐ नमः शिवाय ।।

Sunday 12 August 2012

शाश्वत आणि अशाश्वत


परवा सुपर मार्केट मध्ये स्वस्तात मिळण्याऱ्या tomato चा पुरवठा एकदम गायब झाला होता. रमादान ईद मुळे असावा कदाचित. परंतु नंतर लक्षात आले कि, महागडे tomato चा साठा भरपूर आहे आणि ते किलोला ४०० रुपये या प्रमाणे मिळत आहेत. जीव एकदम घाबराघुबरा झाला. त्या एका क्षणी असे वाटले कि, आता ह्या पुढे स्वस्तातले tomato आपल्याला कधी  मिळणारच नाहीत. गडबडीने मी ते महागडे  tomato विकत घेतले. वर फोटोत दाखवलेल्या तीन  tomato ना मी १०५ रुपये दिले. आणखीन एक-दोन दिवस जर मी वाट बघितली असती तर नक्कीच स्वस्तातले tomato मला  कुठे तरी मिळाले असते. परंतु, त्या गोष्टीबद्दलाच्या माझ्या मनात उगीचच  असलेल्या अशाश्वत मुळे मला सारासार विचार करण्याची ईच्छाच नव्हती. आणि त्या अविचारातच मी ते महागडे tomato विकत घेतले. काय मज्जा आहे बघा माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीत !! जन्म आणि मरण  ह्यांच्या  फेऱ्यात अडकल्यानंतर मनुष्य "शाश्वत" अशा मरणाची फिकीर न करता, स्वस्तातले अशाश्वत  tomato आपल्याला जणू काही कधी मिळणारच नाहीत म्हणून त्यांची आजच तरतूद करून ठेवतो. आपल्या अतिंम काळाबद्दल असलेली ही "सुप्त" भावना...ही देवाने मनुष्याला दिलेला वर आहे कि शाप आहे ? माझ्या मते, हा एक शापच आहे. मरणाची जाणीव ठेवून जर प्रत्येकजण वागू लागला तर ह्या पृथ्वीचा स्वर्ग होण्यास फार काळ लागणार नाहीं.  

श्रावण मास के चलते, हम सभी श्री गणेशभक्तोंनो अभी तक आठ ज्योतिर्लिंगो का दर्शन किया । आज है नौंवा ज्योतिर्लिंग, श्री वैजनाथ.

९) वैजनाथ ज्योतिर्लिंग : - महाराष्ट्र राज्य के मराठवाडा क्षेत्र के बीड़ जिले में स्थित है धार्मिक नगर परळी वैजनाथ (परली वैद्यनाथ), और यहाँ पर स्थित है भगवान शिव का सुप्रसिद्ध ज्योतिर्लिंग मंदिर, जिसमें विराजते हैं भगवान् वैद्यनाथ जो की शिवपुराण के कोटिरुद्रसंहिता के २८ वें अध्याय के अंतर्गत वर्णित द्वादशज्योतिर्लिंगस्तोत्रं के अनुसार भगवान शिव के बारह ज्योतिर्लिंगों में से एक हैं. इस ज्योतिर्लिंग के स्थान के बारे में भी लोगों के बिच मतभेद है, तथा बहुत से लोग मानते हैं की यह ज्योतिर्लिंग झारखण्ड के देवघर में स्थित बैद्यनाथ धाम मंदिर में स्थित है, फिर भी भक्तों का एक बड़ा वर्ग मानता है की वैजनाथ ज्योतिर्लिंग परळी में ही है. भारत के नक़्शे पर कन्याकुमारी से उज्जैन के बीच अगर एक मध्य रेखा खिंची जाय तो उस रेखा पर आपको परली गाँव दिखाई देगा, यह गाँव मेरु पर्वत अथवा नागनारायण पहाड़ की एक ढलान पर बसा है. ब्रम्हा, वेणु और सरस्वती नदियों के आसपास बसा परली एक प्राचीन गाँव है तथा यहाँ पर विद्युत् निर्माण का बहुत बड़ा थर्मल पॉवर स्टेशन है. गाँव के आसपास का क्षेत्र पुराण कालीन घटनाओं का साक्षी है अतः इस गाँव को विशेष महत्व प्राप्त हुआ है.

