Monday 30 July 2012

नखे आणि अहंकार




काल skype वर, श्रुती आपली वाढलेली नखे अगदी अभिमानाने दाखवीत होती. परवा परवा पर्यंत नखे कुरतडणाऱ्या मुलीला ह्याचे कौतुक वाटणे अगदी साहजिकच होते. मला पण तिची वाढलेली नखे पाहून बरे वाटले. तिची नखे कुरतडण्याची सवय सुटली हे बघून मला पण सात्विक आनंद झाला.  नंतर इंग्लिश मध्ये असलेल्या एका सुविचाराची मला आठवण झाली.परवाच फेसबुकवर हेमंतने पोस्ट केलेला हा सुविचार माझ्या नवऱ्याने मला वाचून दाखविला होता. तो असा " When nails grow long, we cut nails not fingers. Similarly, when misunderstandings grow up, cut your ego and not your relations." काय मज्जा आहे बघा, ज्या नखाला, आपल्यात असलेल्या अहंकाराची उपमा दिली आहे आणि आपल्याला उपदेशले आहे कि  आपली बोटे न कापता ही वाढलेली नखे कापणे आवश्यक आहे कारण  जीवनात अहंकारापेक्षा नाती सांभाळणे हे श्रेष्ट आहे , तीच नखे हल्ली सुंदरतेचे लक्षण समजले जाते. ही नखे जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी हजारो रुपये खर्च केले जातात. नेल आर्ट ची  तर मोठी मोठी दुकाने मांडून बायका पैसे कमावत आहेत. एक क्षणी वाटले, ह्या नखे वाढविण्याच्या कलेचा आणि सुविचाराचा काही संबंध आहे कि नाहीं? हल्लीच्या स्पर्धात्मक झालेल्या धावपळीच्या आयुष्यात, माणूस फक्त विषयाच्या मागे धावत आहे. ह्या विषय वासनेने त्याला अगदी आंधळे करून टाकले आहे. अहंकाराच्या भावनेने त्याची सद्विवेक बुद्धी भ्रष्ट होवून गेली आहे का ? त्याची आपलेपणाची भावना कुठे हरवून गेली आहे? का आपल्याला आपली नाती गोती सांभाळण्यापेक्षा नखे गोंजारणे जास्त महत्वाचे वाटते? आधुनिक जगातील प्रगतीने आपल्याला दिलेला हा एक शापच आहे. आणि हा शाप, आपण नखे सुंदररित्या वाढवून छान दिसणाऱ्या हातात पकडून छातीशी कवटाळून बसलो आहोत. ह्या अशा नखांची किमया किती वर्णावी तितकी कमीच !!!!  

स्मरण आणि विस्मरण

अगदी हौशीने बनवलेल्या  plastic canvas च्या magazine holder मध्ये, कधी तरी उपयोगी पडतील म्हणून कोंबून ठेवलेल्या "Friday Magazines" चा साठा, न उचलण्याइतका जड झाल्यावर, मी मनाशी ठाम मांडून रिकामा करावयाचा ठरवला. त्या मध्ये , १५ जूनचा "The Views" या section चा पेपर  मिळाला. कशासाठी हा पेपर मी जपून ठेवला असेन, ह्या विचारात, तो पेपर मी किमान दहा वेळा तरी चाळला असेन, परंतु मला एक कणमात्र सुद्धा, माझ्या स्वताच्या ह्या मागील उद्देशाची आठवण होईना. हताश होवून मी तो पेपर शेवटी फेकून दिला. हे करत असतांना, श्री. गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेल्या एका गोष्टीची मला सातत्याने जाणीव झाली. ती  म्हणजे, आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्यांचे आपल्याला स्मरण राहते आणि याच्या उलट, ज्या आवडत नाहीत त्यांचे आपोआप विस्मरण होते. आवडत असलेल्या गोष्टीत आपण नकळत एकाग्र होतो. आपल्याला विषयाची आवड असते म्हणून विषयांचे सेवन करताना आपण "एकाग्र" होतो; मग विषयाच्या ऐवजी आपण भगवंताची / परमात्म्याची आवड धरली तर त्याच्या ठिकाणी एकाग्र होता येणार नाहीं का? भगवंता बद्दलचे आपले विस्मरण हेच याला कारणीभूत असावे. "प्रपंच  तातडीचा आणि परमार्थ मात्र सवडीचा" हे असे आपण का करतो?  भगवंताच्या स्मरणात केलेले कोणतेही कर्म "सत्कर्म" या सदरेत पडते, हे का आपल्या लक्षात येत नाहीं ? १५ जूनचा पेपरामध्ये नक्कीच काही तरी वाचण्यासारखे होते, परंतु त्याचे मला विस्मरण झाले होते. का अशा गोष्टी माझ्या लक्षात राहत नाहीत? आता पुढे अशी चूक पुन्हा घडणार नाहीं, असे मनाला बजावून सांगितल्यावर जरा बरे वाटले.           


सर्वांचा आवडता पवित्र असा श्रावण महिना सुरु आहे. श्रावण महिन्याचे विशेष महत्व बारा ज्योतिर्लिंगामुळे आहे. त्यापैकि दोन  ज्योतिर्लिंगाचं आपण दर्शन घेतलच आणि त्याबाबतची सविस्तर माहिती देखिल वाचली. आज आपण तिसरे  ज्योतिर्लिंग आणि त्याबाबतची सविस्तर माहिती जाणुन घेऊया. ही  माहिती हिंदि भाषेत आहे.



३) महाकालेश्वर ज्योतिर्लिंग: - 
बारा ज्योतिर्लिंग में तिसरा ज्योतिर्लिंग है श्री महाकालेश्वर । उज्जैन में महाकालेश्वर मंदिर एक विशाल परिसर में स्थित है, जहाँ कई देवी-देवताओं के छोटे-बड़े मंदिर हैं। मंदिर में प्रवेश करने के लिए मुख्य द्वार से गर्भगृह तक की दूरी तय करनी पड़ती है। इस मार्ग में कई सारे पक्के चढ़ाव उतरने पड़ते हैं परंतु चौड़ा मार्ग होने से यात्रियों को दर्शनार्थियों को अधिक ‍परेशानियाँ नहीं आती है। गर्भगृह में प्रवेश करने के लिए पक्की सीढ़ियाँ बनी हैं। मंदिर परिसर में एक प्राचीन कुंड है। वर्तमान में जो महाकालेश्वर ज्योतिर्लिंग है वह तीन खंडों में विभाजित है। निचले खंड में महाकालेश्वर, मध्य के खंड में ओंकारेश्वर तथा ऊपरी खंड में श्री नागचंद्रेश्वर मंदिर स्थित है। गर्भगृह में विराजित भगवान महाकालेश्वर का विशाल दक्षिणमुखी शिवलिंग है, ज्योतिष में जिसका विशेष महत्व है। 

इसी के साथ ही गर्भगृह में माता पार्वती, भगवान गणेश व कार्तिकेय की मोहक प्रतिमाएँ हैं। गर्भगृह में नंदी दीप स्थापित है, जो सदैव प्रज्ज्वलित होता रहता है। गर्भगृह के सामने विशाल कक्ष में नंदी की प्रतिमा विराजित है। इस कक्ष में बैठकर हजारों श्रद्धालु शिव आराधना का पुण्य लाभ लेते हैं।

