Wednesday 19 September 2012


मुके प्रेम 

नवीन रिलीज झालेला चांगला  आणि आमच्या वयाला शोभणारा चित्रपट पहिल्या दिवशी नाहीं तर किमान दुसऱ्या दिवशी पाहायचाच, अशा विचित्र हट्टाचा जन्म आमच्या जीवनात अगदी अलीकडेच झाला. मिडल इस्ट देशाने आम्हाला दिलेली ही भेट आम्ही अगदी व्यवस्थितपणे बेमालून वापरतो. मागच्या आठवड्यात "बर्फी" हा चित्रपट सायंकाळी साडेसात चा शो पहाण्यासाठी गेलो. गर्दी खूप असल्यामुळे आम्हाला रात्री दहा च्या शो ची तिकिटे मिळाली. दोन तास काय करायचे म्हणून आम्ही जवळच्याच shopping mall मध्ये चालत चालत उगीचच फिरायला गेलो. परतीच्या सामसूम वाटेवर छान पैकी काळजीपूर्वक वाढवलेली हिरवीगार  झुडुपे नजरेस पडली. आम्ही दोघेही त्याचं कौतुक करत असताना त्या झुडुपातून एक मांजर झटदिशी बाहेर टुपुकन उडी मारून  बाहेर आले. कुणीतरी पाळलेल मांजर असावे ते. काही कृतघ्न लोक मजेसाठी म्हणून जनावर पाळतात आणि कंटाळा आला कि किंव्हा त्यांची काळजी घेणे परवडत नाहीं म्हणून दूर कुठे तरी सोडून त्यांना परक आणि अनाथ करतात. असं अनाथ झालेलं ते मांजर आम्हाला बघितल्यावर एकदम आमच्या मागे मागे यायला लागले. तिला वाटले असेल कि आम्ही तिला आपलंस करून घेवू आणि तिच्यावर प्रेमाची छत्री धरू. खरच, 'आशा' किती फसवी असते !! किती दिवस अशा ह्या फसव्या आशेवर ते मांजर जगत असेल? का कुणी तिला आधी सुखाच्या जीवनाची पहाट दाखवली आणि अचानक एके दिवशी तिला दुखः च्या खाईत लोटले? असा विचार करतकरत तो लांब रस्ता आम्ही पार करत असताना, ते मांजर हळूच एकदा माझ्या बाजूला यायचं आणि हळूच एकदा आनंदच्या बाजूला जायचं. मध्येच जेव्हा तिच्या लक्षात आले कि, आम्हाला तिच्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा होत नाहीं आहे , तेव्हा ती मागेच थांबली. सहज आम्ही मागे वळून पाहिले, तो काय आश्चर्य, ती पटकन परत उडी मारून पळत पळत आमच्या मागे धावत आली. तिचा तो अधीरपणा पाहून डोळ्यात पाणी आले. आम्ही लक्ष देत नाहीं म्हणून  मध्येच थांबण आणि आम्ही मागे वळून पाहिल्यावर झटदिशी पळत पळत आमच्या मागे येण, तिच्या ह्या कृतीत जिव्हाळ्याचा, प्रेमाचा, लाघाविपणाचा , ममतेसाठी आसुसलेल्या त्या अबोल जीवाच्या धडपडीची आम्हाला जाणवली आणि आपण ह्या साठी फारसे काही करू शकत नाहीं ह्याची खंत वाटली. फक्त दहाच मिनिटात एकमेकांशी काहीही न बोलता , काहीही व्यक्त न करता त्या मांजरीने आमच्याकडून बिनशार्तीने दिलेले आणि मागितलेले प्रेम आमच्या हृदयावर कायमचा ठसा मांडून  गेले. रस्ता ओलांडताना रस्त्यावरची वेगाने धावणारी वाहन पाहून मन कचरलं. सहज मागे वळून पाहिलं आणि ते गोंडस मांजर झुडुपात गपचूप बसलेलं नजरेला पडलं. पलीकडच्या रस्त्यावर जायच्या  आमच्या मार्गक्रमणाचा किती बरोब्बर  अर्थ तिला कळला होता. अशी निराशा किती वेळा तिच्या पदरी पडली असेल, काय वाटत असेल तिला, कसे झेपत असेल ती हे सर्व.....त्या मुक्या प्राणीला जोराने ओरडून काही सांगावंसे वाटत नसेल का? का कळत नाहीं अशा मुक्या जनावरांच्या भावना माणसाला? का मग त्यांना स्वछंदपणे  राहू देत नाहीं? मनातल्या ह्या अशा अनेक प्रश्नांना  कधी उत्तर मिळेल कि नाहीं , फक्त देवास ठाऊक.  .........

दूर्वा - शमी - मंदार - या तीन वनस्पती गणपतीला प्रिय आहेत. यांतील दूर्वा ही साक्षात ब्रह्मदेवाच्या शरीरातून निर्माण झालेली एक सुंदर देवता होय. ब्रह्मदेवाने तिचे दूर्वा हे नाव ठेवले. तिने पुढे तप केले व ती गणेशाला प्रिय ठरली.

कालांतराने तिला आपल्या ऐश्वर्याचा गर्व झाला. ती जगदंबेहूनही स्वतःला श्रेष्ठ समजू लागली. तेव्हा पार्वतीने तिला तृणरूपाने पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप दिला. पुढे तप करून तिने या शापातून मुक्ती मिळवली. ती अंशरूपाने पृथ्वीवर राहून गणेशाच्या पूजेत आवश्यक बनली व उर्वरित अंशांनी स्वर्गात देवीरूपाने राहिली.

और्वऋषीला शमिका नावाची मुलगी होती. धौम्य ऋषीचा मुलगा मंदार याच्याशी तिचा विवाह झाला. त्यांच्या आश्रमात एकदा भृशुंडी ऋषी आले असता त्यांचे मोठे पोट व स्थूल शरीर पाहून ती दोघे त्यांना हसली. तेव्हा भृशुंडी ऋषींनी त्यांना शाप दिला, की 'तुम्ही दोघे वृक्षयोनीत जन्म घ्याल.' त्याप्रमाणे ती दोघे शमी व मंदार बनली. पुढे मंदाराचा गुरू शौनक व सासरा और्व यांनी गणेशाला प्रसन्न करून घेण्यासाठी तप सुरू केले. गणेश प्रसन्न झाला. तेव्हा त्यांनी शमी-मंदाराला पूर्व देह प्राप्त व्हावा, असा वर मागितला. त्यावर गणपतीने म्हटले की, 'भृशुंडीचा शाप खोटा ठरणार नाही. पण आजपासून मी मंदारवृक्षाच्या मुळाशी वास करीन व शमीपत्रे मला प्रिय होतील.' मंदार वृक्षाच्या मुळाची गणेशमूर्ती करतात व हा मंदारगणेश भक्तांना लवकर प्रसन्न होतो, असा समज आहे.


वांग्याची भाजी



कोल्हापूर आणि अथणी येथे मिळणारी गडद जांभूळ रंगाची छोट्या लांबट आकाराच्या  वांगीचा स्वाद घ्यायचा ज्यांना भ्याग्य लाभले त्यानांच ''रुचकर वांगी चा " खरा अर्थ माहित असला पाहिजे. आता वांगी ही भाजी खुपश्या लोकांना आवडत नाहीं ही गोष्ट ही वेगळी. पण ज्यांना आवडतात ते ही भाजी बारा महिने तेरा काळ खावू शकतील ह्याची मी १००% खात्री देवू शकेन. बरीच वर्षे अशी वांगी मला कुठे मिळाली नव्हती. परंतु,  काही  दिवसा पूर्वी, अचानक लु लु सुपर मार्केट मध्ये अशी ही दुर्मिळ वांगी दिसली आणि मी त्याच्यावर एकदम अधाशी पणाने तुटून पडले. मनसोक्त मजेत एकेक वांग वेचून घेतलं आणि  दुसऱ्या दिवशीच मस्त पैकी जपून सावरून , मोजून मापून, देवाचं नाव घेत अगदी मन लावून, आनंदात मनापासून त्याची मसालेदार भाजी बनवली. बनवताना तोंडाच्या रुची ग्रंथींना सुटलेल्या पाण्याचे वर्णन न केलेलेच बरे !! जेवणात पहिला घास खाल्याबरोबर नवऱ्याने केलेली स्तुती मी माझ्या आख्ख्या जन्मात कधीही विसरू शकणार नाहीं..."आजची ही वांग्याची भाजी खावून मला माझ्या आज्जीची आठवण झाली. तिच्या हाताची चव सुद्धा अशीच असायची. मस्त झाली आहे भाजी." आनंदची आज्जी ह्या एक उदात्त व्यक्तिमत्वाचा कळस होता. सर्वांवर प्रेम कसे करावे हे कोणीही त्यांच्या कडून शिकावे. माझ्या मते त्या चालत्या बोलत्या देवी सारख्या होत्या. अशा ह्या महान व्यक्तीशी काहीना काही कारणासाठी का होईना आपली तुलना झाली, हे कळून जीवनाचे सार्थक झाल्या सारखे वाटले. 

थोडया  वेळाने, नवऱ्याने विचारले, "ही वांगी आपण परवा लु लु सुपर मार्केट मधून आणली तीच ना? " मी म्हटले , "हो, का?". नवरा , " वांगी चवीला एकदम मस्त आहेत. भाजी मस्त झाली आहे. " त्यांचे म्हणणे पण खरेच होते. मी म्हटले, " वांगी मस्त आहेत, मसाल्याचे सामान सुद्धा बरोबर पडले आहे आणि मुख्य म्हणजे मी अगदी मन लावून भाजी केली आहे." त्या नंतर दोन-तीन दिवसांनी मी आलू पराठे केले. मन लावून , मस्त मसाला घालून चविष्ट पराठे नवऱ्याला आवडले. त्यांनी विचारले," असे कसे एकदम खुसखुशीत आणि टेस्टी झाले आहेत पराठे आज? " मी म्हटले, " मला पण माहित नाहीं. कदाचित बटाटे चवीला एकदम मस्त असतील !!!!!" ........(नवरा काहीही बोलला तरी त्याचा अर्थ बायको बरोबर उलटा  काढते , ह्याची खात्री पटली ना तुम्हाला?) 

आज आपण सारे श्री गणेशभक्त भारतातील प्रमुख २१ गणेश स्थाने आणि त्यांची स्थापना कोणी केली ते पाहणार आहोत. 

पुराणोक्त २१ प्रमुख गणेश स्थाने आणि त्याची स्थापना करणारे : - 

१ प्रयाग -ओंकारेश्वर (वेद व ओम कार द्वारा स्थापित) 
२ गंगा मसले-भालचंद्र (चंद्र द्वारा स्थापित) 
३ थेऊर -चिंतामणी (ब्रह्मद्वारा स्थापित)
४ राक्षसंभुवन -विज्ञान गणेश (दत्तात्रय स्थापित) 
५ सिद्धटेक -सिद्धिविनायक (विष्णुद्वारा स्थापित) 
६ काश्मीर - महोत्कट (कश्यप द्वारा स्थापित) 
७ विजयपुरी- विघ्नराज (माहिती उपलब्ध नाहि)
८ कुंभकोणं-श्वेत गणेश (समुद्र मंथन वेळी) 
९ नामलगाव -आशापुरक गणेश (यम द्वारा स्थापित) 
१० आधासा -अदोष क्षेत्र शमी विन्घेश (देव व ऋषी द्वारा स्थापित) 
११ गणेशपूर - गणेश बंगाल 
१२ रांजणगाव महागणपती (शंकर द्वारा स्थापित) 
१३ पारीनेर मंगल मूर्ती (मंगल ग्रह द्वारा स्थापित)
१४ पद्मालय- प्रवाळ गणेश व धरणीधर गणेश (दत्तभक्त सहस्त्रार्जुन आणि शेष)
१५ पाली-बल्लाळेश्वर (भक्त बल्लाळ स्थापित, मूळ स्थान सिंध प्रदेशात होते )
१६ कदंबपूर- चिंतामणी (इंद्र स्थापित) 
१७ लेण्याद्री-गिरीजात्मज (पार्वती स्थापित)
१८ काशी- ढूंढीराज 
१९ वेरूळ-लक्षविनायक (स्कंद स्थापित) 
२० राजूर- महागणपती (वरण्य राजा स्थापित)
२१ मोरगाव-मयुरेश्वर (पाच देवांनी स्थापित) 

|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया || 



Sunday 9 September 2012


दाने दाने पर लिखा हैं खानेवाले का नाम....