पौराणिक किवदंती:
देव दानवों द्वारा किये गए अमृत मंथन से चौदह रत्न निकले थे, उनमें धन्वन्तरी और अमृत दो रत्न थे. अमृत को प्राप्त करने दानव दौड़े तब श्री विष्णु ने अमृत के साथ धन्वन्तरी को एक शिवलिंग में छुपा दिया था. दानवों ने जैसे ही उस शिवलिंग को छूने की कोशिश की वैसे ही शिवलिंग में से ज्वालायें निकलने लगी, लेकिन जब उसे शिवभक्तों ने छुआ तो उसमें से अमृतधारा निकलने लगी, ऐसा माना जाता है की परली वैद्यनाथ वही शिवलिंग है, अमृत युक्त होने के कारण ही इसे वैद्यनाथ (स्वास्थ्य का देवता ) कहा जाता है.

श्री वैद्यनाथ मंदिर शिल्प:
माना जाता है की वैद्यनाथ मंदिर लगभग २००० वर्ष पुराना है, तथा इस मंदिर के निर्माण कार्य को पूरा होने में १८ वर्ष लगे थे, वर्त्तमान मंदिर का जीर्णोद्धार इंदौर की शिवभक्त महारानी देवी अहिल्याबाई होलकर ने अठारहवीं सदी में करवाया था. अहिल्या देवी को यह तीर्थ स्थान बहुत प्रिय था. यह भव्य तथा सुन्दर मंदिर मेरु पर्वत की ढलान पर पत्थरों से बना है तथा गाँव की सतह से करीब अस्सी फीट की उंचाई पर है. इस मंदिर तक पहुँचने के लिए तीन दिशाएं तथा प्रवेश के तीन द्वार हैं. यह मंदिर गाँव के बाहरी इलाके में स्थित है तथा बस स्टैंड एवं रेलवे स्टेशन से चार किलोमीटर की दुरी पर है. इस मंदिर के शिल्प के विषय में एक रोचक कहानी है, महारानी अहिल्या बाई होलकर जिन्होंने इस मंदिर का जीर्णोद्धार करवाया, उन्हें इस मंदिर के निर्माण के लिए अपनी पसंद का पत्थर प्राप्त करने में बड़ी कठिनाई हो रही थी, अंततः उन्हें अपने स्वप्न में उस पत्थर की जानकारी मिली तथा उन्हें आश्चर्य हुआ की जिस पत्थर के लिए परेशान हो रही थी वह परली नगर के समीप ही स्थित त्रिशाला देवी पर्वत पर उपलब्ध है. मंदिर के चारों ओर मजबूत दीवारें हैं , मंदिर परिसर के अन्दर विशाल बरामदा तथा सभामंडप है यह सभामंडप साग की मजबूत लकड़ी से निर्मित है तथा यह बिना किसी सहारे के खड़ा है, मंदिर के बहार ऊँचा दीप स्तम्भ है तथा दीपस्तंभ से ही लगी हुई है पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई की नयनाभिराम प्रतिमा. मंदिर के महाद्वार के पास एक मीनार है, जिसे प्राची या गवाक्ष कहते हैं, इनकी दिशा साधना के कारण मंदिर में चैत्र और आश्विन माह में एक विशेष दिन को सूर्योदय के समय सूर्य की किरणें श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग पर पड़ती हैं. मंदिर में जाने के लिए काफी चौड़ाई लिए कई सारी मजबूत सीढियाँ हैं जिन्हें घाट कहते हैं. मंदिर परिसर में ही अन्य ग्यारह ज्योतिर्लिंगों के सुन्दर मंदिर भी स्थित हैं. मंदिर में प्रवेश पूर्व की ओर से तथा निकास उत्तर की ओर से है. यह एकमात्र स्थान है जहाँ नारद जी का मंदिर भी है. ज्योतिर्लिंग मंदिर के पहले ही शनिदेव तथा आदि शंकराचार्य के मंदिर भी हैं. ।। ॐ नमः शिवाय ।।
अशिक्षित शिक्षित