मुख्य आकर्षण : -
महाकालेश्वर मंदिर के मुख्य आकर्षणों में भगवान महाकाल की भस्म आरती, नागचंद्रेश्वर मंदिर, भगवान महाकाल की शाही सवारी आदि है। प्रतिदिन अलसुबह होने वाली भगवान की भस्म आरती के लिए कई महीनों पहले से ही बुकिंग होती है। इस आरती की खासियत यह है कि इसमें ताजा मुर्दे की भस्म से भगवान महाकाल का श्रृंगार किया जाता है लेकिन आजकल इसका स्थान गोबर के कंडे की भस्म का उपयोग किया जाता है परंतु आज भी यही कहा जाता है कि यदि आपने महाकाल की भस्म आरती नहीं देखी तो आपका महाकालेश्वर दर्शन अधूरा है।
प्रति बारह वर्ष में पड़ने वाला कुंभ मेला यहाँ का सबसे बड़ा मेला है, जिसमें देश-विदेश से आए साधु-संतों व श्रद्धालुओं का जमावड़ा लगता है। महाकालेश्वर मंदिर के ऊपरी तल पर स्थित प्राचीन व चमत्कारी नागचंद्रेश्वर मंदिर वर्ष में एक बार केवल नागपंचमी को ही श्रद्धालुओं के दर्शनार्थ खोला जाता है। यहाँ हर वर्ष श्रावण मास में भगवान महाकाल की शाही सवारी निकाली जाती हैं।
हर सोमवती अमावस्या पर उज्जैन में श्रद्धालु पुण्य सलिला शिप्रा स्नान के लिए पधारते हैं। फाल्गुनकृष्ण पक्ष की पंचमी से लेकर महाशिवरात्रि तक तथा नवरात्रि महोत्सव पर यहाँ महाकालेश्वर ज्योतिर्लिंग के विशेष दर्शन, पूजन व रूद्राभिषेक होता है।

यहाँ का सिंहस्थ मेला : -
सिंहस्थ मेले के बारे में यह कहा जाता है कि जब समुद्र मंथन के पश्चात देवता अमृत कलश को दानवों से बचाने के लिए वहाँ से पलायन कर रहे थे, तब उनके हाथों में पकड़े अमृत कलश से अमृत की बूँद धरती पर जहाँ-जहाँ भी गिरी थी, वो स्थान पवित्र तीर्थ बन गए। उन्हीं स्थानों में से एक उज्जैन है। यहाँ प्रति बारह वर्ष में सिंहस्थ मेला आयोजित होता है। 
उज्जैन का सिंहस्थ मेला बहुत ही दुर्लभ संयोग लेकर आता है इसलिए इसका महत्व और भी अधिक बढ़ जाता है। इस दिन यहाँ दस दुर्लभ योग होते हैं, जैसे : वैशाख माह, मेष राशि पर सूर्य, सिंह पर बृहस्पति, स्वाति नक्षत्र, शुक्ल पक्ष, पूर्णिमा आदि।
।। ॐ नमः शिवाय ।।

Friday 27 July 2012

संस्कार 


खरच आपले भारतीय संस्कार किती प्रगल्भ मानसिक बळ वाढविणारे आहेत. प्रत्येक पावली आपल्याला हेच सांगते कि, एकमेकात प्रेम वाढविणे आणि नंतर ते जोपासणे ही काही एका रात्रीत घडणारी गोष्ट नव्हे.  देवावरची भक्ती, कशी थोडी थोडी वाढवीत जावून शेवटी आत्मसाक्षात्कार घडवून घेण्याचा प्रयन्त करणे हे जसे, "it is a process and not an event", तसेच आपापसात प्रेम, जिव्हाळा वाढवण्याचा प्रयत्न हा सर्वांनी मिळून कसोशीने करायला आपली भारतीय संस्कृती सांगते. "Compatibility", हा शब्द अगदी अलीकडला आहे. अहो, आमच्या लग्नाला २८ वर्षे झाली , परंतु आजही , आम्ही एकमेकाला पूर्णपणे ओळखू शकलो नाहीत आणि आमचा तसा आता हट्टही नाहीं. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती  आणि आपल्या हाताचीच बोटे तरी कुठे सारखी आहेत ? पण हृदयातल्या मुळाशी कुठेतरी घट्ट रोवलेल्या त्या संस्कारांनी आम्हाला कसे एकमेकात मस्तपैकी गुंतवून ठेवले आहे.  
.
लग्नात , हे कशासाठी ??

1)लग्नात मांडव कशासाठी???
= मातेनं, माझ्या मुलीचं मनही मांडवा सारखा मोठं आहे,हे सांगण्यासाठी !!!

2)विहिनबाईला आणि नवरदेवाला स्वागतास पायघड्या कशासाठी???
= माझ्या मुलीला तुम्ही असचं अलगद सांभाळा,हे सांगण्यासाठी !!!

3)नवरदेवाची कानपिळी वधुच्या भावानेचं पिळायची,हे कशासाठी???
=माझ्या बहिणीला तुमच्या जीवनात नीट आणि चांगलं वागवा,हे सांगण्यासाठी !!!

4)मुलीच्या मागं मामाचं उभा राहतो,हे कशासाठी???
= मुलीच्या आईला,मी तुझ्या पाठिशी भक्कम उभा आहे,हे सांगण्यासाठी !!!

5)लग्नात वधु-वरांनी एकमेकास घास द्यायचा,हे कशासाठी???
= प्रेमाचं हे प्रतिक आहे। तुझ्या- माझ्यात काही अंतर राहिलेलं नाही,हे सांगण्यासाठी !!!

6)लग्नात सप्तपदी घालावी,हे कशासाठी???
= तुमच्या सुख-दु:खात मी आता सोबत आहे. सात पावलं हि मर्यादा आहे,हे सांगण्यासाठी !!!

7)लग्नात तांदळाची अक्षता उधळण कशासाठी???
= तुमच्या घरात धान्य भरपुर असु दे.त्यात सारं मांगल्य आहे,हे सांगण्यासाठी !!!

चला तर, ह्या एकुलत्या एक आयुष्यात, प्रेमाने एकमेकांना घट्ट उराशी धरून डोळ्यावर चढणाऱ्या त्या धुंद नशेत, देवाला पदोपदी आठवत, मस्त मजा करूया !! 
सुंदर मुलगी

"सुंदर मुलीच्या प्रेमात पडणारे सगळेच संसारात यशस्वी होतात असे नाही . . पण. जीवन सुंदर बनवणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडणारे १००% यशस्वी होतात...♥♥." खरंच, किती सत्य आहे हे. म्हणूनच अगदी प्रचलित असलेले वाक्य, " प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात असतो ", हे कसे सर्रास ऐकवायला मिळते, तसे, "प्रत्येक यशस्वी महिलेच्या मागे एका पुरुषाचा हात असतो", हे फारसे मी तरी अजून पर्यंत ऐकलेले नाहीं. ह्याला काय कारण असावे? असुदे.....काही तरी !!

सर्वांचा आवडता पवित्र असा श्रावण महिना सुरु आहे. श्रावण महिन्याचे विशेष महत्व बारा ज्योतिर्लिंगामुळे आहे. त्यापैकि पहिल्या ज्योतिर्लिंगाचं आपण दर्शन घेतलच आणि त्याबाबतची सविस्तर माहिती देखिल वाचली. आज आपण दुसरे ज्योतिर्लिंग आणि त्याबाबतची सविस्तर माहिती जाणुन घेऊया. ही  माहिती हिंदि भाषेत आहे. 



२) मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग : -
आन्ध्र प्रदेश के कृष्णा ज़िले में कृष्णा नदी के तट पर श्रीशैल पर्वत पर श्रीमल्लिकार्जुन विराजमान हैं। इसे दक्षिण का कैलाश कहते हैं। अनेक धर्मग्रन्थों में इस स्थान की महिमा बतायी गई है। महाभारत के अनुसार श्रीशैल पर्वत पर भगवान शिव का पूजन करने से अश्वमेध यज्ञ करने का फल प्राप्त होता है। कुछ ग्रन्थों में तो यहाँ तक लिखा है कि श्रीशैल के शिखर के दर्शन मात्र करने से दर्शको के सभी प्रकार के कष्ट दूर भाग जाते हैं, उसे अनन्त सुखों की प्राप्ति होती है और आवागमन के चक्कर से मुक्त हो जाता है। इस आशय का वर्णन शिव महापुराण के कोटिरुद्र संहिता के पन्द्रहवे अध्याय में उपलब्ध होता है।−

तदिद्नं हि समारभ्य मल्लिकार्जुन सम्भवम्।
लिंगं चैव शिवस्यैकं प्रसिद्धं भुवनत्रये।।
तल्लिंग यः समीक्षते स सवैः किल्बिषैरपि।
मुच्यते नात्र सन्देहः सर्वान्कामानवाप्नुयात्।।
दुःखं च दूरतो याति सुखमात्यंतिकं लभेत।
जननीगर्भसम्भूत कष्टं नाप्नोति वै पुनः।।
धनधान्यसमृद्धिश्च प्रतिष्ठाऽऽरोग्यमेव च।
अभीष्टफलसिद्धिश्च जायते नात्र संशयः।।

पौराणिक कथानक :-
शिव पार्वती के पुत्र स्वामी कार्तिकेय और गणेश दोनों भाई विवाह के लिए आपस में कलह करने लगे। कार्तिकेय का कहना था कि वे बड़े हैं, इसलिए उनका विवाह पहले होना चाहिए, किन्तु श्री गणेश अपना विवाह पहले करना चाहते थे। इस झगड़े पर फैसला देने के लिए दोनों अपने माता-पिता भवानी और शंकर के पास पहुँचे। उनके माता-पिता ने कहा कि तुम दोनों में जो कोई इस पृथ्वी की परिक्रमा करके पहले यहाँ आ जाएगा, उसी का विवाह पहले होगा। शर्त सुनते ही कार्तिकेय जी पृथ्वी की परिक्रमा करने के लिए दौड़ पड़े। इधर स्थूलकाय श्री गणेश जी और उनका वाहन भी चूहा, भला इतनी शीघ्रता से वे परिक्रमा कैसे कर सकते थे। गणेश जी के सामने भारी समस्या उपस्थित थी। श्रीगणेश जी शरीर से ज़रूर स्थूल हैं, किन्तु वे बुद्धि के सागर हैं। उन्होंने कुछ सोच-विचार किया और अपनी माता पार्वती तथा पिता देवाधिदेव महेश्वर से एक आसन पर बैठने का आग्रह किया। उन दोनों के आसन पर बैठ जाने के बाद श्रीगणेश ने उनकी सात परिक्रमा की, फिर विधिवत् पूजन किया-

पित्रोश्च पूजनं कृत्वा प्रकान्तिं च करोति यः।
तस्य वै पृथिवीजन्यं फलं भवति निश्चितम्।।

इस प्रकार श्रीगणेश माता-पिता की परिक्रमा करके पृथ्वी की परिक्रमा से प्राप्त होने वाले फल की प्राप्ति के अधिकारी बन गये। उनकी चतुर बुद्धि को देख कर शिव और पार्वती दोनों बहुत प्रसन्न हुए और उन्होंने श्रीगणेश का विवाह भी करा दिया। जिस समय स्वामी कार्तिकेय सम्पूर्ण पृथ्वी की परिक्रमा करके वापस आये, उस समय श्रीगणेश जी का विवाह विश्वरूप प्रजापति की पुत्रियों सिद्धि और बुद्धि के साथ हो चुका था। इतना ही नहीं श्री गणेशजी को उनकी ‘सिद्धि’ नामक पत्नी से ‘क्षेम’ तथा बुद्धि नामक पत्नी से ‘लाभ’, ये दो पुत्ररत्न भी मिल गये थे। भ्रमणशील और जगत का कल्याण करने वाले देवर्षि नारद ने स्वामी कार्तिकेय से यह सारा वृतान्त कहा सुनाया। श्रीगणेश का विवाह और उन्हें पुत्र लाभ का समाचार सुनकर स्वामी कार्तिकेय जल उठे। इस प्रकरण से नाराज़ कार्तिक ने शिष्टाचार का पालन करते हुए अपने माता-पिता के चरण छुए और वहाँ से चल दिये। माता-पिता से अलग होकर कार्तिक स्वामी क्रौंच पर्वत पर रहने लगे। शिव और पार्वती ने अपने पुत्र कार्तिकेय को समझा-बुझाकर बुलाने हेतु देवर्षि नारद को क्रौंचपर्वत पर भेजा। देवर्षि नारद ने बहुत प्रकार से स्वामी को मनाने का प्रयास किया, किन्तु वे वापस नहीं आये। उसके बाद कोमल हृदय माता पार्वती पुत्र स्नेह में व्याकुल हो उठीं। वे भगवान शिव जी को लेकर क्रौंच पर्वत पर पहुँच गईं। इधर स्वामी कार्तिकेय को क्रौंच पर्वत अपने माता-पिता के आगमन की सूचना मिल गई और वे वहाँ से तीन योजन अर्थात छत्तीस किलोमीटर दूर चले गये। कार्तिकेय के चले जाने पर भगवान शिव उस क्रौंच पर्वत पर ज्योतिर्लिंग के रूप में प्रकट हो गये तभी से वे ‘मल्लिकार्जुन’ ज्योतिर्लिंग के नाम से प्रसिद्ध हुए। ‘मल्लिका’ माता पार्वती का नाम है, जबकि ‘अर्जुन’ भगवान शंकर को कहा जाता है। इस प्रकार सम्मिलित रूप से ‘मल्लिकार्जुन’ नाम उक्त ज्योतिर्लिंग का जगत में प्रसिद्ध हुआ।

अन्य कथानक :-
एक अन्य कथानक के अनुसार कौंच पर्वत के समीप में ही चन्द्रगुप्त नामक किसी राजा की राजधानी थी। उनकी राजकन्या किसी संकट में उलझ गई थी। उस विपत्ति से बचने के लिए वह अपने पिता के राजमहल से भागकर पर्वतराज की शरण में पहुँच गई। वह कन्या ग्वालों के साथ कन्दमूल खाती और दूध पीती थी। इस प्रकार उसका जीवन-निर्वाह उस पर्वत पर होने लगा। उस कन्या के पास एक श्यामा (काली) गौ थी, जिसकी सेवा वह स्वयं करती थी। उस गौ के साथ विचित्र घटना घटित होने लगी। कोई व्यक्ति छिपकर प्रतिदिन उस श्यामा का दूध निकाल लेता था। एक दिन उस कन्या ने किसी चोर को श्यामा का दूध दुहते हुए देख लिया, तब वह क्रोध में आगबबूला हो उसको मारने के लिए दौड़ पड़ी। जब वह गौ के समीप पहुँची, तो उसके आश्चर्य का ठिकाना न रहा, क्योंकि वहाँ उसे एक शिवलिंग के अतिरिक्त कुछ भी दिखाई नहीं दिया। आगे चलकर उस राजकुमारी ने उस शिवलिंग के ऊपर एक सुन्दर सा मन्दिर बनवा दिया। वही प्राचीन शिवलिंग आज ‘मल्लिकार्जुन’ ज्योतिर्लिंग के नाम से प्रसिद्ध है। इस मन्दिर का भलीभाँति सर्वेक्षण करने के बाद पुरातत्त्ववेत्ताओं ने ऐसा अनुमान किया है कि इसका निर्माणकार्य लगभग दो हज़ार वर्ष प्राचीन है। इस ऐतिहासिक मन्दिर के दर्शनार्थ बड़े-बड़े राजा-महाराजा समय-समय पर आते रहे हैं।