१९८४ साली लग्न झाल्यावर आम्हा दोघांनाही आमच्या आयुष्यात कसे, केव्हा , कधी,....काय काय, घडणार आहे ह्याची जरा सुद्धा कल्पना नव्हती. एकमेकांच्या प्रेमात धुंद झालेल्या त्या दोन जीवांना फक्त एकच त्या क्षणाला माहित होत कि, एकमेकांशिवाय आपण जगू शकत नाहीं आणि त्यासाठी लग्नाशिवाय दुसरा उपाय नाहीं. आता ह्या वयात आम्ही मागे वळून हळूच जेव्हा त्या काळात डोकावून पाहण्याचा प्रयन्त करतो , तेव्हा आमच्या धैर्याच, निर्धाराच, प्रेमानं एकमेकांना दिलेल्या वचनांच खरोखरच अचंबा वाटतो. तरुण वय किती वेड असते नाहीं ? लग्न झाल्यानंतर आम्हाला वाटले होते कि, आम्ही कायमचे मुंबईकर बनू आणि जीवनात येण्याऱ्या प्रत्येक क्षणाला आहे त्या परिस्थितीत तडजोड करून आपले जगणे रम्यमय करून आयुष्याचा अर्थ शोधून काढू. परंतु नशिबात दुसरेच काही तरी लिहून ठेवले होते. लग्न झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षांनीच नवऱ्याची विदेश यात्रा जी सुरु झाली ती अजूनही २०१२ पर्यंत चालूच आहे. मधल्या काळात, दोघानंही मुलींसकट एकत्र राहावयास मिळावे म्हणून मी माझी नौकरीचा दिलेला राजीनामा , नन्तर मुलींच्या शिक्षणाचे हाल होवू नयेत आणि त्यांना उत्तम प्रतीचे ज्ञान मिळावे म्हणून अगदी हौशीच्या वयात दोघांनी जाणूनबुजून दूर राहून सहन केलेला विरह ...अशा कित्येक प्रमेयांशी आम्ही केलेल्या प्रयोगात आम्ही खूप ठिकाणी फिरलो. नवनवीन देश बघितले, अनंत प्रकारचे लोक भेटले, काहींनी आमच्या मनात कायमची जागा केली तर काही वाटेतले फक्त सह-प्रवासी निघाले. अशा या प्रवासात आम्हाला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट ज्यावर आम्ही दररोज चर्चा करतो, ती म्हणजे, कुठल्यातरी परक्या ठिकाणी येवून ध्यानीमनी नसताना कुठे तरी दुसऱ्या ठिकाणी कोणी तरी अनोळख्या माणसांनी उगवलेला अन्नाचा कण आपल्या मुखात जातो आणि आम्ही  त्या कर्ता-करवित्याला धन्यवाद देतो. खरच १९८४ मध्ये आम्हाला या किमयेची जरा सुद्धा कल्पना नव्हती कि २०१२ पर्यंतच्या काळात मी १० देशातील आणि आनंद २०-२२ देशातील अन्नाच्या कणाचा आनंद भोगू म्हणून !!!! 

पर्यंतू, हल्ली आपल्याला अनेक देशात उत्पन्न केलेल्या धान्य, फळ, कपडे इत्यादींचा आनंद घर बसल्या घेता येतो. आधुनिक जगात सर्व काही एका चुटकीत मिळते. परवाच आम्ही सुपर मार्केट मधून बऱ्याच गोष्टी खरेदी केल्या. घरी आल्यावार लिस्ट पाहिली तर मला एकदम धक्का बसला ....त्या मध्ये पाकिस्तानी दुधी, श्री लंकेचा पपया , भारताची चवळी, इंडिअन लिंबू, इंडिअन कांदा, ऑस्ट्रेलियाची गाजर, दुबई ची काकडी, लेबेनान चे बटाटे, मलेशियाचे टोमाटो, चीनचे पेअर , हॉलंड ची संत्र ......बापरे, नऊ देश आणि एकच लिस्ट आणि खाणारी तोंड फक्त दोन !!! मज्जा आहे कि नाहीं !!   

श्री गणेशाची साडेतीन पीठे : 

पहिले पीठ - मोरगाव :'भूस्वानंदपूर ' म्हणजेच आजचे प्रचलित 'मोरगाव'. गाणपत्य सांप्रदायाचे आद्यपीठ मोरगाव. या क्षेत्राचा आकार मोरासारखा आहे. ब्रम्ह, विष्णू, महेश, सूर्य व शक्ती या पंचदेवांनी ॐकार स्वरूपी गणेशाची तिथे स्थापना केली. उन्मत्त सिंदुरासुराचा वध करून त्याचा सेनापती कमलासूर याचाही वध श्री गणेशाने केला. कमलासूराचे शीर जमिनीत गाडून त्याच्यावर तो आरूढ होऊन बसला. आजही त्याचे प्रतिक म्हणून विजयादशमीच्या दिवशी मोठा उत्सव साजरा केला जातो. येथे गणेशापुढे एक नंदी आहे हे याचे वैशिष्ठ्य. नाहि तर शक्यतो आपण नंदिचे दर्शन केवळ महादेव शंकरांच्या मंदिरात करतो. पुण्यापासून ५२ कि.मी. वर मोरगाव क्षेत्र आहे. पुणे ते मोरगाव एस.टी. आहे.


दुसरे पीठ - राजूर : मोरगावी कमलासुराचा मयुरेश्वराने वध केला. मोरगावी कमलासुराचे शिर पडले आणि जिथे कमरे पर्यंतचा भाग पडला ते राजूर येथे दुसरे पीठ. राजूर म्हणजेच पूर्वीचे राजापूर. वरण्य राजाचा राजवाडा या भागात होता. व
 रण्य राजाला श्री गणेशाने 'गणेशगीता' सांगितली. कृष्णाच्या तोंडून म्हणजेच प्रत्यक्ष भगवंताच्या तोंडून अर्जूनाने गीता ऐकली. तद्वत साक्षात गणेशाने आपल्या मुखातून वरण्य राजाला गणेशगीता सांगितली. त्यामुळे गाणपत्य सांप्रदायात या स्थानाला फार महत्व आहे. राजा वाराण्याने प्रतिष्ठापना केलेल्या या क्षेत्राला राजूरचा 'महागणपती' म्हणतात.

मराठवाड्यातील जालन्यापासून २२ कि.मी. वर हे क्षेत्र आहे. राजूर गावानजीक एका टेकडीवर हे गणेश मंदिर असून येथे वरण्य राजाची मूर्ती सुद्धा आहे. या ठिकाणाला गड म्हणतात.
हा गणपती नवसाच्या सामाईला पावतो. येथील मूर्तीपुढे अंदाचे सव्वाशे समया तेवत असतात. शेकडो सामायांतील ज्योतींच्या मंद व मंगल प्रकाशात हि मूर्ती फारच विलोभनीय दिसते. पराशर ऋषींच्या आश्रमातून श्री गणेशाला वरण्य राजाने चैत्र शु.प्रतिपदेला राजूर, राजापूर येथे आणले. म्हणून गुढीपाडव्याला या गणेशाचे दर्शन घेणे हि पर्वणी मानली जाते. 

तिसरे पीठ - पद्मालय : येथे दोन गणेश मूर्ती आहेत. महान दत्तभक्त सहस्त्रार्जुनाने स्थापन केलेला 'प्रवाळ गणेश' आणि त्याच्या शेजारी शेषाने स्थापन केलेला 'धरणीश्वर गणेश'. यातील गणेशाची मूर्ती एक उजव्या सोंडेची व दुस
 री डाव्या सोंडेची आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावापासून ८ कि.मी. वर पद्मालय आहे. हे मंदिर डोंगरावर असून तेथील तलावात विविध प्रकारची पद्म कमले फुलतात. म्हणून या क्षेत्राला 'पद्मालय' असे नाव पडले.

समुद्रमंथनाच्या वेळी शेष समुद्रतळाशी होता. अमृत-कुंभ देवांना आपल्यामुळे मिळाला असा अहंकार त्याला निर्माण झाला. त्याचा अहंकार पाहून संतप्त होऊन शिवाने त्याला खडकावर आपटले. त्याच्या डोक्याचे दहा तुकडे झाले. नारदाने त्याचे सांत्वन करून त्याला गणेश उपासना करावयास सांगितले. त्यानुसार त्याने ती केली. गणेश त्यावर प्रसन्न झाले व तू सहस्त्रवदन होशील आणि माझा सहवास तुला लाभावा यासाठी मी तुला माझ्या उदरावर धारण करीन. तसेच पृथ्वीला तू तुझ्या फण्यावर फुलासारखी तोलून धरशील असा आशीर्वाद श्री गणेशाने त्याला दिला. म्हणून शेषाने स्थापन केलेल्या मूर्तीला 'धरणीश्वर गणेश' असे म्हणतात.



अर्ध पीठ, चिंचवड  : चिंचवड हे गणपती क्षेत्र पुराणोक्त नाही. परंतु महान गाणपत्य साधू मोरया गोसावींच्या मुळे याला महत्वाचे स्थान प्राप्त झाले. कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील 'शाली' नावाच्या गावचे वामनभट व पार्वतीबाई हे दांपत्य मोरगावला आले. या दोघांनी पुत्रप्राप्तीसाठी अनुष्ठान केले. त्यांना माघ वद्य चतुर्थी शके १२९७ मोरगावला श्रीगणेशकृपेने मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी 'मोरया गोसावी' ठेवले.

नयनभारती यांच्याकडून अनुग्रह घेतलेले मोरया गोसावी थेऊरला अनुष्ठानासाठी आले. तिथे त्यांना मुळा-मुठेच्या नदीत स्नान करताना श्रीगणेशाचा साक्षात्कार होऊन श्रीगणेशमूर्तीचा तांदळा स्वरुपात प्रसाद मिळाला. ती मूर्ती घेऊन ते मोरगावी वारी करीत असत. सध्या तो तांदळा चिंचवड येथे देऊळवाड्यात आहे. मोरया गोसावींनी मार्गशीर्ष वद्य षष्ठी शके १३८३ रोजी जिवंत समाधी घेतली. मोरगावचा मोरेश्वर चिंचवडी आला, म्हणून हे अर्ध पीठ ओळखले जाते. चिंचवड हे ठिकाण पुण्यापासून १८ कि.मी. आहे.