परवा कुठे तरी वर दाखविलेलं, वाचायला मिळालं. वाचल्यानंतर मन एकदम खिन्न झालं. हे जे लिहील आहे ते गम्मत म्हणून कि उपाहास म्हणून, हे मला अजूनपर्यंत तरी  कळले नाहीं.  आणि कळवून घेण्याची तशी इच्छा पण नाहीं. आता बघा, ह्यांचा मुलगा नासा मध्ये कामाला आहे म्हणजे तो कमीत कमी अमेरिकेच्या उत्तम महाविद्यालयातून नक्कीच M.S. झालेला असणार. ह्या वर जर त्याच्या घरातलं वातावरणेचे मोजमाप केले तर, कुटुंब एकदम सुशिक्षित असायला हवे आणि त्याप्रमाणे त्यांचे विचारही तसेच उदार आणि उदात्त असायला हवेत. हे कुटुंब नक्कीच रूढी, रीतीरिवाज, जुने संस्कार ह्याच्यात जरी विश्वास ठेवत असले तरी, सामान्यतः ते अग्रवर्ती विचाराचे असायला हवेत. त्यांना मंगळ असलेली मुलगी नक्कीच चालू शकेल कारण त्यांना "कुंडली मध्ये मंगळ आहे म्हणजे काय" ह्याचा नक्कीच अभ्यास असला पाहिजे. बरोबर आहे ना? परंतु, प्रत्यक्षात हे सर्व धांदात खोटे आहे. माझ्या स्वानुभवावरून हे मी सांगत आहे. स्वतःला highly educated & advanced म्हणून घेणारी ही सर्व मंडळी खोटा मुखवटा घालून समाजात फुकटचा मान मिळवून मान अगदी वर करून फिरत असतात. आपण जर अशा लोकांच्या कडे खरोखरच मंगळ असलेली मुलगी घेवून गेलो तर, अगदी दुसऱ्या दिवशीच त्यांचे तुम्हाला उत्तर येईल, "We can not accept your expression of interest as both the horoscopes are not matching." अलीकडे एका कुटुंबाने तर हद्दच केली. प्रथम त्यांनी त्यांच्या मुलाच्या प्रोफाईल वर लिहिले होते कि, "Kuj Dosham : Yes, Horoscope match not required". मुलगा चांगला शिकलेला होता. त्याचा कुंडलीत सुद्धा मंगळ दोष आहे हे दिले होते. सहज म्हणून आमच्या मुलीची कुंडली आणि फोटो त्यांना पाठवले. बरेच दिवस त्यांचे उत्तर आले नाहीं म्हणून मी परत एकदा त्या matrimonial site वर जावून बघितले, तर काय आश्चर्य, त्यांनी दिलेल्या माहितीत बदल करून खाली टिपणी दिली होती कि, " Earlier given time of birth is wrong. Now corrected. Kuj Dosham : No, Horoscope match : Required." काय हा बदमाशपणा..!! एकूण काय, प्रथम असल्या लोकांना, कुंडलीत मंगळ असणे म्हणजे काय हे माहित नाहीं, ते समजावून घेण्याची ह्यांची लायकी नाहीं, स्वतःच्या उच्च शिक्षणाचा उपयोग कसा आणि कधी करावा हे समजावून घेण्यासाठी ते कधी बुद्धी वापरत नाहींत....तर मग अशा "अशिक्षित शिक्षित " लोकांच्या घरी आपली मुलगी न दिलेलीच बरी !!!!      

श्रावण मास के चलते, हम सभी श्री गणेशभक्तोंनो अभीतक सात ज्योतिर्लिंगो का दर्शन किया । आज है आठवां ज्योतिर्लिंग, श्री त्र्यंबकेश्वर । 

८) त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग : - 
त्र्यंबकेश्वर ज्यो्तिर्लिंग में ब्रह्मा, विष्णुस और महेश तीनों ही विराजि
त हैं । यही इस ज्योतिर्लिंग की सबसे बड़ी विशेषता है। अन्य सभी ज्योतिर्लिंगों में केवल भगवान शिव ही विराजित हैं।