विजयनगर के महाराजा द्वारा निर्माण :-
आज से लगभग पाँच सौ वर्ष पूर्व श्री विजयनगर के महाराजा कृष्णराय यहाँ पहुँचे थे। उन्होंने यहाँ एक सुन्दर मण्डप का भी निर्माण कराया था, जिसका शिखर सोने का बना हुआ था। उनके डेढ़ सौ वर्षों बाद महाराज शिवाजी भी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग के दर्शन हेतु क्रौंच पर्वत पर पहुँचे थे। उन्होंने मन्दिर से थोड़ी ही दूरी पर यात्रियों के लिए एक उत्तम धर्मशाला बनवायी थी। इस पर्वत पर बहुत से शिवलिंग मिलते हैं। यहाँ पर महाशिवरात्रि के दिन मेला लगता है। मन्दिर के पास जगदम्बा का भी एक स्थान है। यहाँ माँ पार्वती को ‘भ्रमराम्बा’ कहा जाता है। मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग की पहाड़ी से पाँच किलोमीटर नीचे पातालगंगा के नाम से प्रसिद्ध कृष्णा नदी हैं, जिसमें स्नान करने का महत्त्व शास्त्रों में वर्णित है।
।। ॐ नमः शिवाय ।।




Monday 23 July 2012


भावुक मन.... 

फक्त १५ मिनिटा पूर्वी स्वयंपाकघरातला कुकिंग ग्यास संपला. एक क्षणी वाटले, बरे झाले , "आत्ताच संपला, उद्या सकाळी सकाळी संपला असता तर, माझ्या आवडत्या चहाचे, कि ज्या साठी मी दररोज सकाळी डोळे उघडते आणि देवाचे मंत्र म्हणत-म्हणत, मस्त पैकी आले घालून तयार करते, तो चहा मला अव्वल एक-दोन तास तरी उशिरा मिळाला असता. खरच देव आपली साध्या-साध्या गोष्टीतही किती काळजी घेतो !!" आता ह्या घटनेचा आणि देवावरच्या श्रद्धेचा कितपत संबध आहे , ह्या वर विचार करण्याच्या मनःस्थितीत मी, आयुष्याच्या ह्या वळणावर, आणि  ह्यानंतर तरी कधीच असणार नाहीं. हल्ली सर्वच गोष्टीत, "तो कर्ता, मी नाहीं", असे खात्रीपूर्वक वाटते. मन समाधानी आणि आनंदी ठेवायला ह्या खात्रीची, मला वाटत खूप आवश्यकता आहे. काही चांगल पाहायला मिळालं, वाचायला मिळालं, करायला मिळालं....कि असं वाटत कि, "देवाची कृपा आहे म्हणून तर आपल्याला हे सर्व मिळतंय, बारीक सारीक गोष्टीत त्याचं  अस्तित्व जाणवते !! आणि वयाच्या ५२ व्या वर्षी, "मी कोण?" हे जाणून घेताना, आपण डोक्यावर किंव्हा पोटावर किंव्हा पाठीवर हात न ठेवता छातीवर का ठेवतो हे जरा-जरा कळू लागलंय !! ". असा विचार मनात चालू असताना, श्रावणातल्या पहिल्या सोमवारी , सोरटीच्या सोमानाथाबद्दल वाचायला मिळाले, ही सुद्धा एक प्रकारची देवाची कृपा नव्हे का ?

आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार.  सर्व श्री गणेश भक्तांना श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. 
आज सोमवारपासुन आपण बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन आणि माहिती घेणार आहोत. 

१) सोरटिचे श्री सोमनाथ :- भगवान श्री शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी ...श्री सोमनाथाचे हे आद्य ज्योतिर्लिंग व स्वयंभु देवस्थान जाज्ज्वल्य आणि जागृत आहे. श्री सोमनाथाच्या अस्तित्वाची प्रचीति अनेक भक्तांनी घेतली आहे. भारतीय शिल्पकलेचा आणि स्वर्गीय सौंदर्याचा उत्कृष्ट नमूना म्हणून गुजरातमधील श्री सोमनाथाचे मंदिर प्रसिद्ध आहे. हे तीर्थक्षेत्र शैवतीर्थ, अग्नितीर्थ आणि सूर्यतीर्थ म्हणूनही प्रसिद्ध आहे. अनेक सिद्धपुरुषांचा सहवास या ठिकाणी लाभतो. या पवित्र स्थानाचा महिमा काही आगळाच आहे. हजारो भाविक श्रद्धा आणि भक्तीपोटी वर्षभर येथे दर्शनासाठी येत असतात. सोरटीचा हा श्री सोमनाथ महाराष्ट्रात शिखर शिंगणापूरला आणि बारामतीजवळ करंजे गावी भक्तांना दर्शन देण्यास आल्याच्या कथा प्रसिद्ध आहेत.

स्वयंभु महादेव :-
स्वयंभु असलेल्या श्री सोमनाथाच्या आजूबाजूचा निसर्गही जणू सोमनाथाच्या भक्तीत तल्लीन झाला असावा, असे वाटते. वेरावळ बंदर आणि प्रभातपट्टण या गावाभोवती ‘‘जय सोमनाथ जय सोमनाथ’’ असा जयघोष जणू आसमंतात दुमदूमत असतो. घाटाच्या पायर्‍यांवर आपटणार्‍या लाटांमधून जणू ‘जयशंकर जयशंकर’ असा घनगंभीर आवाज निघत असतो, तर मंदिरावरील प्रचंड सुवर्णघंटेतून ‘‘ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय’’ असा जयघोष निनादत असतो. वेगवेगळ्या जयघोषांचे निनाद मिसळून भगवान श्री शंकर जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्वत्र असल्याचे भक्तांना जाणवत रहाते !

सोमनाथ मंदिराची पार्श्वभूमी :-
गुजरात-सौराष्ट्रामधील हे सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. वेरावळ बंदरापासून सुमारे तीन मैल अंतरावरील प्रभातपट्टण या प्रसिद्ध शैवपंथीय तीर्थक्षेत्रात समुद्रकिनार्‍यावर सोमनाथाचे मंदिर आहे. गुजराथमधील नागर शैलीची सध्या उद्ध्वस्त स्थितीत असलेली मध्ययुगीन काळातील मंदिरे समृद्ध, नाजूक कोरीव काम असलेली म्हणून प्रसिद्ध आहेत.