।। ॐ गं गणपतये नमः ।।

।। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ।।
 

Monday 3 September 2012


योगायोग 
श्री भगवत-गीतेचा सारांश 


शाळेत असताना संस्कृत हा विषय मी optional म्हणून घेतला होता. माझी आई संस्कृत मध्ये B.A. ला कर्नाटक महाविद्यालयात गोल्ड मेडलिस्ट असल्यामुळे मी संस्कृत हा विषय तिच्या भरवश्यावर घेणे अगदी साहजिक होते. मला हा विषय मनापासून आवडावा ह्या साठी तिने भरपूर प्रयन्त ही केला. मी मात्र,"मार्क्स मिळवून देणारा विषय " ह्या विचाराच्या पलीकडे त्याच्याकडे कधी ही पाहिले नाहीं. परिणाम, मला हा विषय कधीही नीट उमजला नाहीं आणि पाठांतराच्या जोरावर चांगल्या पैकी मार्क्स मिळवून इयत्ता १० झाल्यानंतर संस्कृतच्या गावाची वाट कधी पकडलीच नाहीं. तशी आवश्यकता ही वाटली नाहीं. माझ्या दोन्ही लेकी शाळेत असताना भागवत गीतेतील अध्याय पाठ करून स्पर्धेमध्ये जेव्हा बक्षीश घेवून यायच्या तेव्हा त्यांचं खूप कौतुक ही केलं. परंतु, त्या भाषेची आणि माझी कधीच नजरेला नजर मिळाली नाहीं आणि आमचं एकमेकांवर कधीच प्रेम जुळल नाहीं. 

पण  आता आयुष्याच्या ह्या वळणावर, ह्या भाषेबद्दल असलेल आपलं अज्ञान मला बरंच जाणवत आहे. चार वर्षा पूर्वी आम्ही दोघांनी मिळून अध्यात्म विषयीचे वाचन चालू केले. बरेच काही आम्ही इंग्लिश आणि मराठीत लिहिलेले वाचतो. वाचतांना मध्ये मध्ये बरेच संस्कृत मधले श्लोक येतात आणि उच्चार बरोबर करता येत नाहीं आणि अर्थ कळत नाहीं ह्याचे वाईट वाटते. अडत काही नाहीं कारण शेवटी अध्यात्म हा कुठल्याही भाषेत वाचला तरी आपल्याला त्यातला गर्भित अर्थ कळला तर खूप आहे. तरी पण......"मला भगवत गीता संस्कृत मध्ये वाचता आली असती तर बरे झाले असते," असे कित्येकदा वाटते. ह्या सर्व कारणांमुळे, भगवत गीता मी मनापासून समजावून घेण्याचा कधी प्रयन्त केला नव्हता. पण मनात एक सुप्त अशी आशा कि भगवत गीतेचा सारांश तरी समजावून घ्यावा. अशा     सारांशाचा शोध करताना मला एकदम सुरेख असे लिखाण वाचायला मिळाले. गीतेतला प्रेमयोग/भक्तियोग , ज्ञानयोग, कर्मयोग किती सहज शब्दात आणि थोडक्यात लिहिले आहे कि वाटले, शेवटी गीतेचा अर्थ समजावून घ्यायची माझी प्रबळ इच्छा देवाने माझ्या नकळत पूर्ण केली. त्याच दिवशी, नेहमीप्रमाणे आम्ही श्री गोंदवलेकर महाराजांच्या "प्रवचने" पुस्तकातील ३० ऑगस्ट च्या पानावरील प्रवचन वाचले आणि लक्षात आले, महाराजांनी सुद्धा त्या एका पानातच गीतेच्या तिन्ही योगांचे किती सुरेख विवरण केले आहे.....आणि तो ही  मराठी भाषेत !!! ह्या सर्व योगायोगीच्याच घटना म्हणायला काय हरकत आहे !!!

|| The Bhagavad-gita In A Nutshell ||

King inquired: Sanjaya, please tell me, in details, what did my people and the Pandavas do in the battlefield before the war started? (1.01)

Sanjaya said: O King, Lord Krishna spoke these words to Arjuna whose eyes were tearful and downcast, and who was overwhelmed with compassion and despair. (2.01)

Lord Krishna said: You grieve for those who are not worthy of grief, and yet speak words of wisdom. The wise grieves neither for the li
ving nor for the dead. (2.11)

Just as the soul acquires a childhood body, a youth body, and an old age body during this life; similarly, the soul acquires another body after death. This should not delude the wise. (2.13)

Just as a person puts on new garments after discarding the old ones; similarly, the living entity or the individual soul acquires new bodies after casting away the old bodies. (2.22)

Treating pleasure and pain, gain and loss, and victory and defeat alike, engage yourself in your duty. By doing your duty this way you will not incur sin. (2.38)

You have control over doing your respective duty only, but no control or claim over the results. The fruits of work should not be your motive, and you should never be inactive. (2.47)

A Karma-yogi or the selfless person becomes free from both vice and virtue in this life itself. Therefore, strive for selfless service. Working to the best of one’s abilities without becoming selfishly attached to the fruits of work is called Karma-yoga or Seva. (2.50)

Because the mind, when controlled by the roving senses, steals away the intellect as a storm takes away a boat on the sea from its destination ¾ the spiritual shore of peace and happiness. (2.67)

The forces of Nature do all works. But due to delusion of ignorance people assume themselves to be the doer. (3.27)

Thus, knowing the Self to be superior to the intellect, and controlling the mind by the intellect that is purified by spiritual practices, one must kill this mighty enemy, lust, O Arjuna. (3.43)

Whenever there is a decline of Dharma Righteousness) and a predominance of Adharma Unrighteousness), O Arjuna, then I manifest Myself. I appear from time to time for protecting the good, for transforming the wicked, and for establishing world order Dharma). (4.07-08)

I created the four divisions of human society based on aptitude and vocation. Though I am the author of this system of the division of labor, one should know that I do nothing directly and I am eternal. (4.13)

The one who sees inaction in action, and action in inaction, is a wise person. Such a person is a yogi and has accomplished everything. (4.18)

Spirit shall be realized by the one who considers everything as a manifestation or an act of the Spirit. (4.24)

Verily, there is no purifier in this world like the true knowledge of the Supreme Being. One discovers this knowledge within, naturally, in course of time when one's mind is cleansed of selfishness by Karma-yoga. (4.38)

But, true renunciation, O Arjuna, is difficult to attain without Karma-yoga. A sage equipped with Karma-yoga quickly attains Nirvana. (5.06)

One who does all work as an offering to God — abandoning selfish attachment to the results — remains untouched by Karmic reaction or sin as a lotus leaf never gets wet by water. (5.10)

Those who perceive Me in everything and behold everything in Me, are not separated from Me, and I am not separated from them. (6.30)

Four types of virtuous ones worship or seek Me, O Arjuna. They are: The distressed, the seeker of Self-knowledge, the seeker of wealth, and the enlightened one who has experienced the Supreme. (7.16)

After many births the enlightened one resorts to Me by realizing that everything is, indeed, My or Supreme Being’s) manifestation. Such a great soul is very rare. (7.19)

The ignorant ones — unable to understand My immutable, incomparable, incomprehensible, and transcendental form — assume that I, the Supreme Being, am formless and take forms or incarnate. (7.24)

Remembering whatever object one leaves the body at the end of life, one attains that object. Thought of whatever object prevails during one's lifetime, one remembers only that object at the end of life and achieves it. (8.06)

Therefore, always remember Me and do your duty. You shall certainly attain Me if your mind and intellect are ever focused on Me. (8.07)

I am easily attainable, O Arjuna, by that ever steadfast devotee who always thinks of Me and whose mind does not go elsewhere. (8.14)

I personally take care of both spiritual and material welfare of those ever-steadfast devotees who always remember and adore Me with single-minded contemplation. (9.22)

Whosoever offers Me a leaf, a flower, a fruit, or water with devotion; I accept and eat the offering of devotion by the pure-hearted. (9.26)

Engage your mind in always thinking of Me, be devoted to Me, worship Me, and bow down to Me. Thus uniting yourself with Me by setting Me as the supreme goal and the sole refuge, you shall certainly come to Me. (9.34)

I am the origin of all. Everything emanates from Me. The wise ones who understand this adore Me with love and devotion. (10.08)

The one who does all works for Me, and to whom I am the supreme goal; who is my devotee, who has no attachment, and is free from enmity towards any being; attains Me, O Arjuna. (11.55)

Therefore, focus your mind on Me, and let your intellect dwell upon Me alone through meditation and contemplation. Thereafter you shall certainly attain Me. (12.08)

The one who sees the same eternal Supreme Lord dwelling as Spirit equally within all mortal beings truly sees. (13.27)

The one who offers service to Me with love and unswerving devotion transcends three modes of material Nature, and becomes fit for Nirvana, or salvation. (14.26)

I am seated in the inner psyche of all beings. The memory, Self-knowledge, and the removal of doubts and wrong notions about God come from Me. I am verily that which is to be known by the study of all the Vedas. I am, indeed, the author as well as the student of the Vedas. (15.15)

Lust, anger, and greed are the three gates of hell leading to the downfall or bondage) of the individual. Therefore, one must learn to give up these three. (16.21)

Speech that is non-offensive, truthful, pleasant, beneficial, and is used for the regular study of scriptures is called the austerity of word. (17.15)

By devotion one truly understands what and who I am in essence. Having known Me in essence, one immediately merges with Me. (18.55)

The Supreme Lord — as the controller abiding in the inner psyche of all beings — causes them to work out their Karma like a puppet of Karma created by the free will) mounted on a machine. (18.61)

Set aside all meritorious deeds and religious rituals, and just surrender completely to My will with firm faith and loving devotion. I shall liberate you from all sins, the bonds of Karma. Do not grieve. (18.66)

The one who shall propagate this supreme secret philosophy or the transcendental knowledge of the Gita) amongst My devotees, shall be performing the highest devotional service to Me, and shall certainly come to Me. No other person shall do a more pleasing service to Me, and no one on the earth shall be more dear to Me. (18.68-69)

Wherever there will be both Krishna, the Lord of yoga, or Dharma in the form of the scriptures, and Arjuna with the weapons of duty and protection; there will be everlasting prosperity, victory, happiness, and morality. This is my conviction. (18.78)

"May the Lord bless all with Goodness, Prosperity, and Peace."