निर्माण :-
गोदावरी नदी के किनारे स्थित त्र्यंबकेश्वजर मंदिर काले पत्थेरों से बना है। मंदिर का स्थािपत्यी अद्भुत है। इस मंदिर के पंचक्रोशी में कालसर्प शांति, त्रिपिंडी विधि और नारायण नागबलि की पूजा संपन्नत होती है। जिन्हें भक्तयजन अलग-अलग मुराद पूरी होने के लिए करवाते हैं।
इस प्राचीन मंदिर का पुनर्निर्माण तीसरे पेशवा बालाजी अर्थात नाना साहब पेशवा ने करवाया था। इस मंदिर का जीर्णोद्धार १७५५ में शुरू हुआ था और ३१ साल के लंबे समय के बाद १७८६ में जाकर पूरा हुआ। कहा जाता है कि इस भव्य मंदिर के निर्माण में करीब १६ लाख रुपए खर्च किए गए थे, जो उस समय काफी बड़ी रकम मानी जाती थी।

मंदिर : - 
गाँव के अंदर कुछ दूर पैदल चलने के बाद मंदिर का मुख्य द्वार नजर आने लगता है। त्र्यंबकेश्वर मंदिर की भव्य इमारत सिंधु-आर्य शैली का उत्कृष्ट नमूना है। मंदिर के अंदर गर्भगृह में प्रवेश करने के बाद शिवलिंग की केवल आर्घा दिखाई देती है, लिंग नहीं। गौर से देखने पर आर्घा के अंदर एक-एक इंच के तीन लिंग दिखाई देते हैं। इन लिंगों को त्रिदेव- ब्रह्मा-विष्णु और महेश का अवतार माना जाता है। भोर के समय होने वाली पूजा के बाद इस आर्घा पर चाँदी का पंचमुखी मुकुट चढ़ा दिया जाता है।

स्थिति:-
त्र्यंबकेश्वर मंदिर और गाँव ब्रह्मगिरि नामक पहाड़ी की तलझटी में स्थित है। इस गिरि को शिव का साक्षात रूप माना जाता है। इसी पर्वत पर पवित्र गोदावरी नदी का उद्गमस्थल है। तीन नेत्रों वाले शिवशंभु के यहाँ विराजमान होने के कारण इस जगह को त्र्यंबक (तीन नेत्रों वाले) कहा जाने लगा। उज्जैन और ओंकारेश्वर की ही तरह त्र्यंबकेश्वर महाराज को इस गाँव का राजा माना जाता है, इसलिए हर सोमवार को त्र्यंबकेश्वर के राजा अपनी प्रजा का हाल जानने के लिए नगर भ्रमण के लिए निकलते हैं।