तीर्थक्षेत्र भास्कर प्रभातपट्टण :-
स्कंद पुराणात अशी कथा आहे की, ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष याने आपल्या कन्यांपैकी सत्तावीस कन्या चंद्राला दिल्या. त्या नक्षत्रकन्यांपैकी रोहिणीशीच चंद्र रममाण व्हायचा. इतर कन्यांनी दक्षाकडे तक्रार केली. त्याने चंद्राला सांगून पाहिले; पण चंद्राने नकार दिल्याने नाईलाजाने दक्षराजाने त्याला ‘क्षयी’ होशील असा शाप दिला. शापमुक्त होण्यासाठी चंद्राने भगवान श्री शंकराची आराधना केली. श्री शंकराने प्रसन्न होऊन चंद्राला वरदान दिले व त्या ठिकाणी गुप्त झाले. त्याच ठिकाणी अग्निज्वालेसारखे सूर्याप्रमाणे तेजस्वी एक दिव्य ज्योतिर्लिंग उत्पन्न झाले. त्या ज्योतिर्लिंगाची चंद्राने तेथे प्राणप्रतिष्ठा केली आणि सुवर्णमंदिर बांधले. या स्थळाचे दर्शन घेणार्‍या भक्तांचा क्षयरोग बरा होईल असे त्याने सांगितले. चंद्राने म्हणजेच ‘सोमा’ने स्थापिलेले हे ज्योतिर्लिंग सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले. चंद्राला याच ठिकाणी ‘पुनःप्रभा’ प्राप्त झाली; म्हणून या ठिकाणाला ‘प्रभातपट्टण’ हे नाव पडले. प्रभातपट्टणच्या परिसरातच पूर्वी अगस्ती ऋषींनी समुद्र प्राशन केला होता. रावण, पांडव तसेच राजा जनमेजय यांनी या ‘भास्कर प्रभातपट्टण’ तीर्थाचे दर्शन घेतल्याचे संदर्भ पुराणात आहेत. रावणाने रूप्याने तसेच श्रीकृष्णाने चंदनाने श्री सोमनाथाचे मंदिरे बांधले होते.

प्राचीन मंदिराची रचना :-
मंदिराच्या रचनेत चौकोनी आकाराचे गर्भगृह आणि त्यावरील शिखर आणि त्याच्यापुढे अष्टकोनी आकाराचा एक विशाल स्तंभयुक्त मंडप होता. त्यात दोन सहस्र भाविक सहज बसत असत. मंडपात ५६ शिशाचे खांब असून ते रत्नांनी मढवलेले होते. मंदिराचे सर्व शिल्प अप्रतिम होते.

गर्भश्रीमंत श्री सोमनाथ :-
शिवपिंडीखाली विपूल द्रव्य आणि रत्ने यांच्या राशी होत्या. अमाप असा द्रव्यसाठा देवाच्या भांडारगृहात असायचा. मुख्य मंदिरासमोर सुमारे २०० मण वजनाची प्रचंड सुवर्णशृंखला आणि घंटा होती. मंदिराच्या खर्चासाठी दहा हजार गावांचे सुमारे ३० कोटी रुपयांचे उत्पन्न होते. देवाला हिरे-माणकांचे अलंकार तसेच सोन्या-चांदीची पूजेची उपकरणे होती. मंदिराच्या गाभार्‍यात रत्नदीपांचा लखलखाट अहोरात्र असायचा आणि कनोजी अत्तराचे नंदादीप सतत तेवत असायचे. आजही परदेशातून परतणारे भारतीय व्यापारी आणि देशातील सहस्रो भक्त श्री सोमनाथाला आपल्या नफ्यातून सोने, रूपे, रत्ने अर्पण करत असतात. आत्तापर्यंत हे मंदिर १६ वेळा उद्वस्त झाले व परत बांधले गेले आहे. देवाच्या पूजाभिषेकाला हरिद्वार, प्रयाग, काशी येथील गंगोदक दररोज यायचे. काश्मीरची फुले देवाच्या पूजेला असायची. नित्य नैमित्तिक उपासनेला सहस्र ब्राह्मणांची नेमणूक होती. मंदिराच्या दरबारात नृत्य, गायन यांसाठी सुमारे साडेतीनशे नृत्यांगना होत्या. 
।। ॐ नमः शिवाय ।।  ( courtesy : Shree Swami Samarth Bhakt Parivar  )

Wednesday 18 July 2012

आव्हानं.....


आयुष्यातल्या आव्हानांची गुदगुदी कशी एकदम गर्भाशयापासूनच होते. असे म्हणतात कि, गर्भाशयात सुरवातीला एकापेक्षा जास्त अंडी असतात. त्या "fittest the survivor" च्या प्रवासात बलवान अंडी समोर एकच "आव्हान" असते आणि ते म्हणजे नऊ महिन्याचा तो काळ अतिशय जवाबदारीने ममतेच्या कुशीत आतमध्ये राहून एक दिवशी देवाच्या आज्ञेनुसार ह्या जगात प्रवेश करणे. त्यानंतर आव्हानांची जी काही रांग लागते त्यात वेळ कसा पटकन निघून जातो हे कळतच नाहीं.

जन्माला आल्याबरोब्बर मोठ्याने आवाज काढून रडण्याचे "आव्हान"
रडून दाखवल्याबरोब्बर लगेच आईच्या स्तनातील अमृततुल्य दुध पिवून दाखवण्याचे "आव्हान"
दृष्टीच्या संवेदनाला चालना मिळाल्यावर आईचे सुंदर मुख प्रथम पाहण्याचे "आव्हान"
नंतर हळूहळू सर्वांची ओळख करून घेवून त्यांच्याकडे पाहून उगीचच हसण्याचे "आव्हान"

हात आणि पाय घट्ट झाल्यावर पालकांचा हात धरून ते सांगतील तिथे आणि तसे चालण्याचे "आव्हान"
लुसलुशीत बालपणात शरीराला जास्त दुखापत न करून घेता अक्षराचे ज्ञान करून घेत घेत खेळण्याचे "आव्हान"
शाळेत जावू लागल्यानंतर पालकांच्या  आणि शिक्षकांच्या अपक्षेप्रमाणे अव्वल गुण मिळवण्याचे  "आव्हान"
ही स्पर्धा नाहीतर ते बक्षीस ह्यांच्याशी मैत्री करून आई-वडिलांना त्यांची मान गर्वाने उचलून धरण्यास हातभार लावण्याचे "आव्हान"
"मला तुझ्यासारखी मुलगी असायला हवी होती," असे बळजबरीने का होईना पण असे म्हणण्यास शिक्षकांना भाग पाडण्याचे "आव्हान"
असे करता करता, आईच्या मायाळू मार्गदर्शनाखाली हळूच किशोरावस्थेतून यौवनावास्थेत पदार्पण करण्याचे  "आव्हान"

यौवनावास्थेत कौमार्याला जगातील वाईट आणि दुष्ट शक्तीपासून जपण्याचे "आव्हान"
महाविद्यालात आपण पुढे काय शिकावे आणि काय बनावे ह्याबद्दल दुसऱ्यांची मते सतत ऐकण्याचे "आव्हान"
नौकरीला  लागल्यानंतर बॉसच्या कायम गुड बुक्स मध्ये राहण्याचे "आव्हान"
प्रत्येक महिन्याच्या शेवटी शक्य नसतानाही थोडीतरी शिल्लक बँकेत जमा करण्याचे "आव्हान"
आजूबाजूची आपल्या वयातील मंडळी मजा करतांना पाहुन संभ्रमात पडलेल्या मनाची समजूत घालण्याचे "आव्हान"
आई-वडिलांनी किती छान वळण लावले आहे तुला, असे ऐकल्यावर  लोकांचे हे मत दृढ व्हावे म्हणून सतत तोलामापाने वागण्याचे   "आव्हान"