Monday 27 August 2012


विनोदी माणस


दुबईमध्ये, आमच्या बिल्डींगमध्ये आमच्याच वयाचे एक जोडप आमच्याच मजल्यावर राहत. एकदम खुशाल नवरा-बायको आहेत. बुवांनी तर आमचे मन पहिल्याच भेटीत जिंकून घेतलं. ते इतके विनोदी बोलतात कि , त्याचं बोलणं ऐकल्यानंतर आम्ही इतके हसतो कि आमचे गाल, तोंड सर्व काही दुखायला लागत. पहिल्याच भेटीत त्यांनी आम्हाला सांगितले, "दुबई में नये आये हो? अभी आप को हर वक्त गेस्ट को वेलकम करने के लिये तैयार रहना पडेगा. ऐसा हैं कि, इंडिया में दो चीजे करनी बहुत जरुरी हैं, एक- गंगा स्नान और दुसरी-दुबई कि ट्रीप. ये दो चीजे नही कि तो हम स्वर्ग में नही जा सकते ." दुसऱ्यांदा भेटले तेव्हा म्हणाले , "कैसा हैं आपका बैल और गाव ? आज कल बैल और गाव दोनो भी देखने को भी नही मिलते. " माझ्या नवऱ्याला ते काय विचारात आहेत हे पटकन कळाले नाहीं. पण नंतर लक्षात आले कि, त्यांना  पहिल्या भेटीत सांगितले होते कि आम्ही बेळगावचे म्हणून!! ते त्यांनी विनोदी भाषेत विचारले,  "कैसा हैं आपका बैल और गाव (बेळ - गाव)?"  नंतर आनंद नी त्यांना विचारले,"आपका खाना हुवा?" त्यावर त्यांचे उत्तर इतके हल्लीच्या परिस्थितीला अनुसरून होते कि त्यांच्या बुद्धीचे कौतुक करावे तितके कमी. ते म्हणाले, " पहिले के जमाने में घरमे पकाते थे और शौचालय के लिये बाहर जाते थे. आज कल, खाना बाहर खाते हैं और शौचालय के लिये घर आते हैं. आज कल घरमे कोई किधर पकाता हैं? " त्यांना म्हंटल, "आप आपके पत्नी के साथ कभी हमारे घर आइये." त्यावर त्याचं उत्तर ..."मीडल इस्ट में दो चीजोका कभी कोई भरवसा नही कर सकते. एक, इधरका हवामान और दुसरा, मेरे पत्नी का मूड. तो उसको आपके घर लेके आने का मैं कोई आश्वासन नही दे सकता." एक क्षण असे वाटले कि, ह्यांची भेट आपल्याला दररोज झाली तर काय मस्त मजा येईल. खरच "विनोदी स्वभाव " ही एक देवानी दिलेली देणगीच आहे. ती सर्वांच्या कडे नसते. खूप थोडया भाग्यशाली लोकांनाच हा वर देव देतो. असे लोक आपल्याला भेटतात हे सुद्धा आपले भाग्यच समजायला पाहिजे. नाहीतर, ह्या स्वार्थी दुनियेत जिथे माणूस वेड्यासारखा विषयामागे धावतो आहे तिथे त्याला दुसऱ्यांना हसवण्यास वेळ कुठे आहे?  

९) श्री आशापुरक गणेश, बीड-महाराष्ट्र : - (Shree Aashapurak Ganesh, Beed-Maharashtra.)
नंदक नावाच्या एका नगरात “ दुष्ट ” नावाचा मच्छिमार रहात होता. स्वतःच्या नावाप्रमाणेच त्याचा स्वभाव होता. गावातील सगळ्यांना त्रास देणं आणि त्यांच्याकडुन खंडणी वसुल करणं हे त्याचं दरदिवशीचं काम. शेवटि मग गावातील सगळ्या जणांनी एकत्रीत येऊन एकजुटिने त्याला गावाबाहेर हाकलुन दिलं. मग तो दुष्ट त्यानंतर दुसर्या गावात गेला आणि तिथे सुद्धा त्याने तीच वाईट कामे सुरु केली. एकदा तो जंगलात शिकारीला जात असताना चिखलाने भरलेल्या खड्यात पडला. म्हणुन अंगावरील चिखल साफ करण्यासाठि तो जवळच असेलल्या तलावात आंघोळीसाठि गेला. तेवढ्यातच जवळुनच जात असलेल्या मुद्गल ऋषिंवर त्याची द्रुष्टि पडली. मुद्गल ऋषि चालता चालता ॐ ॐ ॐ ॐ ॐ असा मंत्र जाप करत होते. मुद्गल ऋषिंना लुबाडण्याच्या हेतुने दुष्टाने त्यांच्यावर अस्त्र उचललं. पण त्याच क्षणी त्याच्या हातातील संपुर्ण शक्ती नाहिशी होउन हात सुन्न झाला. मग मुद्गल ऋषिंनी आपल्या मंत्र सहाय्याने त्याच्या अंगावरुन हात फिरवताच तो पुर्ववत झाला. दुष्टाला आपण केलेल्या कृतीबद्दल खुप वाईट वाटलं होतं. म्हणुन तो लगेचच मुद्गल ऋषिंच्या पायवर डोकं ठेऊन त्यांची माफि मागु लागला दयेची भिक मागु लागला.

मुद्गल ऋषिंनी मग त्याला एक सल्ला दिला. ते म्हणाले, तु काहि कमळाची फुले आणि दुर्वा गोळा करुन आण आणि श्री गणेशाची पुजाअर्चना सुरु कर त्यामुळे तु दोषमुक्त होशील. ऋषिंनी सांगितल्या प्रमाणे मग दुष्टाने फुले आणि दुर्वा गोळा करुन आणुन श्री गणेशाची पूजा करणं सुरु केलं. तो दिवस होता श्री गणेश चतुर्थी.

मग मुद्गल ऋषिंनी एक झाडाची सुकलेली फांदि त्याच्यासमोर ठेवली आणि दुष्टाला सांगितले कि, जो पर्यंत ह्या फांदिला पाने फुटत नाहित तो पर्यंत तु “ श्री गणेशाय नमः ” असा अखंड मंत्रजाप कर. असे सांगुन ऋषि तेथुन निघुन गेले.

मुद्गल ऋषिंच्या आज्ञेनुसार आणि आपल्या वरील सारे दोष नष्ट करण्याच्या हेतुने, तसेच श्री गणेशाची कृपाद्रुष्टि लाभावी ह्या आशेने मग दुष्टाने “ श्री गणेशाय नमः ”असा अखंड मंत्रजाप चालुच ठेवला. खुप दिवसांनंतर मुद्गल ऋषि परत त्या मार्गाने जात असताना त्यांना एक मातीचं वारुळ द्रुष्टिस पडलं आणि सोबतच त्यातुन मंत्रजापाचा आवाज देखिल ऐकु येत होता. आणि त्यांनी ठेवलेल्या सुक्या फांदिला पाने देखिल फुटलेली होती. ऋषिंनी मग हळुवारपणे त्या वारुळावरील वाळु बाजुला सारली आणि त्यांना द्रुष्टिस पडले कि दुष्ट श्री गणेशाच्या मंत्रजापात अगदि मंत्रमुग्ध होऊन गेला होता. मुद्गल ऋषिंनी मग आपल्या कमंडलुतील पवित्र पाणी त्यावर शिंपडुन त्याला जागं केलं. अखंड मंत्रजापानंतर दुष्टाच्या दोनहि भुवयांच्या मधुन एक सोंडेसारखा भाग आला होता. ते पाहुन मुद्गल ऋषिंनी दुष्टाचे नामकरण “ भृशुंडि ” असे केले.

भृशुंडिने मग तिथे श्री गणेशाच्या एका सुंदर मूर्तीची स्थापना केली. आणि आपण केलेल्या अखंड मंत्रजापानंतर श्री गणेशाची कृपाद्रुष्टि लाभुन आपली आशा पूर्ण झाली, म्हणुन त्या श्री गणेशाला त्याने नाव दिले, श्री आशापुरक गणेश.

महाराष्ट्रातील बीड पासुन साधारण १० किलोमीटर अंतरावर श्री आशापुरक गणेशाचे हे मंदिर आहे. मूर्तीचे रुप अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे. चतुर्भुज आणि डाव्या सोंडेची मूर्ती पाहुन गणेशभक्तांना आपली आशा पुर्ण झाल्याचा आनंद मिळतो.
।। ॐ गं गणपतये नमः ।। 

Sunday 26 August 2012


नड

श्री गोंदवलेकर महाराजांच्या "प्रवचने" या पुस्तकाच्या १९ ऑगस्टच्या पानावर त्यांनी, माणूस स्वताच्या सवयींचा / जरुरतींचा / सख्त नडीचा कसा गुलाम बनतो आणि हळू हळू त्याच्या नकळत त्या गोष्टीवर / विषयावर त्याचे कसे प्रेम बसते, हे फार छान समजावून दिले आहे. ते असे, .....


खरच  महाराजांनी सांगितल्या प्रमाणे, आपल्याला देवाची कधी नडच भासत नाहीं म्हणून आपल्याला देवाचे प्रेम लागत नाहीं. किती तथ्य आहे ह्या उपदेशात !! 

८) कळंबचा ‘चिंतामणी’ , यवतमाळ (Chintamani of Kalamb, Yavatmaal, Maharashtra): - 
यवतमाळहून २३ कि.मी. अंतरावरील असलेला हा कळंबचा ‘चिंतामणी’ . ह्या गणपतीच्या दर्शनासाठी गणेशोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. गणेशोत्सवात तर कळंबला महायात्रेचेच स्वरूप प्राप्त होतं. ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत येणाऱ्या भक्तांचा लोंढा आवरणे म्हणजे फारच कठीण काम आहे.

कदंब या वृक्षापासून कळंब, असे नाव पडल्याची या शहराची आख्यायिका आहे. कापूस व गणिताचा शोध ग्रत्समद ॠषींनी याच कळंबमध्ये लावल्याचे पौराणिक दाखले आहेत. कळंब म्हणजे १४ चावडय़ा आणि ३२ महालांचे गाव, असे आजही म्हटले जाते. यवतमाळचे कवी डॉ. गोपाल पाटील यांनी कळंबच्या चिंतामणीचे महात्म्य लिहिले आहे. त्यात अनेक पौरणिक दाखले दिले आहेत. कळंबचा ‘चिंतामणी’ जमिनीपासून ७० फूट खोल असलेल्या गाभाऱ्यात आहे. ३२ पायऱ्या उतरून ‘गणेशकुंड’चे दर्शन घेऊनच मग चिंतामणीचे दर्शन घडते. हेमाडपंथी मंदिराची आठवण करून देणाऱ्या चिंतामणी मंदिराची रचना फार प्राचीन काळाची आहे. दर १२ वर्षांनी ‘गणेशकुंड’मध्ये गंगावतरण होते व गंगेचे पाणी ‘चिंतामणी’चा पादस्पर्श करते, अशीही एक आख्यायिका आहे. ।। ॐ गं गणपतये नमः ।।


सवय

एकदा एक माणूस कोकिळेला म्हणाला - तू इतकी काळी नसतीस तर किती बर झाल असतं. समुद्राला म्हणाला तुझ पाणी खारट नसते तर किती बर झाल असतं. गुलाबाला म्हणाला तुला काटे नसते तर किती बर झाल असतं. तेव्हा ते तिघे एकदम म्हणाले , "अरे माणसा, तुझ्याकडे दुसऱ्याच खुसपट काढण्याची सवय नसती तर किती बर झाल असतं."

खरच, दुसऱ्याचे दोष काढण्याचे जर माणसाने बंद केले तर, आपल्या जीवनातील सर्वच कठीण प्रसंग आपल्याला टाळता येतील आणि प्रत्येकाचे जीवन कसे एकदम सुखमय आणि आनंदी होईल. अर्थात, अध्यात्मात हेच तर सांगितले आहे कि, "साधनेत तुम्हाला खरीच जर प्रगती करावयाची आहे तर, परनिंदा, परधन आणि परस्त्री यांचा सर्व प्रथम त्याग करा." 

७) श्री नवश्या गणपती, आनंदवल्ली, नाशिक. (Shree Navashya Ganapati, Aanandvalli, Nashik):-
श्री नवश्या गणपती मंदिर हे नाशिकमधिल आनंदवल्ली येथे गाणगापुर-सोमेश्वर मार्गावर आहे. ह्या मंदिराचा इतिहास सुमारे ३०० ते ४०० वर्षांचा आहे. पेशवे काळामध्ये हे मंदिर बांधले गेले असुन अत्यंत जागृत असे हे देवस्थान आहे. श्री नवश्या गणपती हा नवसाला  पावतो असा अनुभव येथील हजारो भाविकांना आलेला आहे.