पौराणिक कथा : -
इस ज्योतिर्लिंग की स्थापना के विषय में शिवपुराण में यह कथा वर्णित है- एक बार महर्षि गौतम के तपोवन में रहने वाले ब्राह्मणों की पत्नियाँ किसी बात पर उनकी पत्नी अहिल्या से नाराज हो गईं। उन्होंने अपने पतियों को ऋषि गौतम का अपकार करने के लिए प्रेरित किया। उन ब्राह्मणों ने इसके निमित्त भगवान्‌ श्रीगणेशजी की आराधना की।
उनकी आाधना से प्रसन्न हो गणेशजी ने प्रकट होकर उनसे वर माँगने को कहा उन ब्राह्मणों ने कहा- 'प्रभो! यदि आप हम पर प्रसन्न हैं तो किसी प्रकार ऋषि गौतम को इस आश्रम से बाहर निकाल दें।' उनकी यह बात सुनकर गणेशजी ने उन्हें ऐसा वर माँगने के लिए समझाया। किंतु वे अपने आग्रह पर अटल रहे।
अंततः गणेशजी को विवश होकर उकी बात माननी पड़ी। अपने भक्तों का मन रखने के लिए वे एक दुर्बल गाय का रूप धारण करके ऋषि गौतम के खेत में जाकर रहने लगे। गाय को फसल चरते देखकर ऋषि बड़ी नरमी के साथ हाथ में तृण लेकर उसे हाँकने के लिए लपके। उन तृणों का स्पर्श होते ही वह गाय वहीं मरकर गिर पड़ी। अब तो बड़ा हाहाकार मचा। सारे ब्राह्मण एकत्र हो गो-हत्यारा कहकर ऋषि गौतम की भर्त्सना करने लगे। ऋषि गौतम इस घटना से बहुत आश्चर्यचकित और दुःखी थे। अब उन सारे ब्राह्मणों ने कहा कि तुम्हें यह आश्रम छोड़कर अन्यत्र कहीं दूर चले जाना चाहिए। गो-हत्यारे के निकट रहने से हमें भी पाप लगेगा। विवश होकर ऋषि गौतम अपनी पत्नी अहिल्या के साथ वहाँ से एक कोस दूर जाकर रहने लगे। किंतु उन ब्राह्मणों ने वहाँ भी उनका रहना दूभर कर दिया। वे कहने लगे- 'गो-हत्या के कारण तुम्हें अब वेद-पाठ और यज्ञादि के कार्य करने का कोई अधिकार नहीं रह गया।' अत्यंत अनुनय भाव से ऋषि गौतम ने उन ब्राह्मणों से प्रार्थना की कि आप लोग मेरे प्रायश्चित और उद्धार का कोई उपाय बताएँ। तब उन्होंने कहा- 'गौतम! तुम अपने पाप को सर्वत्र सबको बताते हुए तीन बार पूरी पृथ्वी की परिक्रमा करो। फिर लौटकर यहाँ एक महीने तक व्रत करो। इसके बाद 'ब्रह्मगिरी' की १०१ परिक्रमा करने के बाद तुम्हारी शुद्धि होगी अथवा यहाँ गंगाजी को लाकर उनके जल से स्नान करके एक करोड़ पार्थिव शिवलिंगों से शिवजी की आराधना करो। इसके बाद पुनः गंगाजी में स्नान करके इस ब्रह्मगरी की ११ बार परिक्रमा करो। फिर सौ घड़ों के पवित्र जल से पार्थिव शिवलिंगों को स्नान कराने से तुम्हारा उद्धार होगा। ब्राह्मणों के कथनानुसार महर्षि गौतम वे सारे कार्य पूरे करके पत्नी के साथ पूर्णतः तल्लीन होकर भगवान्‌ शिव की आराधना करने लगे। इससे प्रसन्न हो भगवान्‌ शिव ने प्रकट होकर उनसे वर माँगने को कहा। महर्षि गौतम ने उनसे कहा- 'भगवान्‌ मैं यही चाहता हूँ कि आप मुझे गो-हत्या के पाप से मुक्त कर दें।' भगवान्‌ शिव ने कहा- 'गौतम ! तुम सर्वथा निष्पाप हो। गो-हत्या का अपराध तुम पर छलपूर्वक लगाया गया था। छलपूर्वक ऐसा करवाने वाले तुम्हारे आश्रम के ब्राह्मणों को मैं दण्ड देना चाहता हूँ।' इस पर महर्षि गौतम ने कहा कि प्रभु! उन्हीं के निमित्त से तो मुझे आपका दर्शन प्राप्त हुआ है। अब उन्हें मेरा परमहित समझकर उन पर आप क्रोध न करें।' बहुत से ऋषियों, मुनियों और देवगणों ने वहाँ एकत्र हो गौतम की बात का अनुमोदन करते हुए भगवान्‌ शिव से सदा वहाँ निवास करने की प्रार्थना की। वे उनकी बात मानकर वहाँ त्र्यम्ब ज्योतिर्लिंग के नाम से स्थित हो गए। गौतमजी द्वारा लाई गई गंगाजी भी वहाँ पास में गोदावरी नाम से प्रवाहित होने लगीं। यह ज्योतिर्लिंग समस्त पुण्यों को प्रदान करने वाला है। ।। ॐ नमः शिवाय ।।

Wednesday 8 August 2012

म्हातारपण आणि वृद्धाश्रम 


समुद्र किनाऱ्यावर छोटे बहिण भाऊ वाळूचं घर बनवण्यात मग्न होते..

"थांब दादा असं नाही... इथे आपण गाडी ठेवायची.."

त्यांचा खेळ कल्पना पाहताना त्यांच्या आईला फार बर वाटत होत...

"आई बघ हं,, ही रूम माझी,, ही ताई ची,, आणि ही तुझी.. किती छान आहे ना आपलं घर...??.."

आपण बनवलेलं घर आपल्या आईला कौतुकाने दाखवत मुलगा म्हणाला..