पंचविशीच्या आत लग्न करून गृहस्थाश्रमात, समाजातल्या रूढीनुसार पदार्पण करण्याचे "आव्हान"
नवराच्या पुढे किंव्हा मागे राहून हसत खेळत संसार करण्याचे "आव्हान"
नातेवाईकांमध्ये प्रेमानी आपलेपणा निर्माण करून त्यांच्याशी जन्मजन्माचे नाते असल्याचा दिलासा देण्याचे "आव्हान"
आत्ममीलनातून उपजलेल्या लेकरांना नुसत्या शब्दांचे ज्ञान न देता सुंदर जीवनातील खाचा खळग्यांचे नकळत परिचय करून देण्याचे "आव्हान"
आपले बोट न धरता स्वतःहून मार्ग आक्रमण करण्यास आतुर असलेल्या आपल्या मुलांची, त्यांच्या दृष्टीआड राहून सतत काळजी करण्याचे  "आव्हान"
त्यांना सदा सुखी ठेव आणि त्यांची सर्व दुखः आम्हाला दे, अशी देवाला विनविण्याची खटपट करत राहण्याचे "आव्हान"
ह्या सर्व प्रक्रियेत, आपल्या पेक्षा बुद्धीने शेरसव्वाशेर जास्त जड झालेल्या मुलांच्या, त्यांच्या पालकांबद्दलाच्या असलेल्या अपेक्षेप्रमाणे वागवून दाखवण्याचे "आव्हान"
"हम भी तुमसे कम नहीं," हे त्यांना सिद्ध करून दाखविण्यासाठी  निरंतर बदलत राहणाऱ्या technology बरोबर  उगीचच अद्यावत राहण्याचे "आव्हान"
मधूनमधून आपल्याला "सुपर कूल आई-वडील" म्हणणाऱ्या कर्तुत्ववान मुलांच्या गुड बुक्स मध्ये राहण्यासाठी करायच्या परिश्रमाचे "आव्हान"
आपली स्वतःची आई आपल्या जवळ सतत राहून आपल्यावर तिच्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव करावा, यासाठी आपल्या भावना तिच्यासमोर नाजुकरीत्या प्रकट  करण्याचे "आव्हान"
पंख फुटलेली पाखरे, आपण ममतेच्या उबेत सांभाळून ठेवलेल्या घरट्यातून एक ना एक दिवस  दुसऱ्या घरट्यात जाणार ह्याची जाणीव झाल्यावर, अश्रू डोळ्यांच्या कडेवर न येऊ देण्याचे "आव्हान"

जीवनात ही  सर्व आव्हाने ख़ुशी-खुशीने पेलवत असताना, अखंडित पणे केलेल्या देवावरच्या प्रेमपूर्वक भक्तीचा  शेवट खरोखरीच्या परमार्थात घडावा यासाठी निरंतर नामस्मरणाची गोडी लागावी म्हणून गुरूंच्या चरणावर शरणागती पत्करण्याचे "आव्हान"......

Sunday 15 July 2012


हतबल


२००१ च्या मे महिन्यातल्या पहिल्याच  दिवसाची पहाट इतकी भयंकर आणि काळोखी असेल याची एप्रिलच्या शेवटच्या दिवशी मला तिळमात्र कल्पना नव्हती. दादांना (माझे वडील)  दवाखान्यात admit केलय ह्या उगीचच दिलासा देणाऱ्या बातमीपासून , "मायाक्का, दादा आपल्याला सोडून गेले." ही खरी बातमी कळण्या मध्ये फक्त ३० मिनिटांचे अन्तर होते. मद्रास ते बंगलोर ह्यामधील ६ तासांचे अंतर ६ युगासारखे वाटलं.  वाटेवरून जात असतांना दादांच्या कित्येक आठवणींनी मनात एकच कल्लोळ माजविला होता. वरून वज्रासारखे दिसणारे माझे दादा आतून एकदम लोणीसारखे मऊ होते. पण त्यांना समजवून घेण्याची आमची पात्रताच नव्हती. ज्या व्यक्तीने बालपणी वार लावून जेवण करून खूप खटपट करून अभ्यास करून , जीवनात खुपसे काही साधले , त्या व्यक्तीच्या मनातली तळमळ आम्हाला कधी कळलीच नाहीं. आपण असं का केले याच्याबद्दल आता पश्चाताप होतो. का प्रत्येकवेळी प्रसंग सरून गेल्यानंतर आपले डोळे उघडतात ? 

बंगलोरला पोहचल्यानंतर, निपचित पडलेला दादांचा देह पाहून कंठ भरून आला. दादा नेहमी सांगायचे, "मी घोड्यासारखा आहे. घोडा कधी बसत नाहीं आणि तो ज्या दिवशी बसतो तो दिवस त्याच्यासाठी शेवटचा ठरतो." जीवनातल्या कठीण आव्हानांबरोबर पळता पळता दादा थकून झोपले होते. किती शिकण्यासारख होतं त्यांच्याकडून... फक्त नशीबवान मुलांना असे बाबा मिळतात !! समाधान एकाच गोष्टीचे आहे कि, दादा फक्त देहाने आमच्याबरोबर नसले तरी त्यांची चैतन्य शक्ती आजही आमच्याबरोबर आहे. 

दुसऱ्या दिवशी, दादांच्या डेस्क वर सहज नझर पडली. Association ला द्यायचा maintenance चा चेक़ त्यांनी ०१/०५/२००१ तारीख घालून तयार ठेवला होता. Pay-in-slip बुक मध्ये ०१/०५/२००१ ची तारीख घालून बँकेत जमा करायचे चेक़ तयार करून ठेवले होते. एक क्षण दादा आजूबाजूलाच आहेत असा भास झाला. मनुष्य कधी कधी गोड फसवणुकीत कसा एकदम रमून जातो.. सत्याची जाणीव झाल्यावर काळ किती कठोर आहे याची जाणीव होते. 

ह्या दोन गोष्टी ३० एप्रिल ला करताना, दादांना स्वताच्या अतिंम क्षणाची जरासुद्धा चाहूल लागली नसेल. माणूस जिवंतपणी सर्व गोष्टींबद्दल आढावे घेवू शकतो, परंतु स्वताच्या अतिंम क्षणाबद्दल मात्र तो एकदम हतबल असतो. त्या एक शेवटच्या क्षणापर्यंत तो खरच किती आशावादी असतो, किती स्वप्नं उराशी बाळगून असतो, किती काही करायचं असतं त्याला तो एक क्षण येईपर्यंत, तो क्षण येईपर्यंत आपण अजून काही अनुभवलेच नाहीं असे त्याला का वाटत असते, का ह्या क्षणाची तो आधीपासूनच तयारी ठेवत नाहीं, का देवाने ह्या एका गोष्टीबद्दलची आपली भावना आपल्यात एकदम सुप्त ठेवली आहे.....असे  अनेक प्रश्न मनात सैरावैरा धावू लागले. पण नंतर लक्षात आले, आशावादी, स्वप्नाळू , सतत धडपड करणाऱ्या दादांनी, त्यांना न कळताच दैहिक घराचा उंबरठा ओलांडला, हे एका दृष्टीने चांगलेच झाले. नाहीतर जिवंतपणीच ते हतबल झाले असते.  

Saturday 14 July 2012

क्षणिक सुख आणि दुखः 


एक जोकर ने लोगोंको एक जोक सुनाया, सब लोग बहुत हंसे, 
उसने वही जोक दुबार सुनाया तो कम लोग हंसे,
उसने वही जोक फिर सुनाया, तो कोई भी नही हंसा,
फिर उसने एक बहुत प्यारी बात बोली....
अगर तुम एक खुशी को ले के बार बार खुश नही हो सकते,
तो एक गम को ले के बार बार क्यु रोते हो !!!!

Thursday 12 July 2012

अचानक......