इ.स. १७७४ मध्ये फाल्गुन महिन्यात श्री राघोबा दादा आणि त्यांची पत्नी आनंदिबाई ह्यांनी ह्या मंदिराची स्थापना केली होती. आनंदवल्ली हे गाव श्रीमंत माधवराव पेशवे यांचे आजोळ. त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई श्री नवश्या गणपतीच्या निस्सिम भक्त होत्या. राघोबा दादा आणि आनंदिबाई ह्यांना १५ ऑगस्ट १७६४ रोजी मुलगा झाला त्याचे नाव विनायक असे ठेवण्यात आले. मुलाच्या जन्मप्रित्यर्थ ह्या गावाचे पुर्वीचे नाव बदलुन आनंदवल्ली असे ठेवण्यात आले. त्याच दरम्यान श्री नवश्या गणपती मंदिराची पण उभारणी करण्यात आली.

गोदावरी नदिच्या तिरावर असलेले हे मंदिर पुर्वाभिमुख असुन मंदिरात प्रसन्न अशी श्री गणरायाची मूर्ती आहे. मूर्तीचे डोळे अतिशय सजिव भासत असुन मूर्तीदेखिल अतिशय आकर्षक आहे. डाव्या सोंडेच्या गणरायाच्या एका हातात पाश, दुसऱ्या हातात फुल, तिसऱ्या हातात मोदक आणि एक हात सतत भक्तांना आशिर्वादाचा प्रसाद देत असतो. प्रत्येक हातात एक कडं असुन डोक्यावर मुकुट आहे. अशी हि आकर्षक मूर्ती, जिच्यावरुन भक्तांची नजरच हटत नाहि.

राघोबा दादांनी आनंदवल्लीत एक मोठा राजवाडा देखिल बांधला होता. ह्या राजवाड्याच्या पश्चिमेस (पाठिमागे) उभे राहिल्यास श्री नवश्या गणपतीचे दर्शन होत असे. सन १८१८ साली इंग्रजांनी पेशवाई बुडवली आणि राजवाडादेखिल जाळला. मात्र परिसरातील मंदिरे शाबुत राहिली. श्री नवश्या गणपती मंदिर हे पेशव्यांच्या कारकिर्दिची साक्ष देत आजहि दिमाखाने उभे आहे. ।। ॐ गं गणपतये नमः ।।

प्राजक्ताची फुलें

प्राजक्ताची नाजुक फूलं 
काही क्षणासाठीच फुलतात
हक्काची डहाळी सोडून
इतरांच्या अंगणी पडतात... 

वाचल्यावर वाटल, आम्हा स्त्रियांचं जीवनही असंच असते का ? वयाच्या २५ वर्षापर्यंत आई-वडिलांच्या मायेच्या उबेखाली वाढायचं आणि एक दिवशी अचानक आपल म्हणून जे जे काही आहे ते सर्व सोडून ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा लपवून दुसऱ्याच्या घरात पदार्पण करायचं आणि अगदी त्याच दिवसापासून , जे जे काही नवीन असतं त्याला आपलंस करून बायको, मैत्रीण, सून, भावजय, नणंद, आई...अशा अनेक प्रकारच्या भूमिका सफाईत पणे हसत खेळत निभावून न्यायच्या. मनात फक्त एकाच गोष्टीचा ध्यास...तो म्हणजे, मी सर्वाना सदैव सुखी ठेवले पाहिजे. 

६) लक्षविनायक, औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत (Lakshya Vinayak, Aurangabad, India) :-
तारकासुर नावाचा राक्षस देवतांना आणि ऋषिमुनींना सतत त्रास देत होता. त्यांच्या प्रत्येक शुभ कार्यामध्ये विघ्न आणत होता. त्यामुळे ऋषिमुनींचे तप आणि यज्ञासारखी शुभ कामे कधीहि पूर्ण होत नसत. त्यावेळेस नारदमुनी कार्तिकेय कडे आले. नारदमुनींनी तारकासुराचा चाललेला सर्व अघोरी प्रकार कार्तिकेयना कथन केला. नारदमुनींनी सांगितलेला सर्व प्रकार ऐकुन रागाने लालबुंद झालेले कार्तिकेय आपले आई-वडिल शिव-पार्वती यांच्याकडे येऊन त्यांचा आशिर्वाद घेतला आणि लगेचच तारकासुराचा वध करण्यासाठि प्रस्थान केले. परंतु कार्तिकेयनी सोडलेल्या कुठल्याहि अस्त्राचा तारकासुर राक्षसावर काहिहि परिणाम होत नव्हता. प्रत्येक अस्त्र निष्फळ ठरत होतं. त्यामुळे नाराज होउन कार्तिकेय परत आले. राक्षसाला वध करुन संपवण्यात अपयश आल्यामुळे कार्तिकेय आपले पिता भगवान शंकरांकडे त्यांचे मार्गदर्शन घेण्यास आले. भगवान शंकरांनी तेव्हा त्याला त्याची एक छोटिशी चुक सांगितली कि, बाळा कार्तिकेय युद्धभुमीवर जाण्याअगोदर तु ॐ कार गणेशाची प्रार्थना केली नाहिस. तेव्हा तु आता पवित्र अश्या घृष्णेश्वर येथे जाऊन ॐ कार गणेशाचा मंत्रजाप कर, त्याची पूजा कर. आणि मग बघ.

कार्तिकेय म्हणजेच बाळ स्कंद खुप खुष झाला आणि पित्याच्या आज्ञेनुसार त्वरीतच घृष्णेश्वरला जाऊन त्याने तब्बल एक लक्ष (एक लाख) वेळा ॐ कार गणेशाचा मंत्र जपला. श्री गणेश प्रसन्न होऊन लगेचच कार्तिकेयच्या समोर अवतरीत झाले. श्री गणेशाने मग कार्तिकेय जवळ असलेल्या बाणाला पवित्र स्पर्श केला. तसेच कार्तिकेयसाठि वाहन स्वरुपात मोर सुद्धा भेट म्हणुन दिला. कार्तिकेय लगेच मोरावर बसुन तारकासुराचा वध करण्यास निघाला. श्री गणेशाने स्पर्श केलेला बाण कार्तिकेयने तारकासुरावर सोडला आणि त्यातच तारकासुर मारला गेला. तारकासुराच्या वधामुळे सर्व देवतांमध्ये आणि ऋषिमुनींमध्ये प्रसन्नता पसरली. सारेजण तारकासुराच्या त्रासातुन मुक्त झाले होते. ॐ काररुपी श्री गणेश हे एक लक्ष जपनाम केल्यामुळे प्रसन्न झाले होते. म्हणुन श्री गणेशाला लक्षविनायक असेहि नाव पडले. औरंगाबाद, महाराष्ट्र येथे स्थित असलेल्या स्वयंभु श्री लक्षविनायकाची शेंदुर लेपित मूर्ती डाव्या सोंडेची असुन चार हात आणि अर्धमांडि घालुन बसलेली अशी आहे. अतिशय प्रसन्न वाटणारी श्री लक्षविनायकाची मूर्ती अखंड जप करणार्या सर्व भक्तांचे कल्याण करते. ।। ॐ गं गणपतये नमः ।।

Saturday 25 August 2012


अवसरवादी दुनिया 

दोन दिवसापूर्वी, आमच्या घरी कामाला येणारा मुलगा ठरल्या वेळेपेक्षा उशिरा आला. जेव्हा आला , माझ्या लक्षात आले कि त्याचा चेहरा एकदम कोमेजून गेला आहे. चिंतीत चेहऱ्याने मी त्याला ह्याचे कारण विचारले. त्याने सांगितले कि, एका साहेबाने त्याला त्याच दिवशी सकाळी २५० Dhs  दिले होते आणि ते तो कुठेतरी हरवून आला होता. सगळीकडे शोधल्यावर सुद्धा त्याला ते मिळाले नाहीत. नेहमी, कचऱ्याची पिशवी अगदी दोनच बोटात पकडून नेण्याऱ्या त्या मुलाने त्या दिवशी संपूर्ण कचऱ्याचा डब्बा पूर्णपणे पालथा पडून हाथ घालून २-३ वेळेला उचकून बघितला होता. हताश झालेला माणूस काहीही करण्यास करायला तयार होतो, ह्याचे हे ज्वलंत उदाहरण. देव करो आणि अशी परिस्थिती आपल्या शत्रूवर सुद्धा येवू नये. त्यात त्याला ते पैसे त्याच्या आईला पाठवून द्यायचे होते. ऐकून वाईट वाटले. हल्ली हल्लीच आध्यत्मिक वाचन सुरु केल्यामुळे, त्या त्रोटक्या अभ्यासाच्या आधारावर त्याला एक छानसा उपदेश केला. खर म्हणजे त्याला त्या उपदेशाची जरा सुद्धा आवश्यकता नव्हती. त्याला म्हटलं, "अरे, ते पैसे तुझे नव्हते म्हणून समज. आणि, असं समज कि, देवाच्या कृपेने पुढे होणारी मोठी बला छोट्यावर वर निभावून गेली." किती सहजपणे सगळ सांगितलं मी त्याला. हे ऐकल्यावर त्याच्या चेहऱ्यावर एक गुढतेच हास्य होतं. खरच ते पैसे हरवल्यानंतर झालेल्या दुख्खाची मला कशी कल्पना असणार. त्याच्या दुख्खाची आपण चेष्टा तर केली नाहीं ना? असे वाटून मन हुरहुरले. 

दुसऱ्या क्षणी असे वाटले कि, त्याला आपण २५० Dhs देवून टाकावेत. पण दुसऱ्या क्षणी वाटले, तो खर तेच सांगत असेल ह्याची काय खात्री? मी जेव्हा business करत होते, तेव्हा एक-दोघांनी मला असेच काही तरी सांगून फसवले होते. त्या चांगल्या कर्माच्या मोबदल्यात मिळालेल्या वेदनेची आठवण अजूनही ताजी आहे. काय मज्जा आहे बघा, जुन्या आठवणींची आपल्या मनावर किती  जबरदस्त पक्कड असते !! पण मग, ह्या वेळेस जर माझ्या मनाने चांगले काम करण्यापासून माझे जर हाथ आखडले, तर ह्यात चूक कोणाची...माझी का मल्या आलेल्या वाईट अनुभवांची का बदलत चाललेल्या अवसरवादी दुनियेची ? 

५) ढुंढिराज गणेश - उत्तरप्रदेश, भारत : - (DHUNDHIRAJ GANESH – Uttar Pradesh, India)
भस्मासुर नावाच्या राक्षसाला भगवान शंकरांनी वर स्वरुपात एक अशी शक्ति प्रदान केली कि, त्याने कोणाच्याहि डोक्यावर स्पर्श केला तर ती व्यक्ती भस्मसात होईल. अशी शक्ति प्रदान झाल्यानंतर भस्मासुर स्वतःला खुप शक्तिशाली आणि अजिंक्य समजु लागला होता. मिळालेल्या शक्तिचा तो दुरुपयोग करु लागला. येणार्या जाणार्या सर्व निरपराध आणि साध्या माणसांच्या विनाकारण डोक्यावर हात ठेवुन त्यांना भस्मसात करु लागला. शेवटि भगवान विष्णुंनी त्याचा वध केला.

परंतु नंतर भस्मासुराचा मुलगा दुरासद, ह्यने सुद्धा आपल्या पित्याप्रमाणे खुप मोठि अखंड तपश्चर्या करुन भगवान शंकरांना प्रसन्न करुन घेतले. आणि त्याच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला दर्शन दिले. दुरासदाने मग भगवान शंकारांकडे वरदान स्वरुपात त्रिलोकात अधिकार प्राप्त होण्याचा वर मागुन घेतला. सोबतच त्याने अमरत्व देखिल मागुन घेतले.