इतक्यात त्याचे बाबा मुलांसाठी आईस क्रीम घेऊन आले,, आणि विचारल "आणि माझी रूम रे..?? मी कुठे राहायचं..??"

निरागसपणे त्या छोट्या जीवांनी उत्तर दिलं, "बाबा तुम्हाला कशाला हवीये रूम..??
तुम्ही कसं आजोबांना वृद्धाश्रमात पाठवलंत,, आम्ही पण तुम्हाला पाठवणार..
बाबा म्हातारे झाले कि त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात ना..??.."

हे ऐकून त्या बापाला आपल्या केलेल्या कर्माची फळ दिसू लागली....
विचार चक्र जोरात फिरू लागलं...

'हे आपण काय शिकवलं..??'

विचार चक्राची गती वाढत गेली आणि तो बाप चक्कर येऊन तिथेच थंड पडला....... 

म्हणतात ना, आपण जसं पेरतो  अगदी तसंच उगवत. म्हणून पेरतानाच काळजी घेतलेली बरी !!!


पवित्र श्रावण मास के चलते हमने आजतक बारा ज्योतिर्लिंगो में से छह पवित्र ज्योतिर्लिंगोंका दर्शन किया । आज हम दर्शन करेंगे सातवे ज्योतिर्लिंग विश्वेश्वर जी का ।

७) विश्वेश्वर ज्योतिर्लिंग : - विश्वनाथ ज्योतिर्लिंग भारत के १२ ज्योतिर्लिंगो में से एक ज्योतिर्लिंग है. यह ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेश के काशी नामक स्थान में है. काशी सभी धर्म स्थलों में सबसे अधिक महत्व रखती है. सभी धर्म स्थलों में काशी का अत्यधिक महत्व कहा गया है. इस स्थान की मान्यता है, कि यह स्थान सदैव बना रहेगा. अगर कभी इस पृ्थ्वी पर किसी तरह की कोई प्रलय आती भी है, तो इसकी रक्षा के लिए भगवान शिव इस स्थान को अपने त्रिशूल पर धारण कर लेगें. और प्रलय के टल जाने पर काशी को इसके स्थान पर रख देगें.

काशी मोक्ष नगरी : धर्म शास्त्रों के अनुसार सृष्टि का प्रारम्भ भी इसी स्थान को कहा गया है. इस स्थान के विषय में एक पौराणिक कथा प्रसिद्ध है, कि सृ्ष्टि रचना के लिए भगवान शिव की उपासना इसी स्थान पर श्री विष्णु जी ने की थी. इसके अतिरिक्त ऋषि अगस्त्य ने इसी स्थान पर भगवान शिव को प्रसन्न करने के लिए उपासना की थी. इस नगरी से कई मान्यताएं जुडी हुई है. काशी धर्म स्थल के विषय में कहा जाता है, कि इस स्थान पर जो भी व्यक्ति अंतिम सांस लेता है. उसे मोक्ष की प्राप्ति होती है. इस स्थान की महिमा के विषय में जितना कहा जाए कम है. कहा जाता है. कि यहां मृ्त्यु को प्राप्त करने वाले व्यक्ति को भगवान शंकर मृ्त्युधारक के कान में मोक्ष प्राप्ति का उपदेश देते है. इस मंत्र को सुनने मात्र से पापी से पापी व्यक्ति भी भवसागर को पार कर श्री विष्णु लोक में जाता है. अधर्मी और अनाचारी भी यहां मृ्त्यु होने के बाद संसार के बंधनों से मुक्त हो गए है. प्राचीन धर्म शास्त्र मत्स्य पुराण के अनुसार काशी नगरी जप, ध्यान की नगरी है. यहां आकर व्यक्ति को उसके दु:खों से मुक्ति मिलती है. इसी पवित्र नगरी में विश्वनाथ मंदिर ज्योतिर्लिंग स्थित है. इस ज्योतिर्लिंग को विश्वेश्वर ज्योतिर्लिंग के नाम से भी जाना जाता है. मणिककर्णिका, दशाश्वमेध, लोलार्क, बिंदूमाधव और केशवश्री विश्वनाथ धाम में ही पांच प्रमुख तीर्थ है. इसमे दशाश्वमेध, लोलार्क, बिंदूमाधव, केशव और मणिकर्णिका है. एक स्थान पर ही पांच धर्म स्थल होने के कारण इस स्थान को परमगति देने वाला स्थान कहा गया है. श्री विश्वनाथ धाम की महत्वता इसके साथ स्थित अन्य पांच तीर्थ स्थल भी बढाते है.