अचानक...., काल मॉलमध्ये असताना, एक २/३ वर्षाची मुलगी धापदिशी जमिनीवर आपटते, तिला जोरात पडताना पाहून माझ्या तोंडातून नकळत किंकाळी बाहेर पडते. ती छोटीसी मुलगी माझाकडे पाहून हसते आणि पळत-पळत जावून तिच्या आईच्या पायाला घट्ट मिठी मारते. मागे वळून आईला सांगते, "mummy, let us scold that floor. It badly hurt me. But it's ok, not now. Let us go." आणि हसत-हसत ती निघून जाते. क्षणार्धात घडलेली ही घटना, मनाला खूप काही सांगून जाते. बालपण किती सुंदर निष्पाप, निर्भेळ, निरागस  आणि गोन्जळ असते. पडलेल्याच दुखः नाहीं आणि पाहणारे काय म्हणतील याची खंत नाहीं. ह्याच्या उलट, आईच्या पायाला घट्ट मिठी मारून तिच्या आसऱ्यात जगातली कुठलीही  गोष्ट आपले काहीही वाईट करू शकणार नाहीं यावराचा तिचा विश्वास किती अनमोल आहे, असे वाटले. मोठे झाल्यावर, आपल्याला सुद्धा असेच का राहता येत नाहीं ? देवाला आपली आई मानून का आपण तिच्या कुशीमध्ये निवांत तिचे नामस्मरण करीत  आपले कर्तव्य करीत राहू शकत नाहीं? किती साधी कृती, पण का ती आपण नजरे आड करतो? आपल्या आईवर आपले जेवढे प्रेम आणि भक्ती आहे, तेवढे देवावर नाहीं म्हणून का असे होते? 

असा विचार करत असतांना, Baskin Robbin मध्ये icecream खायची इच्छा झाली. counter वरचा saleman इतका खुशालचेंडू होता कि सर्वांशी तो एकदम मजेत हसत विनोद करत बोलत होता. वाटले कि त्याला कशाची परवाच नाहीं आहे. न राहवून  त्याला शेवटी आम्ही विचारले कि ," तू इतका आनंदी नेहमीच असतोस का ?"  त्यावर तो म्हणाला, "का असू नये, माझा स्वभावाच असा आहे. तुम्ही कुठले ?" आम्ही बेंगलोरचे, तुम्ही कुठले? त्यावर तो , "मी पण तिथलाच. अरेच्या, आधीच सांगितले असते तर तुम्हाला icecream जास्त दिले असते. काही हरकत नाहीं, next time याल तेव्हा नक्की जास्त देईन. अम्मा, तुम्हाला पाहून मला बरे वाटले. माझ्या अम्मीची आठवण झाली आणि डोळ्यात पाणी आले. " एक अनोळखी माणूस, परक्या देशात भेटला परंतु, मनाशी नातेमात्र अचानक आणि त्वरित जुळले. परत एका निरागस माणसाशी भेट झाली. कालचा दिवसच छान होता. का आपल्याला पण त्याच्या सारखे निरागस होवून प्रत्येक क्षणाचा आनंद  घेता येत नाहीं म्हणून मन हुरहुरले. जीवनातल्या कमतरतेची जाणीव न ठेवता चेहऱ्यावर सतत हसू सांभाळून ठेवणे हे काही सर्वाना साधत नाहीं. आपण तसा प्रयत्नही करत नाहीं. का? 

किती काही करायचे उरून गेले आहे, किती अजून शिकायचे आहे, हे आयुष्य असेच संपून जाणार काय ? वाया घालवलेला वेळ परत येणार नाहीं याची तीव्रतेने जाणीव झाली ......  

Tuesday 10 July 2012



उशी

माझ्या जीवनात आत्तापर्यंत माझे आणि उशीचे कधीच जमले नाहीं. बालपणात मला कळू लागल्यानंतर, उशी मला नेहमीच खुणावून बोलवीत असे. पर्यंतू, वडिलांच्या धाका खाली अभ्यास करताना, उशीचा उपयोग अगदी मर्यादित होता. त्यामुळे, मला तिच्यावर नेहमीच राग यायचा आणि अभ्यासाच्या त्र्यागाखाली तिचा फारसा असा सहवास लाभलाच नाहीं. मोठी झाल्यानंतर माझा संसार सुरु झाल्यावर, जेंव्हा पूर्णपणे स्वंतंत्र पणा लाभला, तेंव्हा उशी किती कडक आणि जाड असावी हे ठरवण्यात सगळा वेळ वाया गेला. अजूनपर्यंत मला पाहिजे तशी उशी मिळाली नाहीं आहे. त्यात हल्ली झोपही बरोबर लागत नाहीं. एकूण काय तर, चढत्या आयुष्यात माझे, उशीचे आणि माझ्या झोपेचे एकमेकांशी अगदीच जमत नाहीं. पण ह्या धुसमुस्त्या संबधातून  नकळत उशीची झालेली माझी मैत्री मला परवाच अचानक कळून आली. समझाल्यावर, मी गालातल्यागालात खुदकन हसले. आयुष्यात अशा कित्येक गोष्टीशी / पुष्कळ जणाशी आपले बरेच वेळा पटत नाहीं परंतु आतल्या आत आपले कुठेतरी कसेतरी त्यांच्याशी सलोख्याचे नाते आपल्या नकळत जुळलेले असते. 

कॉलेज मध्ये असताना, रात्री जप करून मी जपमाळ उशीखाली ठेवून द्यायची. लग्न झाल्यावर जपमालेबरोबर विक्सचा डब्बा त्यात add झाला. कित्येक दिवस या दोनच गोष्टी उशीखाली अलगद विश्रांती घ्यायच्या. किती नकळत , उशीच्या भरवश्यावर मी या दोन गोष्टी जपून ठेवायची. परवा साफ करण्यासाठी मी उशी जेंव्हा बाजूला काढली, तेंव्हा तिच्याखाली नकळत  मांडलेला माझा संसार पाहून मला माझ्या चढत्या आयुष्याचे आणि उशीच्या माझ्याबद्दलच्या प्रेमाची मला जाणीव झाली. आता उशीखाली जपमाळ, टायगर  बामचा डब्बा, डोळ्यात घालायचे ड्रोप्स, हाताला लावायचे मलम, लिपबाम या सर्व गोष्टी अगदी आरामसे विसावा घेतात. किती भरवसा आहे त्यांना उशीवर !! या सर्व गोष्टींची काळजी घेत असताना, उशीने एक दिवस सुद्धा मला माझी पन्नाशी उलटल्याची जाणीव करून दिली नाहीं. उलट, मला साखरेची झोप कशी लागेल या साठी ती आजसुद्धा धडपडत असते. आयुष्यात आपण ज्यांना प्रिय असतो ती माणसेसुद्धा आपल्याला अशीच जपत असतात, आपल्या नकळत आपल्यावर प्रेम करत असतात. आपण उगीचच अशा खऱ्या प्रेमासाठी रानात वणवण फिरतो. पण आता मला अशी  वणवण फिरण्याची गरज नाहीं. माझा आणि माझ्या उशीचा आता एकदम मस्त मिलाप झाला आहे. आम्ही दोघेही आता एकमेकांवर एकदम खुश आहोत. उशी आणि ख़ुशी ........      

Sunday 8 July 2012


तकदीर


तकदीर के फैसलो से कभी मायुस  नही होते.....
जिंदगी से कभी बेबस नही होते.....

हाथो कि लकिरो पे यकीन मत करना....
तकदीर तो उनकी भी होती है....
जिनके हाथ नही होते... 

                                                                                               (आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात)

Thursday 5 July 2012


निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जाते, 
प्रश्न कधी कधी कळत नाहीत आणि उत्तर चुकत जाते, 
सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी नवनवीन गाठ बनत जाते, 
दाखविणाराल्या वाट माहित नसते, चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते,
दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी,
"अनुभव" म्हणजे काय हे तेव्हाच कळते.


हे अस काय?....कळते पण वळत नाही !!