ऋषिवर्य नारदमुनींनी त्याला संपवण्यासाठि म्हणुन त्याला खोडसाळ पणे असं सांगितलं कि, दुरासदा तु जरी स्वतःला त्रिलोकाचा राजा समजत असलास तरीहि तुला काशी वर अधिकार कधिहि गाजवता येणार नाहि. कारण काशी मध्ये साक्षात भगवान शंकरांचा वास आहे. तिथे तुला अधिकार गाजवता येणार नाहि. याचाच अर्थ कि तु त्रिलोकाचा राजा कधिहि होऊच शकत नाहिस. बघ आता तुच काय ते ỊỊỊỊ असं सांगुन नारदमुनी अदृश्य झाले. नारदमुनींनी सांगितलेले ऐकुन दुरासदाला रहावलं नाहि आणि सरळ त्याने काशीकडे प्रस्थान करुन काशी वर अधिकार मिळवण्यासाठि चढाई केली. हे पाहुन भयभीत नारदमुनी लगेचच देवी पार्वतीकडे जाउन सर्व घटना कथन केली. आणि असाहि सल्ला दिला कि देवी पार्वतीने लगेचच एका अश्या शक्तिशाली बालकाला निर्माण करावे कि जो दुरासदाचा वध करेल. आणि त्यासाठि देवी पार्वतीने लगेचच ।। ॐ ।। मंत्राचा जप करुन एका बालकाला निर्माण केले. ह्या बालकाला चार हात आणि सोंड होती. तोच श्री गणेश. देवी पार्वतीने मग श्री गणेशाला लगेच आज्ञा केली कि त्याने त्वरीत काशीला जाऊन दुरासद राक्षसाचा वध करावा.

श्री गणेश मग ताबडतोब आपल्या आईने दिलेल्या आज्ञेचे पालन करण्यासाठि सिंहावर बसुन काशीस रवाना झाले. भगवान श्री गणेशाने दुरासद राक्षसाला शोधुन काढले आणि त्यावर चढाई केली. दुरासदाला अमरत्वाचे वरदान होतं म्हणुन त्याला जमिनीत गाडुन टाकले आणि त्याच्याकडुन होत असणारा संहार थांबवला. आणि अश्याप्रकारे श्री गणेशाने दुरासद राक्षसापासुन काशीचे रक्षण केले आणि अंतर्धान झाले. भगवान शंकरांनी मग तिथेच श्री गणेशाची एक स्वयंभु मूर्ती निर्माण करुन त्याला "ढुंढिराज गणेश" असे नामकरण केले.
।। ॐ गं गणपतये नमः ।।

घंटा...


आपण कधीही मंदिरात प्रवेश केल्यावर प्रथम घंटा वाजवतो. यामागे शास्त्र आहे. घंटा वाजवून आपण देवाचं आपल्याकडे लक्ष तर वेधून घेतोच, पण घंटा वाजवल्यामुळे वातावरणात सकारात्मक कंपनं निर्माण होतात. या कंपनांचा आपल्या शरीरावरही सकारात्मक परिणाम होतो. घंटेच्या आवाजामुळे आपल्या आसपासच्या नकारात्मक शक्ती दुर्बल होऊन नष्ट होतात. आपली एकाग्रता वाढवतात.

मंदिरात घंटा वाजवून आपण आपल्यालाच भानावर आणत असतो. घंटानाद केल्यामुळे आपल्या मनात चालू असलेल्या इतर विचारांना विराम मिळतो आणि इतर विचार थांबतात. समोरील देवाच्या मूर्तीवर आपण चित्त एकाग्र करू शकतो. ज्या मंदिरात घंटानाद सतत चालू राहातो, ते देवस्थान जागृत देवस्थान बनते. कारण येथील देव घंटानादामुळे सतत जागा राहातो.

प्राचीन काळापासून घंटा वाजवण्याची पद्धत रुढ आहे. घरातही देवांची पूजा करताना आपण घंटानाद करतो. पूजेमध्येही घंटेला विशेष स्थान असतं. घंटा वाजवल्याने पापक्षालन होत अशल्याचं पुराणांमध्ये सांगितलं आहे. घंटा वाजवल्या जो ध्वनी येतो, तो ऊँकाराच्या नादाशी साधर्म्य साधणारा आहे. सृष्टी निर्माण होताना हाच नाद घुमला होता. त्याच ध्वनीचं घंटानाद हा रुपक मानलं जातं. (सौजन्य - आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात)  

श्री शमी विघ्नेश, नागपुर : - (Shree Shami Vighnesh, Nagpur) : -
एके दिवशी इंद्र देवाने ब्रह्मादेवांना विनंती केली ती एका सुंदर स्त्रीची निर्मिती करण्यासाठि. इंद्रदेवाच्या विनंतीवरुन ब्रह्मदेवांनी आपल्या मंत्रसहाय्याने एका सुंदर स्त्रीची निर्मिती केली आणि तीचे नाव तिलोत्तमा असे ठेवले. तिलोत्तमा हि दिसायला अतिशय सुंदर, गोरी पान आणि निळ्या डोळ्यांची होती. तिला पाहताच इंद्रदेवाला तिच्याविषयी अतिशय आकर्षण वाटु लागले. तिला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला. आणि त्यातुनच इंद्रदेवाची संपुर्ण शक्ती हि तीन भागांमध्ये विभागली जाऊन त्यापासुन तीन राक्षस निर्माण झाले- महापाप, संकट आणि शत्रु. ह्या तीनहि राक्षसांनी मग भगवान शंकराची उपासना करुन, त्यांना प्रसन्न करुन आशिर्वाद स्वरुपात अनुक्रमे स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोकात अधिकार मिळवला. भगवान शंकरांकडुन शक्ती प्राप्त होताच तीनहि राक्षसांनी सर्वत्र धुमाकुळ माजवला, तीनहि लोकांमध्ये त्यांनी लोकांना त्रास देणं सुरु केलं. त्यांच्या त्रासापासुन वाचण्यासाठि लोकांनी मग मुद्गल ऋषिंच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेशाची उपासना सुरु केली. त्याअगोदर मुद्गल ऋषिंच्या विनंतीवरुन भगवान शंकर आणि माता पार्वती ह्यांनी एकत्रीत पणे शमी वृक्षाचे रुप धारण केले. मग मुद्गल ऋषिंनी सर्व लोकांना पाचारण करुन शमी वृक्षाखाली बसुन श्री गणेशाची उपासना सुरु करण्यास सांगितले. श्री गणेशाचा अखंड मंत्रजप आणि प्रार्थना ऐकुन भगवान श्री गणेश प्रसन्न होऊन तिथे अवतरीत झाले. श्री गणेशाने मग त्या तीन राक्षसांचा वध केला आणि शमी वृक्षात सामावुन गेले. संकट आणि विघ्न यातुन सुटका झालेले सर्व भक्तगण मग “जय श्री शमी विघ्नेश” असा जयघोष करु लागले. त्यानंतर तेथे प्रकट झालेल्या श्री मूर्तीचे नामकरण सुद्धा श्री शमी विघ्नेश असेच करण्यात आले. श्री शमी विघ्नेशाची मूर्ती पाषाणी असुन भव्य - दिव्य आणि उजव्या सोंडेची आहे. मूर्ती अतिशय सुंदर असुन भक्तांचे संकट हरणारी अशी आहे. ।। ॐ गं गणपतये नमः ।।

Tuesday 21 August 2012

मुक्तविहार



गेल्या दोन-तीन वर्षात आमच्या जवळच्या आणि दूरच्या कुटुंबात बऱ्याच जणांना पुत्र लाभाचा आशीर्वाद मिळाला. इतकी पुत्र रत्न झाली कि माझी मोठी लेक मजेत सर्वाना म्हणायची, "चला तर, आपण आपली एक IPL टीम तयार करूया आता." सर्व जण एकदम खुशीत आहेत. आपापली मुलं जस जशी मोठी होत आहेत तसं तसे आईबाप त्यांचे फोटो एकतर फेसबुकवर अपलोड करतात नाहीतर वेळ मिळाल्यास आपल्या जवळच्या लोकांना email  ने पाठवतात. त्यांच्या मुलांची होणारी बौद्धिक आणि शारीरिक वाढ पाहून खूप आनंद होतो. ह्या सर्व मुलांचे ते निरागस हास्याचे फोटो पाहून नेहमीच समाधान वाटते. बरेच वेळा आम्ही ह्यावर चर्चा सुद्धा करतो. मनाला, त्या मुलांच्या निरागस हसण्याचा, कित्येकदा हेवा सुद्धा वाटतो. वाटते, का आपल्याला सुद्धा मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे सदैव आनंदतात राहता येत नाहीं. ह्या विचाराबरोबरच असेही लक्षात आले, 'सत्चिदानंद' अवस्तेत असलेली ही लहानपणातली (३-४ वर्षापर्यंत ) मुले मोठी झाल्यावर स्वतःचा हा भोळे-भाबडेपणा , निरागस मन, सदैव आनंदी राहण्याची वृत्ती ....कुठे हरवून बसतात? कुठली जादूची काठी त्यांच्यात हा बदल घडवून आणते? कोणाला म्हणून ह्या त्यांचातल्या बदलावाला जवाबदार ठरवायचे? ह्यावर विचार करत असतांना, परवा एक सुरेख लेख माझ्या वाचनात आला. लगेच वाटले, अरेच्च्या, आपल्या सारखे बरेच जण विचार करतात. पर्यंतू, हा 'बदलाव घडवून न आणण्यासाठी' आपण काहीच करू शकत नाहीं , ह्याची मनाला हुरहूर लागून राहिली आहे. इतकेच नव्हे तर, आपण सुद्धा अशा प्रकारच्या 'सत्चिदानंद' अवस्थेत,  प्रयन्त करूनसुद्धा फार वेळ  राहू शकत नाहीं ह्या गोष्टीची मनाला खंत वाटते आहे. वाचलेला लेख खालील प्रमाणे :-

कुठून येतं ते हास्य ... काय असेल त्या पाठीमागच रहस्य ??

डोक्यावर ओझं .... अंगावर फाटके कपडे .... पण चेहऱ्यावर अगदी मनसोक्त अन दिलखुलास हास्य ...
कुठून येतं ते हास्य ... काय असेल त्या पाठीमागच रहस्य ??

साधं-सरळ उत्तर .... हे हास्य त्यांच्या लहानपणाच ... त्यांच्या निरागसतेच ...
अन त्यांच्या अज्ञानाच .... हो हो अज्ञानाच !!!...

नंतर त्यांच्या वाट्याला शिक्षण येत ... आणि जसं जसं ते शिकायला लागतात ते निरागसत्व हरवत जातात ...
त्यांना शिकवणारे कोण ?? तर आपणंच ...

दुसऱ्याच ओझं वाहण म्हणजे 'चूक' ... आपला पहिला धडा ...
चारित्र्य अन विचारांची दिशा जरी फाटकी असली तरी चालेल पण 'सभ्य' समाजात जगायचं असेल तर कपडे फाटके नकोत ...
आपल्याला काय वाटतं हे महत्वाच नाही ... 'समाज' काय मान्य करतो हे जास्त महत्वाच ...
अन ह्या आपल्या शिकवण्याला आपण 'व्यवहारज्ञान' म्हणायचं ???