विश्वनाथ ज्योतिर्लिंग कथा : विश्वनाथ ज्योतिर्लिंग के संबन्ध में एक पौराणिक कथा प्रचलित है. बात उस समय की है जब भगवान शंकर पार्वती जी से विवाह करने के बाद कैलाश पर्वत पर ही रहते थें. परन्तु पार्वती जी को यह बात अखरती थी कि, विवाह के बाद भी उन्हें अपने पिता के घर में ही रहना पडे़. इस दिन अपने मन की यह इच्छा देवी पार्वती जी ने भगवान शिव के सम्मुख रख दी. अपनी प्रिया की यह बात सुनकर भगवान शिव कैलाश पर्वत को छोड कर देवी पार्वती के साथ काशी नगरी में आकर रहने लगे. और काशी नगरी में आने के बाद भगवान शिव यहां ज्योतिर्लिंग के रुप में स्थापित हो गए. तभी से काशी नगरी में विश्वनाथ ज्योतिर्लिग ही भगवान शिव का निवास स्थान बन गया है.

विश्वनाथ ज्योतिर्लिग महत्व : काशी नगरी की वि़शेषता विश्वनाथ ज्योतिर्लिंग के कारण ही आज अन्य सभी धर्म स्थलों में सबसे अधिक है. जो जन इस नगरी में आकर भगवान शिव का पूजन और दर्शन करता है. उसे उसके समस्त पापों से मुक्ति मिलती है. भगवान शिव अपने भक्त की सभी पापों को स्वयं वहन करते है. और श्रद्वालु को सुख और कामना पूर्ति का आशिर्वाद देते है. भगवान शिव की नगरी कही जाने वाली काशी में स्थित पांच अन्य तीर्थ स्थल भी है. फिर भी भगवान शिव को परम सत्य, सुन्दर और परमात्मा कहा गया है. भगवान शिव सत्यम शिवम और सुंदरम है. वे ही सत्य है. वे ही ब्रह्मा है, और शिव ही शुभ होकर आत्मा के कारक है. इस जीवन में भगवान शिव और देवी पार्वती के अलावा कुछ भी अन्य जानने योग्य नहीं है. शिव ही आदि और शिव ही इस सृ्ष्टि का अंत है. जो भगवान शिव की शरण में नहीं जाता है, वह पाप और दु:ख में डूबता जाता है. ।। ॐ नमः शिवाय ।।



Monday 6 August 2012

सुख आणि दुःख

अकबर ने बीरबल से ऐसा लिखने को कहा जिसे ख़ुशी में पढो तो गम हो और गम में पढो तो ख़ुशी हो. 
बीरबल ने लिखा 
"ये वक्त गुजर जायेगा"

हे वाचल्या बरोब्बर वाटले कि बीरबलाला कसे अगदी अचूक माहित होते सर्व !! क्षणभर त्याच्या बुद्धीचे कौतुक करावेसे वाटले. परंतू, खोलात शिरून , ह्या वाक्याचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयन्त केल्यावर लक्षात आले कि, बीरबल ने जे काही सांगितले ते फक्त व्यावहारिक जीवनाला लागू पडणारे आहे. त्याने बहुधा तात्विक दृष्टीकोनातून ह्यावर विचार केला नव्हता. सुख आणि दुःख, ये वक्त गुजर जायेगा.....ह्या सर्व गोष्टी फक्त बद्ध देहाला लागू आहेत. हा  बद्ध देह फक्त दृश्य गोष्टी जणू शकतो. परंतु, ह्या दृश्य गोष्टी पलीकडे जे अदृश्य आहे, तिथे आत्मा / चैतन्य / प्राण / परमात्मा / ब्रम्ह याची निरंतर सत्चीतानंद अवस्थे मध्ये वसती आहे. त्यांना या सुख, दुःख, वक्त वगैरे क्षणभंगुर अशा उपाधींची बाधा नसते. अशा या परमानंद अवस्थेत, बीरबल च्या ह्या हजरजवाबी उत्तराला, खरोखरच काही मूल्य आहे काय?     