अनुत्तरीत राहिलेली अशी अनेक प्रश्नांची मालिका....त्यातील काही थोडेसे प्रश्न...

१. आपण कुणाच्या घरात जन्म घ्यायचा हे आपल्याला का ठरविता येत नाहीं ?
२. बालपणी शाळेतल्या मास्तरांशी आणि आई-वडिलांशी आपले पटत नाही, त्यांनी आपल्याला काहीही समजून सांगितलेले आपल्याला कळवून घ्यायची इच्छा नसते, तरुणपणी नवऱ्याचे ऐकावेसे वाटत नाही, ऑफिस मध्ये बॉसशी आपले नेहमीच भांडण,  म्हातारपणी आपल्या मुलांच्या आणि आपल्या विचारात ताळमेळ नसतो, नातवंडांशी आपले बरेच वेळा मस्त जमते परंतु त्यांना आपले विचार आणि कृती गंजलेल्या सारखे उगीचच वाटते. हे असे का?
३. जेवायला ताट तयार केल्या वर आपल्या  नवऱ्याला टी. वी. च्या रिमोट कंट्रोल ची आठवण बरोब्बर कशी होते?
४. आपल्या मुलांपेक्षा आणि नवऱ्या पेक्षा    दुसऱ्यांची मुले आणि नवरे  नेहमीच का  स्मार्ट वाटतात?
५. आपलीच मुले आपला, दुसऱ्यांच्या समोरच का नेहमी अपमान करतात? आपण त्यांचे काय वाईट केलेले असते  म्हणून ते आपल्याला असे उघडे पाडतात?
६. घरात एखादा पदार्थ अगदी रुचिरा पुस्तकात बघून जसाचा तसा बनवण्याचा पर्यंत अगदी मनापासून केलातरी चांगला कधीच होत नाहीं, ह्याच्या उलट कधीतरी अगदी बेफिकीर होवून केलेला पदार्थ मात्र बेमालून रुचकर होतो कि त्याची रेसिपी आपल्या लक्षातसुद्धा राहत नाही. हे असे का?
७. तरुणपणी डोक्यावर भरपूर केस असतात तेंव्हा त्याची काळजी घेण्यासाठी आपल्या जवळ वेळ नसतो आणि म्हातारपणी जेंव्हा भरपूर वेळ असतो तेंव्हा डोक्यावर केस नसतात. हे असे का?
८. माणसाजवळ जेंव्हा पैसा नसतो तेंव्हा पैसा मिळाल्यावर काय काय मज्जा करायची ह्याची तो भरपूर गणिते मांडतो परंतु पैसा मिळाल्यावर हि सर्व गणिते उलटी पुल्टी होवून जातात. हे असे का?
९. गर्दीच्या वेळी पार्किंग लोट मध्ये आपल्यालाच का पार्किंगसाठी जागा मिळत नाही?
१०. दुकानात आपल्या आवडीची साडी/ड्रेस मटेरीअल नेमकी दुसरीच बाई कशी काय विकत घेते?
११. दुसऱ्यांच्या घरात लग्न भरभर उरकल्यासारखी का वाटतात?
१२. आपल्या मुलांना पगार दुसऱ्यांच्या पेक्षा का कमी मिळाल्या सारखा वाटतो?
१३. जगात सुबत्ता नको त्या ठिकाणी का आहे?
१४. तरुणपणीच देवावरच्या श्रद्धेचे महत्व का कळत नाही?
१५. हल्लीच्या काळात ओल्ड ऐज होम्सना एवढे का महत्व प्राप्त झाले आहे? हल्लीची तरून मंडळी स्वत: कधीही म्हातारे होणारच नाहीत असे का समजतात?
१६. देव सर्व चराचर मद्धे भरून आहे तर ह्या सृष्टीला त्याच्या मायेचे रूप कसे देवू?
१७. आपल्या नात्यागोत्यातली माणसे कधी दूरची तर कधी जवळची का वाटतात? ह्यात संपूर्ण दोष आपलाच असतो काय?
१८. आजूबाजूच्या परिस्थितीत काहीही बदल झालेला नसतांना सुद्धा मन कधी आनंदी तर कधी उधास असते. हे असे का?
२०. एखादे न आवडणारे काम उरकण्यासाठी फक्त पाच मिनिटेच लागतात, मग ते काम करावेसेच का वाटत नाही?
२१. एखाद्या देशात राजा प्रजेला रोटी, कपडा, मकान आणि शिक्षण ह्या गोष्टी मोफत देत असताना सुद्धा प्रजा का कुरबुर करते?
२२. जेंव्हा कोणाला तरी आपल्या घरी येवून राहावयाचे असते तेंव्हा आपण सर्व प्रकारची सुविधा त्या माणसाला करून देतो आणि त्याचे आपल्या घरात मस्त पैकी पाहुणचार करतो. परंतु आपल्याला जेंव्हा आपल्याला त्याच्या घरी जायचे असते तेंव्हा तो नेमका कसा गावाला जातो?
२३. तोकडे कपडे दुसऱ्यांच्या अंगावर चांगले दिसतात पण आपल्या मुलींनी तसले कपडे घातलेले आवडत नाहीत. असे का?
२४. जगात कब्बडी, खो-खो, लंगडी सारखे सुरेख मस्त खेळ असतांना लोक क्रिकेट लाच का इतके महत्व देतात?
२५. देवाच्या अस्तित्वाची एकदा मनात पक्की खात्री झाल्यावर आपण परत परत त्या बद्दलचे लिखाण का वाचतो? मनात झालेल्या त्या पक्क्या विश्वासाच्या हिंदोळ्यात मनाला आनंदाने का राहू देवू शकत नाही?
२६. चाळीशी नंतर विशीचे चाळ बायकांच्या पेक्षा पुरुषांना का जास्त लागतात?
............................................................................................................बाकी प्रश्न पुढल्या पोस्त मध्ये ..



"वासरी म्हणजे मनाचा आरसा. जीवनाच्या ओसरीवर जोवर आपली पथारी पसरली आहे, तोवर नित्य ह्या आरशात आपल्या मनाचे प्रतिबिंब उमटले पाहिजे." (पु. ल. देशपांडे यांचे बटाटयाची चाळ यातील टिप्पण. ) वासरी ह्या शब्दाने माझे मन इतके काही भारावून गेले की माझ्या ब्लॉग चे नामकरण मी "वासरी " म्हणूनच करावयाचे ठरवले. वयाची ५१  वर्षे उलटून गेली आहेत. आयुष्यात बरेच चढ उतार बघितले. पण उतारावर कधी वेगाची भीती वाटली नाहीं किंवा चढावर कधी उसासा टाकला नाहीं. हे सर्व साध्य झाले ते देवाची कृपा आणि मोठ्यांचे आशीर्वाद होते म्हणून. ह्या सर्व घडामोडीत मन मात्र सारखे हेलकावे खात असे. "मन" म्हणजे आहे तरी काय ह्याच्या बद्दलची गूढता वाढत्या वयाबरोबर वाढत आहे. एकीकडे देवा वरचा विश्वास वाढत आहे तर दुसरी कडे  ह्या गुढते बद्दलचे आकर्षण ही प्रज्वलित होत आहे. अशा वेळी वाटते, आपल्याला कोणीतरी बोट धरून एक आनंदमयी वाट दाखवावी म्हणजे ह्या जन्माचे सार्थक झाले. मनाचा हा असा आरसा की ज्याच्यावर कित्येक गोष्टी  लिहिल्या आणि पुसल्या, नेहमी हसत खेळत राहावा ह्या साठी खूप प्रयत्न करावे लागणार ह्यात मतभेद नाही. बघूया पुढे काय काय होते ते.........