मार्क्स, टक्केवारी, नंबर यांच्या शर्यतीत त्यांना उगीच धावायला लावून, आकलन शक्ती, नवीन गोष्टी जाणून घेण्यातल कुतूहल, प्रयोगशीलता असल्या गुणांकडे थेट दुर्लक्ष्य करायचं ...

शिक्षणात नवीन पंख फुटलेल्या पक्ष्यांना विश्वासाची अन स्वप्नांची पंख देण्याची ताकद असावी ...
त्या मुक्त प्राण्यांना मुक्तच राहू द्यावं ... मुक्तविहार करणारे पक्षीच गगनभरारी घेऊ शकतात !!!

आपल्या पोकळ विचारांच्या जाळ्यात त्या निरागस जीवांना कोंडून ठेवण्यात काहीच अर्थ नाही ....
कारण पिंजऱ्यात कोंडून ठेवलेले प्राणीच पुढे जास्त आक्रमक होतात !!!!


किती छान लिहिले आहे यात !! ह्याचा सरळ अर्थ मग असा होतो काय....कि ह्या इवल्या इवल्या गोंडस बाळांच बालपण हरवण्यास आपणंच कारणीभूत आहोत काय?!!!

३) जागृत गणपती - गणेशगुळेचा गणपती : -
 (Ganeshgule Ganapati, Ratnagiri, Maharashtra)
रत्नागिरी जिल्ह्यात गणेशगुळे गावापासून केवळ एकच किलोमीटर अंतरावर एका उंच डोंगरावर गणपतीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर पांडवांनी बांधले असल्याचे सांगितले जाते. पावसपासून हे गाव जेमतेम चार किमी अंतरावर आहे. पूर्वी या मंदिराच्या गाभा-यात गणपती होता. मात्र नंतर तो गणपती मंदिर सोडून गणपतीपुळे येथे गेल्याची आख्यायिका आहे. सध्या या गाभाऱ्याच्या दरवाजाला आतून शिळा आहे. त्यामुळे गाभा-यात प्रवेश करता येत नाही. दरवाजा पूर्ण बंद असल्यामुळे आत काय आहे, हे समजू शकत नाही. दरवाजापेक्षा मोठी शिळा गाभाऱ्यात कशी गेली, याचे आश्चर्य भाविकांना सुद्धा वाटते. त्यामुळे गणेशाच्याच मर्जीमुळे ती शिळा आत गेल्याचे मानून भाविक शिळेपुढेच नतमस्तक होतात. गणपती नसला तरीही त्याच्या स्पर्शाने पावन झालेली ही शिळादेखील नवसाला पावते, असे मानले जाते. येथे दरवर्षी माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. गावातून पालखी काढली जाते. वेगवेगळे मंनेरंजनाचे कार्यक्रम देखील गणेशोत्सवा दरम्यान सादर होतात. मंदिरालगत एक विहीर आहे. आणि ती विहीर कधीच आटत नाही किंवा पावसाळ्यात विहिरीतील पाण्याची पातळी वाढत सुद्धा नाही.
।। ॐ गं गणपतये नमः ।।

Monday 20 August 2012


 First impression 

लहानपणी शाळेत असताना, वर्गात शिक्षक नेहमी सांगायचे, "अरे, मुलानो, केव्हाही लक्षात ठेवा, नवीन वर्गात गेला कि पहिला पेपर / परीक्षा उत्तम प्रकारे लिहा आणि चांगले मार्क्स मिळावा कारण 'First impression is the Last impression'." बागडत  बागडत अभ्यास करण्याच्या त्या दिवसात, ह्याचे महत्व फारसे कधी कळलेच नाहीं. एवढेच काय, वयाच्या ४५ वर्षापर्यंत सुद्धा हे असे का म्हणतात, हे आककले नव्हते. ह्यासाठी संदर्भ असा ...लहानपणी आणि अगदी लग्न झाल्यानंतर सुद्धा बरेच वर्षे , मी स्वभावाने रागीट, कडक, लहरी, शिस्त प्रेमी, वचक दाखवणारी, धारदार जिभेची वगैरे वगैरे अशी होते. (खरे म्हणजे बालपणी आई-वडिलांनी आणि लग्नानंतर नवऱ्याने केलेल्या लाडामुळे मी एक बिघडलेली मुलगी / बायको होते.) मनातून जरी प्रेमळ आणि मऊ असले तरी , लोकांना आठवणीत फक्त माझा राठ स्वभावाच जास्त लक्षात राहावयाचा. आयुष्यात नंतर, बऱ्याच घडामोडीनंतर आणि देवाच्या कृपेने आणि नवऱ्याच्या सत्संगतीत राहून , उशिरा  का होईना , माझ्या स्वभावात बदल घडून आला. नवीन पीढीच्या माझ्या लेकीनी आणि जुने संस्कार जोपासलेल्या माझ्या आईने, मला हा बदल घडवून आणण्यात मदत केली हे मी कसे विसरू शकेन. मला भेटलेले सर्व जण माझ्यात झालेल्या ह्या बदलाची मला जाणीव सुद्धा करून देतात. पण गम्मत अशी आहे कि, अजूनही माझ्या दोन मुलींपैकी जर कोणी रागारागाने त्रागा करून घेतला तर झटदिशी म्हणतात , "अगदी आईसारखी रागीट आहे !!"..... 'First impression is Last impression', ह्याचा अर्थ आत्ता कुठे माझ्या लक्षात येतो आहे !!!    

दुसरे जागृत गणपतीचे स्थान : 

2) रणथम्भोर दुर्ग मधील श्री गणेश, राजस्थान : - (Shree Ganesh from Ranthambhore Fort, Rajasthan) 

रणथम्भोर, राजस्थान मधील रणथम्भोर किल्यावरील असलेलं हे श्री गणेशाचं सुंदर रुप. ह्या श्री गणेशाचे विशेष म्हणजे हे त्रिनेत्र गणेश आहेत. रणथम्भोर परिसरातील जन मानसात ह्या श्री गणेशाची प्रचिती अगदि खुप. ती अशी कि, घरात कुणाचं लग्न असो अथवा कुठलाहि महत्वाचा सण जसं होळी, दिवाळी. ह्या महत्वाच्या प्रसंगी सर्व प्रथम रणथम्भोर किल्यामधील श्री गणेशाला आमंत्रण दिलं जातं. आमंत्रण प्रत्यक्ष जाऊन किंवा पत्राने आमंत्रण दिलं जातं. काहि भक्तगण आपली सुखःदुखे सुद्धा ह्या श्री गणेशाला पत्राने कळवतात. आणि भक्ताने पाठवलेली सर्व पत्रे ह्या मंदिरात अगदि आवर्जुन पोहचवली जातात. त्यातुनहि महत्वाची गोष्ट म्हणजे, गणपती मंदिरात आलेली भक्तांची सर्व पत्रे मंदिरातील पुजारी श्री गणरायाला ऐकवुन दाखवतात. भक्तगणांच्या प्रत्येक पत्रामधील शब्दन् शब्द श्री गणरायापर्यंत पोहचतो. श्री गणरायाच्या दरबारात होणारी अशी हि एकमेव सेवा असावी कदाचीत. पत्र पाठवण्यासाठि पत्तासुद्धा अगदि सोपा आहे. “श्री गणेशजी महाराज, पोस्ट – रणथम्भोर” . केवळ एवढ्याश्या पत्त्यावर पत्र पोहचतं सुद्धा आणि आपला संदेश श्री गणरायाच्या कानावर जातो सुद्धा. मग काय तुम्हि कधी पाठवणार पत्र श्री गणराया साठि................. ।। ॐ गं गणपतये नमः ।।

कटू सत्य 

इंसान भी क्या चीज हैं !
दौलत कमाने के लिये सेहत खो देता हैं,
सेहत को वापस पाने के लिये दौलत खो देता हैं, 
जीता ऐसा हैं, जैसे कभी मरेगा ही नहीं और मर ऐसे जाता हैं, जैसे कभी जिया ही नहीं !!

खरोखर किती गूढ अर्थ आहे ह्या कटू सत्यतेत !! आपल्याला सगळ कळत पण वळत काहीच नाहीं. असल्या सगळ्या सुविचारांना, आपण अगदी बेमालून पणे होकारार्थी मान  डोलावतो आणि नंतर "ये रे माझ्या मागल्या" ह्याला शोभेल असे वर्तवणूक करून पुन्हा आपल्याच नशेत मग्न होवून ह्या बेजवाबदार अशा स्पर्धात्मक आणि धावपळीच्या आयुष्यात मन गुंतवून "आम्ही एकदम मजेत आहोत बघा" असे नाटकी हसू चेहऱ्यावर आणून पावूल पुढे टाकण्याचा उगीचच प्रयन्त करतो. 


श्रावण महिना संपताच सर्व श्री गणेश भक्तांना वेध लागतात ते लाडक्या श्री गणेशाचे आगमन होण्याचे. परंतु ह्या वर्षी अधिक भाद्रपद महिना असल्यामुळे अजुन तरी आपल्याला वाट बघावी लागणार आहे. आणि त्यासाठिच प्रत्येकाला निज भाद्रपद सुरु होईपर्यंत दर दिवशी किमान एका जागृत गणपतीचे दर्शन घडवण्याचं वचन देऊन आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात घेऊन जाणार आहे. तेथील श्री भृशुंड गणेश आणि त्याबद्दलची उपलब्ध सविस्तर माहिती आपल्या साठि घेऊन आलो आहे. चला तर मग. (सौजन्य :श्री सिद्धीविनायक गणपती, मुंबई ) 

BHRUSHUND GANESH , Bhandara -Maharashtra. 

भृशुंड गणेश : -  भंडा-याचा भृशुंड गणेश हा तेथील प्रतिमेच्या प्राचिनतेमुळे तसेच भव्यतेमुळे ग्रामवासी जनतेचे श्रध्दा स्थान आहे. भृशुंड गणेश मूर्तीत जणू ऋषींचा भास होतो. अखंड रक्ताश्म शीळेवर कोरलेली ही मूर्ती गाभा-यात तळापासून आठ फूट उंच व चार फूट रूंद आहे. पूर्ण सिंदूर चर्चित मूर्ती चतुर्भूज असून मूशकारूढ आहे. उजवा पाय खाली सोडलेला व डाव्या पायाची मांडी घातलेली मूर्ती आहे. चारही हातांमध्ये पाश, अंकूश, मोदक असून उजवा वरद हस्त आहे. शिरोभागी पंचमुखी शेषफणा आहे. मुखमंडळाचे जागी नाकपुडया, डोळे, मिशा व दाढी दिसत असून चेहरा भव्य व स्पष्ट आहे. सोंड डाव्या हातावरील मोदकाकडे वळलेली आहे. भृशुंड गणेशाचं मंदीर हेमाडपंथी आहे. मूर्तीची स्थापना ११३० मध्ये झाली असावी असा अंदाज आहे. तसे मेंढा परिसरात गिरीवंशीय गोसावी लोकांच्या समाधी समूहाचा एक भाग आहे. आजही या भागात हेमाडपंथी शैलीतील स्मारके बघायला मिळतात. तसेच कित्येक वर्ष हे भृशुंड गणेशाचे मंदीर दुर्लक्षीत होते. परंतू भंडारा येथील ग्रामजोशी श्री विश्वासराव जोशी यांचे पुढाकाराने १९८६ पासून तिथे पूजा सुरू केली गेली. आज मंदीराची भव्यता वाढली असून सभामंडप भव्य व सुंदर परिसर गणेश भक्तांना आध्यात्मिक सुख देण्यात हातभार लावत आहे. भृशुंड गणेशमेंढा - परिसरातील ग्रामवासियांनी पुढाकाराने साकारलेली एक वस्तू असून त्यांच्याच सहकार्याने विविध कार्यक्रमांची रेलचेल वर्षभर असते. आज दर चतुर्थीला अभिषेक व महापूजा असते. गणेशोत्सवाचा दहा दिवस कार्यक्रम चालतो. आणि पौष संकष्ट चतुर्थी ते माघ चतुर्थी पर्यंत एक महिनाभर कार्यक्रम असतो. पूजापाठात ग्रामस्थ हिरिरीने सहभागी होवून कार्यक्रम व उत्सव थाटात पार पाडतात. संस्कारक्षम वातावरण निर्मीतीसाठी ग्रामीण महिलांना गणपती अथर्वशिर्ष शिकविण्यात आले. त्यामुळे आवर्तनाभिषेकात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. या देवस्थानाला आजवर अनेक संतमहंतांनी भेटी दिल्यात श्रृंगेरी पिठाचे जगद्गुरू शंकराचार्य प. पू. श्री भारतीतीर्थ हे एक होत. नुकतीच बडोद्याचे प. पू. श्री. जनार्दनस्वामी खेर यांनी सुध्दा भृशुंड गणेशाचे दर्शन घेतले. याच मंदीर परीसरात श्री. महावीर हनुमानाची मूर्ती सुध्दा आहे. परंतू त्यावर मंदीर अथवा छत नाही हे विशेष.
भाविकांची मनोरथे पूर्ण करणा-या श्री. भृशुंड गणेशाची आरती त्याची महती गाणारीच आहे.