आज तिसरा श्रावणी सोमवार .... पवित्र श्रावण मास के चलते हमने आजतक बारा ज्योतिर्लिंगो में से पांच पवित्र ज्योतिर्लिंगोंका दर्शन किया ।आज सोमवार के पवित्र दिन भी हम सभी श्री गणेशभक्त ज्योतिर्लिंगो में से छंटवां ज्योतिर्लिंग भीमाशंकर ज्योतिर्लिंग के दर्शन करेंगे । 

६) भीमाशंकर ज्योतिर्लिंग : -

भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाराष्ट्र के पूणे जिले में सहाद्रि नामक पर्वत पर स्थित है. इस मंदिर की गणना भारत के बारा ज्योतिर्लिंगों में की जाती है. पास में ही बहती भीमा नदी इसके सौन्दर्य को बढाती है. इसके अतिरिक्त यहां बहने वाली एक अन्य नदी कृ्ष्णा नदी है. दो पवित्र नदियों के निकट बहने से इस स्थान की महत्वत्ता ओर भी बढ जाती है. महाशिवरात्री या प्रत्येक माह में आने वाली शिवरात्री में यहां पहुंचने के लिए विशेष बसों का प्रबन्ध किया जाता है. 

भीमाशंकर ज्योतिर्लिंग का वर्णन शिवपुराण में मिलता है. शिवपुराण में कहा गया है, कि पुराने समय में भीम नाम का एक राक्षस था. वह राक्षस कुंभकर्ण का पुत्र था. परन्तु उसका जन्म ठिक उसके पिता की मृ्त्यु के बाद हुआ था. अपनी पिता की मृ्त्यु भगवान राम के हाथों होने की घटना की उसे जानकारी नहीं थी. समय बीतने के साथ जब उसे अपनी माता से इस घटना की जानकारी हुई तो वह श्री भगवान राम का वध करने के लिए आतुर हो गया. अपने उद्देश्य को पूरा करने के लिए उसने अनेक वर्षों तक कठोर तपस्या की. उसकी तपस्या से प्रसन्न होकर उसे ब्रह्मा जी ने विजयी होने का वरदान दिया. वरदान पाने के बाद राक्षस निरंकुश हो गया. उससे मनुष्यों के साथ साथ देवी देवता भी भयभीत रहने लगे. धीरे-धीरे सभी जगह उसके आंतक की चर्चा होने लगी. युद्ध में उसने देवताओं को भी परास्त करना प्रारम्भ कर दिया. जहां वह जाता मृ्त्यु का तांडव होने लगता. उसने सभी और पूजा पाठ बन्द करवा दिए. अत्यन्त परेशान होने के बाद सभी देव भगवान शिव की शरण में गए. भगवान शिव ने सभी को आश्वासन दिलाया की वे इस का उपाय निकालेगें. भगवान शिव ने राक्षस को नष्ट कर दिया. भगवान शिव से सभी देवों ने आग्रह किया कि वे इसी स्थान पर शिवलिंग के रुप में विराजित हो़. उनकी इस प्रार्थना को भगवान शिव ने स्वीकार किया. और वे भीमाशंकर ज्योतिर्लिंग के रुप में आज भी यहां विराजित है.

भीमाशंकर ज्योतिर्लिंग को मोटेश्वर महादेव के नाम से भी जाना जाता है. धर्म पुराणों में भी इस ज्योतिर्लिंग का वर्णन मिलता है. इस ज्योतिर्लिंग के दर्शन मात्र से व्यक्ति को समस्त दु:खों से छुटकारा मिलता है. इस मंदिर के विषय में यह मान्यता है, कि जो भक्त श्रद्धा से इस मंदिर के प्रतिदिन सुबह सूर्य निकलने के बाद दर्शन करता है, उसके सात जन्मों के पाप दूर होते है. तथा उसके लिए स्वर्ग के मार्ग स्वत: खुल जाते है. ।। ॐ नमः शिवाय ।।