आरती श्री गणेशा, देवा मंगळमूर्ती, नामले रामस्वामी, वेद वर्णिती कीर्ती ॥१॥
भृशुंड ॠषीवर दे तुला प्रसन्न केले, दिधले ते निज स्वरूपा अपूले ॥२॥
नादा: बिंदू सुधा न भी कर्पुरा देते, तिन्हींचा संगम झाला, प्रभू नांदसी तेथे ॥३॥
कामना पूर्ण होती, तुझे दर्शने देवा, गोसाची नंदन तुझे चरणी सेवा ॥४॥ आरती श्री गणेशा ॥

श्री भृशुंड ॠषींनी वैनगंगेच्या तीरावर वटवृक्षाखाली तपश्चर्या करून या क्षेत्राला पावन केले आहे. गणेश व मुदगल पुरांणांतून भृशुंड गणेशाचे आख्यान दिलेले आहे. अशा या पावन भृशुंड गणेश मंदीरातून प्रज्वलीत झालेली संस्काराची ज्योत समाजाच्या तळागळापर्यंत जावून सामाजिक एकात्मतेची बंधूभावाची एक अखंड महाज्योत व्हावी अशी प्रार्थना श्री भृशुंड गणेशाचे चरणी करूया.
।। ॐ गं गणपतये नमः ।।

Friday 17 August 2012


कर्तेपणा

एक गोष्ट अशी पण : 
एक ८ वर्षाची मुलगी आइसक्रीम पार्लरला गेली.
वेटर : काय पाहिजे?
मुलगी : भाऊ, हे  कोनमधील आइसक्रीम कितीला आहे?
वेटर : १५ रुपयाला 
मुलीने स्वतःच्या पर्समध्ये  किती पैसे आहेत हे बघितले आणि छोट्या कोनमधील आइसक्रीम ची किंमत विचारली.
वेटर ने रागात येऊन सांगितले : १२ रुपयाला
मुलीने छोट्या कोनमधील आइसक्रीम देण्यास सांगितले.
वेटरने एका प्लेटमध्ये तो छोटा कोन ठेवून टेबलावर रागाने आपटून दिला.
मुलगी आइसक्रीम खावून झाल्यावर पैसे ठेवून निघून गेली.
जेव्हा वेटर प्लेट घेवून जाण्यासाठी आला तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आले.
कारण.....
त्या मुलीने त्या वेटर साठी ३ रुपये टीप्स म्हणून ठेवून गेली होती. ....
गोष्टीतला गाभार्थ हा कि: आपल्याकडे जे काही आहे त्याच्यातच लोकांना पण खुश ठेवण्याचा प्रयन्त केला पाहिजे.
आपल्या दररोजच्या जीवनात अशा किती गोष्टी आपल्या  नकळत करतो? आणि जेव्हा काही करण्याचा प्रयन्त करतो, तेव्हा त्या कर्तेपणाचा आपल्याला "अभिमान" होतो. मग अशा प्रकारच्या "चांगुलपणाचा" देव कसा बर स्वीकार करेल? बरोबर ना?

पवित्र श्रावण मास का आज आखरी दिन और कल हे श्रावण अमावस्या. आज श्रावण मास का आखरी गुरुवार भी है, और ईस शुभदिन के संध्याकाल समय हम सह परिवार दर्शन करेंगे बारा ज्योतिर्लिंग के बारहवे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर जी का । और इस दर्शन के साथ हि हमारी श्रावण मास के चलते बारा ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा संपुर्ण होगी । सभी भक्तोंसे वानंती है कि, ईस यात्रा के बारे में कुछ टिपणी देनी हो तो अवश्य दें ।  तो फिर चलें,


१२) घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग :- महाराष्ट्र में औरंगाबाद के नजदीक दौलताबाद से ११ किलोमीटर दूर घृष्णेदश्वंर महादेव का मंदिर स्थित है। यह बारह ज्योतिर्लिंगों में से एक है। कुछ लोग इसे घुश्मेश्वर के नाम से भी पुकारते हैं। बौद्ध भिक्षुओं द्वारा निर्मित एलोरा की प्रसिद्ध गुफाएँ इस मंदिर के समीप ही स्थित हैं। इस मंदिर का निर्माण देवी अहिल्याबाई होल्कर ने करवाया था। शहर से दूर स्थित यह मंदिर सादगी से परिपूर्ण है। द्वादश ज्योतिर्लिंगों में यह अंतिम ज्योतिर्लिंग है। इसे घुश्मेश्वर, घुसृणेश्वर या घृष्णेश्वर भी कहा जाता है। यह महाराष्ट्र प्रदेश में दौलताबाद से बारह मीर दूर वेरुलगाँव के पास स्थित है।

पौराणिक कथा :-
इस ज्योतिर्लिंग के विषय में पुराणों में यह कथा वर्णित है- दक्षिण देश में देवगिरिपर्वत के निकट सुधर्मा नामक एक अत्यंत तेजस्वी तपोनिष्ट ब्राह्मण रहता था। उसकी पत्नी का नाम सुदेहा था दोनों में परस्पर बहुत प्रेम था। किसी प्रकार का कोई कष्ट उन्हें नहीं था। लेकिन उन्हें कोई संतान नहीं थी।  ज्योतिष-गणना से पता चला कि सुदेहा के गर्भ से संतानोत्पत्ति हो ही नहीं सकती। सुदेहा संतान की बहुत ही इच्छुक थी। उसने सुधर्मा से अपनी छोटी बहन से दूसरा विवाह करने का आग्रह किया। पहले तो सुधर्मा को यह बात नहीं जँची। लेकिन अंत में उन्हें पत्नी की जिद के आगे झुकना ही पड़ा। वे उसका आग्रह टाल नहीं पाए। वे अपनी पत्नी की छोटी बहन घुश्मा को ब्याह कर घर ले आए। घुश्मा अत्यंत विनीत और सदाचारिणी स्त्री थी। वह भगवान्‌ शिव की अनन्य भक्ता थी। प्रतिदिन एक सौ एक पार्थिव शिवलिंग बनाकर हृदय की सच्ची निष्ठा के साथ उनका पूजन करती थी।  भगवान शिवजी की कृपा से थोड़े ही दिन बाद उसके गर्भ से अत्यंत सुंदर और स्वस्थ बालक ने जन्म लिया। बच्चे के जन्म से सुदेहा और घुश्मा दोनों के ही आनंद का पार न रहा। दोनों के दिन बड़े आराम से बीत रहे थे। लेकिन न जाने कैसे थोड़े ही दिनों बाद सुदेहा के मन में एक कुविचार ने जन्म ले लिया। वह सोचने लगी, मेरा तो इस घर में कुछ है नहीं। सब कुछ घुश्मा का है। अब तक सुधर्मा के मन का कुविचार रूपी अंकुर एक विशाल वृक्ष का रूप ले चुका था। मेरे पति पर भी उसने अधिकार जमा लिया। संतान भी उसी की है। यह कुविचार धीरे-धीरे उसके मन में बढ़ने लगा। इधर घुश्मा का वह बालक भी बड़ा हो रहा था। धीरे-धीरे वह जवान हो गया। उसका विवाह भी हो गया। अब तक सुधर्मा के मन का कुविचार रूपी अंकुर एक विशाल वृक्ष का रूप ले चुका था। अंततः एक दिन उसने घुश्मा के युवा पुत्र को रात में सोते समय मार डाला। उसके शव को ले जाकर उसने उसी तालाब में फेंक दिया जिसमें घुश्मा प्रतिदिन पार्थिव शिवलिंगों को फेंका करती थी।  सुबह होते ही सबको इस बात का पता लगा। पूरे घर में कुहराम मच गया। सुधर्मा और उसकी पुत्रवधू दोनों सिर पीटकर फूट-फूटकर रोने लगे। लेकिन घुश्मा नित्य की भाँति भगवान्‌ शिव की आराधना में तल्लीन रही। जैसे कुछ हुआ ही न हो। पूजा समाप्त करने के बाद वह पार्थिव शिवलिंगों को तालाब में छोड़ने के लिए चल पड़ी। जब वह तालाब से लौटने लगी उसी समय उसका प्यारा लाल तालाब के भीतर से निकलकर आता हुआ दिखलाई पड़ा। वह सदा की भाँति आकर घुश्मा के चरणों पर गिर पड़ा। जैसे कहीं आस-पास से ही घूमकर आ रहा हो। इसी समय भगवान्‌ शिव भी वहाँ प्रकट होकर घुश्मा से वर माँगने को कहने लगे। वह सुदेहा की घनौनी करतूत से अत्यंत क्रुद्ध हो उठे थे। अपने त्रिशूल द्वारा उसका गला काटने को उद्यत दिखलाई दे रहे थे। घुश्मा ने हाथ जोड़कर भगवान्‌ शिव से कहा- 'प्रभो! यदि आप मुझ पर प्रसन्न हैं तो मेरी उस अभागिन बहन को क्षमा कर दें। निश्चित ही उसने अत्यंत जघन्य पाप किया है किंतु आपकी दया से मुझे मेरा पुत्र वापस मिल गया। अब आप उसे क्षमा करें और प्रभो!  मेरी एक प्रार्थना और है, लोक-कल्याण के लिए आप इस स्थान पर सर्वदा के लिए निवास करें।' भगवान्‌ शिव ने उसकी ये दोनों बातें स्वीकार कर लीं। ज्योतिर्लिंग के रूप में प्रकट होकर वह वहीं निवास करने लगे। सती शिवभक्त घुश्मा के आराध्य होने के कारण वे यहाँ घुश्मेश्वर महादेव के नाम से विख्यात हुए।

घुष्णेश्वर-ज्योतिर्लिंग की महिमा पुराणों में बहुत विस्तार से वर्णित की गई है। इनका दर्शन लोक-परलोक दोनों के लिए अमोघ फलदाई है।  ।। ॐ नमः शिवाय ।।